Posts

Showing posts from April, 2023

महाराष्ट्र दिनापासून अर्बन हेल्थ सेंटर नागरिकांच्या सेवेत – आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३० :  राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान व महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा यांच्या संयुक्त विद्यमाने कोपरगाव शहरासाठी महाविकास आघाडी सरकारकडे केलेल्या पाठपुराव्यातून कोपरगाव शहरासाठी मागील वर्षी तीन अर्बन हेल्थ सेंटर मंजूर झालेले आहेत. उद्या (सोमवार दि.०१) पासूनहिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना व दोन शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र अर्थात अर्बन हेल्थ सेंटर नागरिकांच्या सेवेत रुजू होणार असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे. दोन वर्ष कोरोना महामारीमुळे संपूर्ण विश्वाचे अस्तित्व धोक्यात आले होते. त्यामुळे आरोग्याच्या बाबतीत आपल्याला कायमस्वरूपी सतर्क राहणे गरजेचे असल्याचे कोरोना महामारीने दाखवून दिले आहे. याचा धडा घेवून नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्या यासाठी आ. आशुतोष काळे यांनी महाविकास आघाडी सरकारकडे केलेल्या पाठपुराव्यातून ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन होवून ग्रामीण रुग्णालयाला १०० बेडचा उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यात आला आहे. कोपरगावकरांना अधिकच्या आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी आ.आशुतोष काळे यांनी महाविकास आघाडी सरकारकडून मागील वर्ष...

कोपरगावात खेळण्यासाठी मैदान नाही, ही मोठी शोकांतिका - माजी नगराध्यक्ष पाटील

कोपरगाव प्रतिनिधी, दि.३० :   नुकत्याच उन्हाळ्याच्यां सर्व शाळा व कॉलेजला सुट्ट्या लागल्या आहेत. परंतु वेळ कसा घालवायचा हा आता प्रश्न मुलांच्या आई-वडिलांना, आजी आजोबांना पडलाय. कोपरगावात मोठ्या प्रमाणात क्रिकेट प्रेमी मुले आहेत. त्यांना खेळण्यासाठी मैदान उपलब्ध नाही. त्यामुळे मुले नाईलाजाणे टीव्ही व मोबाईल वापरतात. त्याचा दुष्परिणाम होतो. ज्या वयात मैदानी खेळ खेळले पाहिजे त्यासाठी कोपरगावात साधे मैदानही आजपर्यंत नगरपालिका उपलब्ध करून देऊ शकले नाही. त्याचबरोबर जे जेष्ठ नागरिक, महिला भगिनी आहेत त्यांना चालण्यासाठी सुरक्षित वॉकिंग ट्रॅक देखील नगरपालिका आज अखेर करू शकलेले नाही. ही मोठी शोकांतिका आहे.           मुलांमध्ये खेळाडूवृत्ती तयार होण्यासाठी /स्पोर्ट्समन स्पिरीट हे पुढच्या आयुष्यासाठी त्यांना उपयोगी पडतं. त्यांची शारीरिक वाढ चांगली होते, यासाठी कोपरगाव शहरांमध्ये महिला, पुरुष, खेळाडूंसाठी मोठे नवीन अद्यावत सर्व सोयींनी युक्त असे मोठे ग्राउंड केले पाहिजे. त्याभोवती ज्येष्ठ नागरिकांना व नागरिकांना चालण्यासाठी स्वतंत्र ट्रॅक, तसेच ग्राउंडच्यां कडेला  छोटे छोटे जिमचे साहित्य जेणेकरून म...

शेवगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीत माजी आमदार घुले बंधूनी आपला गड कायम राखला

शेवगाव प्रतिनिधी, दि. ३० :   शेवगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्व १८ जागा जिंकत माजी आमदार डॉ.नरेंद्र पाटील घुले, चंद्रशेखर घुले, तसेच माजी सभापती डॉ .क्षितिज घुले यांच्या नेतृत्वाखाली ज्ञानेश्वर शेतकरी विकास मंडळाने भाजप, काँग्रेस, मनसे प्राणीत महायुतीच्या आदिनाथ शेतकरी विकास मंडळाला पराभूत करुन बाजार समितीवर आपले अधिपत्य  कायम राखले. मतदारानी विरोधकांकडे पूर्ण दूर्लक्ष करून  सत्तेच्या चाव्या पुन्हा घुले बंधूकडे दिल्याचेच  मतमोजणीतून स्पष्ट झाले.   रविवारी (दि.३० ) येथील रेसिडेन्शियल हायस्कूल मध्ये सकाळी ८ ते  सायंकाळी ४ या कालावधीत मतदान प्रक्रिया पार पडली. एकूण २ हजार १८७ पैकी २ हजार १३७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ९७.७१ टक्के मतदान झाले. सायंकाळी ५ वाजता तहसील कार्यालयात मतमोजणी झाली. यावेळी झालेल्या मतमोजणी मध्ये राष्ट्रवादी प्रणित ज्ञानेश्वर शेतकरी विकास मंडळाचे सर्व १८ उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत. माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या ज्ञानेश्वर शेतकरी विकास मंडळ विरुद्ध माजी आमदार मोनिका राजळे यांच्या आदिनाथ शेतकरी मंडळ यांच्यात सरळ लढत झाली.         बाजार समि...

कोपरगाव बाजार समितीत काळे, कोल्हे, परजणेच्या सहमतीचा एकतर्फी विजय

 कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३० : कोपरगाव तालुक्यातील सहकारी संस्था अबाधित ठेवण्यासाठी काळे कोल्हे, परजणे यांनी अंतर्गत राजकारणाला फाटा देवून तालुक्यातील सर्व सहकारी संस्थांमध्ये निवडणूक न होवू देता एकमेकांच्या सहकार्याने बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला माञ कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाच्या निवडणुकीत काळे कोल्हे यांच्या सहमतीला तालुक्यातील ठाकरे सेनेसह काॅंग्रेस व   इतर राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकञ वज्रमूठ बांधून हि निवडणूक बिनविरोध न करता  निवडणूक  लढण्याचा निर्णय घेतला. अखेर काळे कोल्हे या महाशक्ती समोर निवडणुकीचा शड्डू ठोकल्याने या निवडणुकीत परिवर्तन होईल की काय अशी शंका काहींना होती माञ मतदारांनी काळे कोल्हे व परजणे यांच्या सहमतीला सहमत होवून ३ जागा बिन विरोध तर १५ जागा एक हाती निवडून देत विरोधकांचा सफाया केला. माञ काही मतदारांनी काळे ,कोल्हे ,परजणे यांच्या सोबत राहुनही विरोधी गटाच्या उमेदवारांना मतदान केले तर काही कोणालाही नाराज न करता सर्वांना मतदान करुन आपलं बाद केले तर काहींनी जाणुनबुजून आपलं मत बाद करीत करुन आपला रोष व्यक्त केल्याचे मतपञिकेवरून दिसले. दरम्...

कोपरगाव बाजार समितीच्या निवडणुकीत ९३ टक्के मतदान

घोडेबाजार वाढल्याने निवडणुकीची रंगत शिगेला कोपरंगाव प्रतिनिधी, दि.३० : कोपरंगाव कृषी  उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या  पंचवार्षिक निवडणुकीसाठी ९३.६९ टक्के मतदान झाले आहे. त्यामध्ये सोसायटी मतदार संघातून १४१३ मतदारांपैकी १३१२ मतदारांनी मतदान केले. ग्रामपंचायत मतदार संघात ७७९ मतदारांपैकी ७२६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला व्यापारी मतदार संघातून १९८ पैकी १९६ मतदारांनी सर्वाधिक मतदानाचा हक्क बजावला तर हमाल मापडी मतदार संघातून ८६मतदारांपैकी ८६ जणांनी हक्क बजावून १०० टक्के मतदान करून विक्रम केला. सर्व मतदार संघाचे मिळून २४७६ मतदारांपैकी २३२० मतदारांनी मतदान केल्याने ९३.६९  टक्के मतदान झाल्याची माहिती सहायक निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी नामदेव ठोंबळ यांनी दिली.सकाळ पासूनच मतदारांना केंद्रावर आणण्यासाठी सर्वच पक्षाच्या प्रमुखांची लगबग सुरू होती. आपल्याच बाजूने मतदान कसे जास्तीत जास्त मतदान कसे होईल याची तरतूद केली जात होती.पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.मटफं प्रक्रिया चार वाजता पूर्ण झाल्याबरोबर मतमोजणी प्रक्रियेला तातडीने सुरुवात करण्यात आली. व्यापारी मतदारसंघ...

घर्षाला भिवू नका, अव्हानांना सामोरे जा - डॉ. भापकर

शेवगाव प्रतिनिधी, दि. २९ :  अपयशातून माणूस घडत असतो, स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा. संघर्षाला न भिता आव्हानांना सामोरे जा,चांगले विचार पेरा, असा हितोपदेश माजी विभागिय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी येथे केला. येथील न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज मध्ये आयोजित  हुतात्मा करवीर छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मृती करंडक राज्यस्तरीय अंतर महाविद्यालयीन वादविवाद स्पर्धचे उदघाटन डॉ. भापकरांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे सहसचिव अॅड़ .विश्वासराव आठरे पाटील तर प्रमुख पाहुण्या म्हणून निर्मलाताई काटे उपस्थित होत्या. शिक्षण क्षेत्रातील खाजगीकरण योग्य की अयोग्य ‘ हा विषय वादविवादा साठी देण्यात आला होता स्पर्धेसाठी राज्यातील विविध महाविद्यालयातून संघ सहभागी झाले होते. यावेळी छ.संभाजी नगरच्या  माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालयाने  हुतात्मा करवीर छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मृती सांधिक करंडक पटकावला.  तर वैयक्तिक स्पर्धेत पुण्याच्या फिरोदिया लॉ कॉलेजच्या  प्रज्वल नरवडे याने प्रथम क्रमांक पटकावला,  छत्रपती सभाजी नगर च्या  माणिकचंद पहाडे कॉलेजच्या ...

कंपन्या देताहेत एका पाठोपाठ संजीवनीच्या अभियंत्यांना पसंती - अमित कोल्हे

कोपरगांव प्रतिनिधी, दि. २९ : संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नाने युजफुलबीआय या कंपनीने घेतलेल्या कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह अतंर्गत मुलाखती घेवुन संजीवनीच्या तीन नवोदित अभियंत्यांची वार्षिक पॅकेज रू 5.5 लाख देवु करून त्यांना अंतिम निकाला अगोदरच नेमणुक पत्र दिले आहे, अशी  माहिती संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजच्या वतीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.      पत्रकात पुढे म्हटले आहे की व्यवसाय बुध्दिमत्ता, डेटा विज्ञान, डेटा अभियांत्रिकी, क्लाउड ट्रान्सफाॅर्मेशन, डेटा अंतर्ग्रहण , कृत्रिम बुध्दिमत्ता, डेटा गव्हर्नन्स, इत्यादी क्षेत्रात बेंगलोर येथे मुख्यालय असलेल्या युजफुलबीआय कंपनीने ऋतुजा दिलिप पठाडे, अरिहंत आनंद लोढा व गौरी रमेश  बोरणारे यांची वार्षिक  पॅकेज रू ५. ५ लाख देवु करून नोकरीसाठी निवड केली तसेच नेमणुकीचे पत्र ही दिले. या महाकाय विश्वव्यापक  स्पर्धेमध्ये अनेक सुशिक्षित  तरूण-तरूणींवर मला नोकरी देता का? मला नोकरी देता का? अशी  विनंती करण्याची वेळ येते. परंतु संजीवनीच्या विध्यार्थ्यांवर अशी  वेळच येवु नये, यासाठी व्यवस्थापन काळजी घेत असत...

रवंदे येथील मृत दत्तात्रय मोरे यांच्या कुटुंबीयांचे स्नेहलताताई कोल्हे यांनी केले सांत्वन

नुकसानीचे तातडीने पंचनामे करून मदत द्या – स्नेहलताताई कोल्हे   कोपरगाव प्रतिनिधी, दि. २९ : कोपरगाव तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी जोरदार वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी राहत्या घरांचे व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. रवंदे परिसरातील सहाचारी येथे घरावर बाभळीचे झाड पडून दत्तात्रय संजय मोरे (वय २९ वर्षे) या तरुणाचा मृत्यू झाला. माजी आमदार तथा भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलताताई कोल्हे यांनी मृत दत्तात्रय मोरे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. तसेच तहसीलदार विजय बोरूडे यांना फोन करून अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा आणि मृत दत्तात्रय मोरे यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून ताबडतोब आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशा सूचना स्नेहलताताई कोल्हे यांनी दिल्या. कोपरगाव तालुक्यातील रवंदे ग्रामपंचायतच्या हद्दीत असलेल्या सहाचारी येथे दत्तात्रय संजय मोरे (वय २९ वर्षे) हे आपल्या कुटुंबासह राहत होते. शुक्रवारी (२८ एप्रिल) सायंकाळी सोसाट्याच्या वाऱ्यासह पडलेल्या अवकाळी पावसामुळे दत्तात्रय मोरे यांच्या घरावर बाभळीचे झाड पडले. या झाडाखाली दबल्याने दत्तात्रय मोरे ...

चासनळीतील चार आदिवासी घरकुलांचे अवकाळी पावसाने नुकसान

 कोपरगाव प्रतीनिधी, दि. २९ :   तालुक्यात शुक्रवारी दुपारी साडेतीन ते सहा वाजेच्या सुमारास जोरदार वादळी वा-यासह अवकाळी पाउस झाल्यांने त्यात चासनळी येथील चार आदिवासी घरकुलांचे तसेच शेतक-यांचे कांदा गहू ज्वारी भाजीपाला ऊस फळे रब्बीसह बागायती पिकांचे मोठया प्रमाणांत नुकसान झाले आहे.             याबाबतची माहिती अशी की, एप्रिल महिन्यात वादळी वा-यासह जोरदार अतिवृष्टी होण्याबाबतचा इशारा हवामान खात्याने दिला होता. त्याप्रमाणे शुक्रवारी  २८ एप्रिल रोजी दुपारी साडेतीन ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत जोरदार वादळी वा-यासह अवकाळी पाउस झाला. अचानक आलेल्या पावसामुळे शेतक-यांसह गोर गरीब नागरिकांसह जनावरांचे हाल झाले. पावसाचे थेंब टपोरे असल्यांने त्यापासून जनावरांचा बचाव होवु शकला नाही. सोसाटयाचा वारा असल्याने शेतक-यांनी शेतात चारा कडबा रचुन ठेवला होता त्याचे नुकसान झाले. चासनळी आदिवासी परिसरातील श्रीमती सिताबाई त्रंबक माळी, ताराबाई भिमा माळी, संतोष एकनाथ पवार, विलास निवृत्ती सुर्यवंशी यांच्या राहत्या घरांचे नुकसान झाले, भिंतींना तडे गेले, पत्रे उडुन गेले, भिंती पडल्या असुन त्याबाबतची माहिती भाजपाच्या प्रद...

चासनळी भागात देहदानाची चळवळ जोमात

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २९ : तालुक्यातील चासनळी गाव परीसरात अवयवदान व देहदानाचे प्रबोधन होत असुन अनेक व्यक्तींनी तसे संकल्पपत्र भरून दिले आहे. देहदान व अवयवदान हे सर्वश्रेष्ठ दान असल्याने गावकऱ्यांच्या या निर्णयाचे कौतुक होत आहे. या कामी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी पुढाकार घेतला आहे.         पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच ‘मन की बात’ मध्ये अवयवदानाचे महत्व विषद केले आहे. सरकार त्यासाठी अनेक योजना आखत आहे. परंतु चास ( नळी) भागात त्या अगोदर ही चळवळ सुरु झाली आहे. काही दिवसांपुर्वी अंनिस कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे यांच्या आई सुगंधाबाई त्र्यंबक चांदगुडे यांचे निधन झाले. त्यांचे देहदान करण्यात आले. त्यांच्या श्रद्धांजली सभेत देहदान व अवयवदान यावर सक्रिय कार्यकर्ते सुनील देशपांडे यांचे व्याख्यान ठेवण्यात आले होते. त्या कार्यक्रमात त्यांची प्रेरणा घेऊन पंधरा व्यक्तींनी देहदानाचे संकल्पपत्र  सादर केले होते. अजुनही अनेक व्यक्ती देहदान व अवयवदान याबद्दलचे संकल्पपत्र सादर करत आहे. या दाना बद्दल समाजात अज्ञान व गैरसमज असल्याने प्रबोधन...

सालवडगावच्या उपसरपंचपदी राजेंद्र औटी बिनविरोध

शेवगाव प्रतिनिधी, दि . २८ : तालुक्यातील सालवडगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच राजेंद्र बाबुराव औटी यांची बिनविरोध निवड झाली. ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंचपदासाठी सरपंच आण्णासाहेब रुईकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.      मागील उपसरपंचांनी  राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक घेण्यात आली.उपसरपंचपदासाठी राजेंद्र बाबुराव औटी यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य अरुण  निक्ते, सुनिता  औटी, यमुना भापकर,भारत  लांडे सदस्य उपस्थितीत होते.ग्रामसेवक प्रफुल्ल राऊत यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले.        सोसायटीचे व्हा. चेअरमन काशिनाथ रुईकर यांनी नवनिर्वाचित उपसरपंच औटी यांचा सन्मान केला. याप्रसंगी पत्रकार रामनाथ रुईकर, चंद्रनाथ औटी, योगेश  विर,बाळासाहेब लांडे, बाळासाहेब कमानदार, सुरेश रुईकर उपस्थित होते. 

शेवगावात अवकाळी पाऊस

शेवगाव प्रतिनिधी, दि . २८ :    आज शुक्रवारी (दि . २८ )  सकाळी शेवगाव शहरासह तालुक्यातील बक्तरपूर , दादेगाव, जोहरापूर सालवाडगाव, खरडगाव, आखेगावआदि गावाना अवकाळी पावसाने झोडपून काढले. यावेळी वादळ वाऱ्यासह बारीक गारपीट झाली. शेवगावात अवघ्या अर्धा तास झालेल्या पावसाने शहरात अनेक रस्ते पाण्याखाली बुडाले. पंचायत समिती रस्त्यावर, लोकमान्य हॉस्पिटल समोर तसेच गाडगे बाबा चौकात राज्य मार्गावर मोठी डबकी साचल्याने रुग्णांचे, प्रवाशांचे, मोठे हाल झाले.     तालुक्यातील खरडगाव परिसरात झालेल्या गारपिटीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात असलेल्या कांदा पिकाला मोठा फटका बसला . कित्येकाच्या शेतात काढून पडलेला कांदा पावसाच्या पाण्यावर तरंगला .   अचानक झालेल्या पावसाने शेतकऱ्यांची चांगली धांदल उडाली. 

शेवगांवात बाजार समितीच्या मतदानाची व्यवस्था पूर्ण

शेवगाव प्रतिनिधी, दि . २८ : शेवगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी रविवारी दिनांक ३० एप्रिल रोजी मतदान होणार असून  मतदानाची पूर्ण तयारी  करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक व्ही . यु . लकवाल यांनी दिली.        शेवगावातील  रेसिडेन्सीयल हायस्कूलमध्ये  एकूण सहा खोल्यात मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे.  येथील खोली क्रमांक एक व दोन मध्ये सहकारी संस्थां मतदार संघाच्या ९११  मतदारांची तसेच खोली क्र. ३ व ४ मध्ये ग्रामपंचायत मतदार संघातील ८६९ मतदारांची, खोली क्र : ५ मध्ये व्यापारी आडते मतदारसंघाच्या एकूण १८६ मतदारांची  तर खोली क्रमांक ६ मध्ये हमाल मापाडी मतदार संघाच्या २२१ मतदाराच्या  मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे .   सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत मतदान होणार असून सायंकाळी पाच वाजता  तहसील कार्यालयात लगेच मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे. मतदान व्यवस्थेसाठी ४० अधिकारी व कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे, 

संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचा तीन परदेशी विद्यापीठांशी करार- अमित कोल्हे

कोपरगांव प्रतिनिधी, दि. २८ : संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स  संचलित इंजिनिअरींग काॅलेज, एमबीए, फार्मसी, पाॅलीटेक्निक, सिनिअर काॅलेज मधिल विध्यार्थ्यांच्या  ज्ञानाच्या कक्षा रूंदविण्यासाठी व जागतिक आव्हाने पेलण्याच्या क्षमता विकसित करण्यासाठी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या इंटरनॅशनल रिलेशन्स विभागाच्या पुढाकाराने अलिकडच्या काळात जर्मनीच्या आरडब्ल्युटीएच आचेन युनिव्हर्सिटी, कंबोडियाच्या इन्स्टिट्युट ऑफ टेक्नाॅलाॅजी व फिलीपाईन्सच्या टारलॅक अग्रिकल्चरल युनिव्हर्सिटीशी परस्पर सामंजस्य करार करून शैक्षणिक जगतात एक क्रांतिकारी पावुल टाकले आहे, अशी  माहिती संजीवनी ग्रुप ऑफ  इन्स्टिट्यूट्सचे  मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.             पत्रकात कोल्हे यांनी म्हटले आहे की, आरडब्ल्युटीएच आचेन युनिव्हर्सिटीचा जागतिक क्रमवारीत क्युएस रॅन्कींग १४७  वा आहे. इन्स्टिट्युट ऑफ  टेक्नाॅलाॅजी या विद्यापीठाचा कंबोडिया देशात  दर्जा व गुणवत्तेच्या आधारावर दुसरा क्रमांक आहे.  फिलीपाईन्सच्या टारलॅक अग्रिकल्चरल युनिव्हर्सिटीशीला थ्री स्टार क्युएस रेटींग आहे. अशा  नामवंत व...

विवेक कोल्हे यांच्या वाढदिवसानिमीत्त मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २८ : महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाचे संचालक व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे युवा अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या वाढदिवसानिमीत्त कारखाना कार्यस्थळावरील सर्व कर्मचा-यांची मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यांत आले. अध्यक्षस्थानी अमृत संजीवनी शुगरकेन संस्थेचे अध्यक्ष पराग शिवाजीराव संधान होते.             प्रारंभी कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार प्रास्तविक करतांना म्हणाले की, कारखान्याचे युवा अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्याकडे विशाल दुरदृष्टी असुन त्यांनी उद्योग समुहातील कर्मचा-यांच्या वैयक्तिक सुरक्षेबरोबरच आरोग्यालाही विशेष महत्व दिलेले आहे. दुचाकीस्वारांना त्यांनी यापुर्वीच मोफत हेल्मेटचे वाटप केले. मनुष्याला जन्मजात प्रत्येक अवयव दोन आहेत पण हृदय मात्र एकच आहे तेंव्हा त्याची काळजी सर्वांनी घ्यायला पाहिजे. डॉ. गणेश ठोमरे व डॉ. योगेश कोठारी यांनी हृदयरोग, रक्तदाब, मधुमेहाबरोबरच अन्य आजारासंबंधी कामगारांना प्रबोधन केले.              अध्यक्षपदावरून बोलतांना पराग संधान म्हणाले की, मनुष्य समाजाचे काहीतरी देणं लागत अस...

जलयुक्त शिवार अभियानासाठी ग्रामस्थांनी जलसंधारणाची कामे सुचवावीत - स्नेहलता कोल्हे

कोपरगाव प्रतिनधी, दि. २७ : जलयुक्त शिवार अभियान-२ अंतर्गत कोपरगाव तालुक्यातील २३ गावांची निवड करण्यात आली आहे. जलयुक्त शिवार अभियान-२ मध्ये पहिल्या टप्प्यातील पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम न राबविलेल्या पात्र गावांमध्ये मृद व जलसंधारणाची कामे करण्यात येणार असून, ज्या गावांमध्ये पहिला टप्पा राबविला गेला आहे; पण अद्याप पाण्याची गरज आहे, तेथेही लोकसहभागातून विविध कामे करण्यात येणार आहेत. जलयुक्त शिवार अभियानासंदर्भात कोपरगाव येथील पंचायत समिती सभागृहात कार्यशाळा पार पडल्यानंतर शिवार फेरी काढण्यात येणार असून, अभियानासाठी निवड झालेल्या गावातील लोकांनी शिवार फेरीमध्ये मृद व जलसंधारणाची कामे सुचवावीत, असे आवाहन माजी आमदार तथा भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलताताई कोल्हे यांनी केले आहे. स्नेहलताताई कोल्हे म्हणाल्या, यापूर्वी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री‎ असताना सन २०१४ ते २०१९ या‎ काळात राज्यात जलयुक्त शिवार‎ अभियान राबवण्यात‎ आले होते. पहिल्या टप्प्यात राज्यातील २२ हजार ५९३ गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आले व यामध्ये ६ लाख ३२ हजार ८९६ कामे पूर्ण झाली. तसेच २० हजार ५४४ गावे जलपरिपूर्ण...

हलगर्जी करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही - आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २७ : कोपरगाव मतदार संघात सुरू असलेल्या अनेक गावातील रेंगाळलेल्या पाणी पुरवठा योजनांचे काम तातडीने पूर्ण करा.ज्या पाणी पुरवठा योजनांची कामे सुरू झाली नाहीत ती कामे तातडीने सुरू करा. कामात हयगय झाल्यास कोणत्याही अधिकाऱ्याची गय केली जाणार नाही अशी तंबी आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे. कोपरगाव मतदार संघातील अनेक गावात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जिल्हा परिषद अंतर्गत सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजनांच्या कामाचा आढावा आ.आशुतोष काळे यांनी घेतला यावेळी बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना करून कामात हलगर्जी करणाऱ्या अधिकाऱ्यांचे चांगलेच कान उपटले. यावेळी आ.आशुतोष काळे यांनी मतदार संघातील जिल्हा परिषद अंतर्गत मंजूर असलेल्या ३३ पाणीपुरवठा योजना व महाराष्ट्र जिवन प्राधिकरण अंतर्गत चास नळी, कुंभारी,कोळपेवाडी, मळेगाव थडी, मायगाव देवी, रवंदे, रुई-शिंगवे, शिंगणापूर, सुरेगाव,वारी-कान्हेगाव,जेवूर कुंभारी, पुणतांबा, रांजणगाव देशमुख, धारणगाव तसेच पिंपळवाडी-नपावाडी पाणी पुरवठा योजनेचा देखील आढावा घेतला. अधिकाऱ्यांना सूचना करतांना ते म्हणाले की,रेंगाळलेल्या पाणी पुरवठा योजनांच्या क...

कोल्हे साखर कारखान्याची फार्मा क्षेत्रात भारतात ओळख निर्माण होईल - शेखर गायकवाड

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २७ : सहकाररत्न माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी देशातील साखर उद्योगाला स्पर्धेत टिकण्यासाठी सातत्यांने तंत्रज्ञान विकास बदलाचा विचार दिला त्याच तालमीत त्यांचे नातू विवेक कोल्हे तयार झाले असून त्यांनी कारखानदारीच्या माध्यमांतून फार्मा निर्मातीवर लक्ष केंद्रीत करून पॅरासिटामॉल औषध उत्पादनावर भर दिला असून त्यांच्याबरोबरच संचालक मंडळाच्या दुरदर्शी वाटचालीमुळे सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याची फार्मा क्षेत्रात आगामी काळात भारतात नवि ओळख निर्माण होईल असे प्रतिपादन राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी केले. साखर उद्योगात महाराष्ट्र राज्य जगात तिस-या स्थानावर आहे, सहकारासमोर खाजगीचे आव्हान आहे पण साखर कारखानदारी व त्यात कार्य करणा-या युवा नेतृत्वाने यातील बदलांचा वेळीच अभ्यास करून तशी ध्येयधोरण घेवुन आपण आपली स्वतःची ओळख वेगवेगळी उत्पादने घेवुन निर्माण केली तरच साखर उद्योग टिकेल असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.            साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना ‘सर ही मानद उपाधी मिळाल्याबददल त्यांचा सहकारमहर्षी शंकरराव क...

गावे मुख्य रस्त्यांना जोडल्यामुळे दळणवळणाच्या अडचणी सुटल्या - आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २७ : मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी दळणवळण सुविधेला अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे सर्व प्रमुख रस्त्यांच्या विकासाबरोबरच या रस्त्यांना जोडणाऱ्या गावांतर्गत रस्त्यांचा विकास करून बहुतांश गावे मुख्य रस्त्यांना जोडल्यामुळे दळणवळणाच्या अडचणी सुटल्या असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी सांगितले.  देर्डे कोऱ्हाळे येथे १० लक्ष रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या भगवान होन घर ते नानासाहेब शिंदे घर रस्ता खडीकरण कामाचा भूमिपूजन कार्यक्रम नुकताच आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते संपन्न झाला याप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले की, रस्ते विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आजवर जवळपास २११ कोटी निधी आणला आहे. या निधीतून बहुतांश राज्य मार्ग, जिल्हा मार्ग, ग्रामीण मार्गाचा विकास झाला असून गावापासून मुख्य रस्त्यांना जोडणाऱ्या अनेक रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत.उर्वरित रस्त्यांच्या कामांचे प्रस्ताव शासनदरबारी सादर केलेले असून त्यांना देखील लवकरात लवकर निधी मिळावा यासाठी प्रयत्न करीत असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले. यावेळी देर्डे कोऱ्हाळे विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन विका...

गारपीटीने पूर्व भागातील शेतकरी नागवला

शेवगाव प्रतिनिधी, दि. २७ : तालुक्यातील पूर्व भागातील  बोधेगाव बालमटाकळी कांबी हादगाव मुंगी परिसरात काल बुधवारी (दि २६ ) झालेल्या पावसाने शेती पिकाचे मोठे नुकसान झाले.  भाजीपाला, चारा पिके,  काढणी झालेल्या पिकाचे मोठे नुकसान झाले. यामध्ये  गोळेगाव, लाड जळगाव, राणेगाव, नागलवाडी, कोणोशी, सुकळी परिसरात देखील वादळासह मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याने शेतकऱ्यांच्या शेतीतील कांदा, उन्हाळी बाजरी, भुईमूग, मका, फळ बागांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा द्यावा अशी मागणी परिसरातून होत आहे.      पुरेशा खतांचा अभाव, वीजेचा लपंडाव अशा अनेक अडचणीमुळे शेतीचे मोठे नुकसान होत असताना त्यावर मात करत    थोड्या फार आलेल्या पीकाना नुकत्याच झालेल्या गारपीटीमुळे फटका बसला. शेतकऱ्यांच्या हाता तोंडासी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे हिरावला गेला आहे. गेल्या वर्षापासूनच शेतकऱ्यावर संकटा मागून  संकटे येत आहेत. त्यामुळे या भागातील शेतकरी हातबल झाला असून गारपीटग्रस्त सर्व शेती पिकाचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा  द्यावा अशी शेतकर्‍याची मागणी आहे. 

संजीवनीमध्ये राज्यस्तरीय ‘टेक्नोवेशन २३’ तांत्रिक प्रदर्शन संपन्न

आयईईई कडुन संजीवनी बध्दल गौरवोद्गार कोपरगांव प्रतिनिधी, दि. २७ : संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजमध्ये मानवतेच्या फायद्यासाठी तांत्रिक नवसंकल्पना आणि उत्कृष्टता  वाढविण्यासाठी समर्पित असलेल्या व जगातील सर्वात मोठी व्यावसायिक संघटना अशी ओळख असलेल्या संस्थेच्या इन्स्टिटयूट ऑफ  इलेक्ट्रिकल अँड  इलेक्ट्राॅनिक्स इंजिनिअर्स ( आयईईई ), बाॅम्बे सेक्शन  पुरस्कृत महाराष्ट्र राज्यातील सहा विभागांचे  ‘टेक्नोवेशन २३’ या तांत्रिक प्रदर्शनाच्या  स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या. माजी मंत्री व संजीवनी ग्रुप ऑफ  इन्स्टिट्यूट्सचे  संस्थापक स्व. शंकरराव  कोल्हे यांना विध्यार्थ्यांनी नाविण्याचा ध्यास घेवुन मानवतेच्या कल्याणासाठी नवनवीन प्रोजेक्ट करावेत अशी कायम इच्छा असायची. म्हणुन संजीवनीच्या वतीने दरवर्षी  प्रोजेक्ट विजेत्यांना रू २५ हजाराची बक्षिसे जाहीर केली आहे. यावेळी विजेत्यांना त्यांच्या स्मृति प्रित्यर्थ रू २५ हजारांची रोख बक्षिसे देण्यात आली, अशी  माहिती संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजच्या वतीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.              पत्रकात पुढे म्हटले आहे की सकाळच्या सत्रात आयईईई, बाॅम्बे स...

प्रभाग क्र ३ मधील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांना निवेदन कोपरगाव प्रतिनिधी, दि. २७ :   कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक ३ मधील श्री साईबाबा मंदिर ते ठक्कर घर बाजार तळ रस्ता व श्री संत ज्ञानेश्वर स्कुल ते शेखर कोलते घर बाजारतळ रस्ता या रस्त्यांची अतिशय दुरावस्था झाली असून या रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरु करावे अशा आशयाचे निवेदन आ. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना देण्यात आले. दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, शहराच्या प्रभाग क्रमांक ३ मधील मोठी वर्दळ असणाऱ्या श्री साईबाबा मंदिर ते ठक्कर घर बाजार तळ रस्ता व श्री संत ज्ञानेश्वर स्कुल ते शेखर कोलते घर बाजारतळ रस्ता या रस्त्यांची दुरावस्था झाल्यामुळे सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना व लहान मुलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करणे अत्यंत गरजेचे आहे. नागरिकांना होत असलेल्या त्रासाची दखल घेवून लवकरात लवकर या रस्त्याचे काम सुरु करून नागरिकांना होत असलेल्या त्रासातून मुक्तता करावी असे दिलेल्या निवे...

धारणगाव, कुंभारीच्या मुस्लिम दफनभूमीचा प्रश्न मार्गी

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २५ : मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या धारणगाव, कुंभारीच्या मुस्लीम बांधवांची प्रमुख मागणी असलेला दफन भूमीचा प्रश्न प्रलंबित होता. त्याबाबत धारणगाव, कुंभारीच्या मुस्लीम बांधवांनी आ. आशुतोष काळे यांच्याकडे आपली अडचण मांडून हा प्रश्न सोडवावा अशी मागणी केली होती. त्याबाबत आ. आशुतोष काळे यांनी पुढाकार घेवून शासनदरबारी केलेल्या पाठपुराव्यातून हा प्रश्न मार्गी लागला असून धारणगाव, कुंभारीच्या मुस्लीम बांधवांनी आ. आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.   मागील साडे तीन वर्षाच्या कार्यकाळात आ.आशुतोष काळे यांनी विकासाच्या प्रश्नांबरोबरच सर्व समाजाला समसमान न्याय देवून सर्वच समाजाचे महत्वाचे सामाजिक व धार्मिक प्रश्न मार्गी लावले असून मुस्लीम समाजाचे देखील दफनभूमी व कब्रस्तानचे प्रश्न सोडविले आहे. त्यामुळे धारणगाव, कुंभारीच्या मुस्लीम बांधवांनी देखील आ. आशुतोष काळे यांच्याकडे दफनभूमीचा प्रश्न मांडला असता हा प्रश्न देखील आ. आशुतोष काळे यांनी सोडविला आहे. त्याबाबतचे दफनभूमी मंजुरी आदेशांचे पत्र आ. आशुतोष काळे यांनी नुकतेच धारणगाव, कुंभारीच्या मुस्लीम बांधवांना ...

महिला व लोकप्रतिनिधीबद्दल बोलताना भान ठेवायला हवे - आमदार राजळे

शेवगाव प्रतिनिधी, दि. २५ : वर्षानुवर्षे सर्व सत्तास्थाने ताब्यात असताना दुध संघ, खरेदी विक्री संघ, जिनिंग, बाजार समिती या संस्था मोडकळीस का आल्या याचा विचार तालुक्यातील नेतृत्वाने करावा. सुसंस्कृत घराण्याचे वारसदार म्हणून सांगताना महिला व लोकप्रतिनिधीबद्दल पातळी सोडून बोलणे ही जिल्ह्याची राजकीय संस्कृती नाही. याचे भान ठेवायला हवे. एखाद्यावर आरोप करतांना चार बोटे आपल्या कडे असतात त्याचेही आत्मपरिक्षण करायला हवे. अशा शब्दात आमदार मोनिकाताई राजळे यांनी विरोधकांचा नामोल्लेख न करता समाचार घेतला.       भाजप व मित्र पक्ष प्रणित आदिनाथ शेतकरी विकास मंडळाच्या प्रचाराचा शुभारंभ आव्हाणेच्या स्वयंभू निद्रिस्त गणपती मंदिरा जवळ  मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, माजी जि.प.सदस्य नितीन काकडे, तालुकाध्यक्ष ताराचंद लोढे, महिला तालुकाध्यक्ष आशा गरड, बापुसाहेब भोसले, बापु पाटेकर, कचरू चोथे, सोमनाथ कळमकर, भिमराज सागडे, उमेश भालसिंग, वाय डी कोल्हे , शशिकांत खरात, संदिप सातपुते, महेश फलके, लक्ष्मण टाकळकर आदी प्रमुख उपस्थित होते. केशव महाराज गुजर कार्यक्रमाच्या अध्यक्...

साडे तीन वर्षात पूर्व भागाच्या विकासाला चालना मिळाली - आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २५ : कोपरगाव विधानसभा मतदार संघाचा विकास साधतांना मतदार संघाच्या सर्व गावांना विकासात सहभागी करून घेतले असून मागील साडे तीन वर्षात दिलेल्या कोट्यावधीच्या निधीतून पूर्व भागाच्या विकासाला चालना मिळाली असल्याचे प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी केले आहे. कोपरगाव तालुक्यातील धोत्रे येथे ४ कोटी रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या प्र.जि.मा. ५ रवंदे-टाकळी-पवार गिरणी-संवत्सर-भोजडे-धोत्रे रस्ता डांबरीकरण करणे तसेच २० लक्ष रुपये निधीतून इजिमा २१५ धोत्रे ते वारी रस्ता डांबरीकरण करणे व १० लक्ष रुपये निधीतून दिलीप रोकडे घर ते घोयेगाव चौफुली रस्ता खडीकरण करणे कामाचे या ४ कोटी ३० लाखाच्या कामांचे भूमिपूजन व मस्जिद परीसरातील पेव्हिंग ब्लॉक बसविणे कामाचे लोकार्पण नुकतेच आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, पूर्व भागाच्या विकासाला चालना देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करून नागरिकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न मार्गी लावले आहे. कोकमठाण व परिसराच्या गावातील नागरिकांचे श्रद्धास्थान श्री लक्ष्मीमाता देवस्थान तसेच वारी व परिसराचे श्रद्धास्थान असलेल्या...

कोपरगावच्या वैद्यकीय पथकाने वाचविले आई व बाळाचे प्राण

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२५ :   देव तारी त्याला कोण मारी यांचा प्रत्यय कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात आला. रेल्वे प्रवासात दरम्यान एका परप्रांतीय गरोदर मातेची अवघड प्रसुती सुखरुप करुन बाळासह मातेचा जीव वाचवण्यात कोपरगाव ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांना यश आले. वेळेत योग्य पध्दतीने प्रसुती केल्यामुळे जीव धोक्यात गेलेल्या गरोदर मातेस नवजात बालकाला जीवदान देवुन देवता सारखी भूमिका बजावणाऱ्या डॉ डॉक्टरांचे सर्वञ कौतूक होत आहे.  या घटनेची अधिक माहिती अशी की, रिटा देवी व दिपक कुशवाल हे जोडपे पाणीपुरीच्या व्यवसाया निमित्य कर्नाटक मध्ये शाहपुर मध्ये राहतात ते मुळचे झाशी उत्तर प्रदेश येथील आहेत. रिटा देवी ही महिला  ९ महीण्याची गरोदर होती. या पुर्वी तिचे दोन बाळंतपणे सिजरीयन सेक्शनने झाली होती त्यात पहील्या बाळाचा मृत्यु झाला होता. आता पुन्हा ती तिसऱ्यांदा गरोदर असल्याने ९ व्वा महीणा सुरू होता. त्यामुळे ते आपल्या मुळ गावी जाण्यासाठी आपल्या पतीसह कर्नाटक एस्कप्रेस या रेल्वे ने  कर्नाटक शाहपुर येथून उत्तर प्रदेश झाशी येथे जाण्यासाठी २१ एप्रिलला सकाळी ०४ वाजता निघाले ते  कोपरगांव च्या जवळपास आल्यानंतर संबंध...

माहेगाव देशमुख येथे बिबट्याच्या हल्लात दोन शेळ्यांचा मृत्यू

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २५ : तालुक्यातील माहेगाव देशमुख येथील सखाराम लांडगे यांच्या दोन शेळ्या वर बिबट्या ने हल्ला चढवत त्यांना मारुन टाकल्याने माहेगाव देशमुख परिसर बिबट्याच्या अधिवासाने भयभीत झाला आहे.    माहेगाव देशमुख ग्रामपंचायत समोर लांडगे वस्ती मध्ये सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास गोठ्या बाहेर बांधलेल्या विस हजार रुपये किंमती च्या दोन शेळ्या वर बिबट्याने हल्ला केल्याने त्याचा जागिच म्रत्यु झाला. कुत्रे जोर जोराने भुंकण्याचा आवाज ऐकून लांडगे वस्ती वरील लोक जागे झाले तेंव्हा बिबट्या त्यांना बघुन मकाच्या शेतात पसार झाला दावे बांधले ल्या ऐका शेळीचे नरडे फोडले, तर एकिचे पोट हल्ला झालेल्या ठिकाणी शेतामधील माती मध्ये बिबट्याच्या पायाचे ठसे भर वस्ती मध्ये आढळून आल्याने नागरिक भयभीत झाले आहे. दोन दिवसापूर्वी माहेगाव देशमुख कुभांरी शिवे वर असणाऱ्या वन जमिनीलगत शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या भिमा माळी यांच्या कळपातील एक शेळी बिबट्या ने अलगत उचलून नेत राखीव वनात नेवून फडशा पाडला तालुक्यात गोदावरी नदीच्याच्या तिरावर बारमाही ऊसाची व मक्याची शेती मोठ्या प्रमाणावर असल्याने बिबट्याच्या अधिवासा...

बाजार समितीच्या विकासाची ही लढाई - जिल्हाप्रमुख प्रमोद लबडे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २५ : सलग 14 वर्ष खर्चाचे कारण सांगून आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांना कुरण उपलब्ध करून त्यांना राजकारणात वापरण्यासाठी बाजार समितीचे वाटोळे केल्याचा आरोप जिल्हाप्रमुख प्रमोद लबडे यांनी केला. परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ कोपरगाव वारी, धोत्रा येथील मतदारांशी  ते बोलत होते. यावेळी काँग्रेस तालुका प्रमुख आकाश नागरे, तुषार पोटे, नितीन शिंदे उमेदवार संतोष ठक्कर सुनील कोठारी माजी  भारत मोरे असलम शेख उपस्थिती होते,अध्यक्षस्थानी रावसाहेब टेके होते. 1980, 90 च्या दशकात महाराष्ट्र अग्रेसर असलेली भुसार मालासाठी प्रसिद्ध असलेली बाजार समिती हळूहळू कार्यकर्त्यांचा अड्डा बनवून उध्वस्त झाली. उप बाजार समिती राहत्यात ही मुख्य बाजार समिती वर्ग करण्यापर्यंत वेळ आली. याला जबाबदार कोण? बैल बाजारात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार, परवाना नूतनीकरणात भ्रष्टाचार एका दिवाळीत तर कामगारांच्या नावावर कर्ज काढून संचालकांना दिवाळी बोनस वाटला  इतकी वाईट परिस्थितीचा बाजार समितीची झाली. विधानसभेत जिल्हा परिषद पंचायत समिती एकमेकांना विरुद्ध लढायचं. कार्यकर्त्यांनी गावातील, गावपातळीवर संघर्ष कर...

शासकीय योजनेपासून एकही लाभार्थी वंचित राहणार नाही याची काळजी घ्या – आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २५ : शासनाच्या विविध योजनांचा पात्र लाभार्थ्यांना फायदा मिळवून देण्यासाठी तळागाळातील जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांना फायदा मिळवून दिला आहे. यापुढील काळातही प्रत्येक पात्र लाभार्थ्याला शासकीय योजनांचा लाभ मिळवून देवून एकही पात्र लाभार्थी शासकीय योजनेपासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्या अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी महसूल प्रशासनाला दिल्या आहेत. तहसील कार्यालय कोपरगाव येथे सोमवार (दि.२४) रोजी आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते संजय गांधी निराधार योजना, दिव्यागांना दिव्यांग प्रमाणपत्र, नवीन रेशन कार्ड व शालेय विद्यार्थ्यांना जातीचे दाखले वाटप करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पुढे बोलतांना आ. आशुतोष काळे म्हणाले कि, मागील १ वर्षात कोपरगाव तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या ९००० लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळवून दिला आहे.  ४५०० कुटुंबांना नवीन रेशन कार्ड देण्यात आले आहेत. दिव्यांग बांधवांना दिव्यांग प्रमाणपत्र मिळविण्यासाठी होणारी ससेहोलपट थांबविण्यासाठी  पुढाकार घेवून दर महिन्याच्या पहिल्या बुधवारी अहमदनगर जिल्हा रुग्णालयात दिव्यागांन...

शेवगाव तालुक्यातील ६ ग्रामपंचायतीच्या १० रिक्त जागांसाठी पोट निवडणुकी जाहीर

शेवगाव प्रतिनिधी, दि. २४ :  तालुक्यातील ६ ग्रामपंचायतीच्या रिक्त असलेल्या एकूण १० जागांसाठी होणाऱ्या पोट निवडणुकीसाठी मंगळवारी ( दि. २५ ) उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होत आहे.       तालुक्यातील गोळेगाव ग्रामपंचायतीच्या ५ तसेच भागवत एरंडगाव, जुनी खामपिंपरी, दहीगाव शे, अमरापूर व आव्हाणे खुर्द ग्रामपंचायतीच्या प्रत्येकी एका जागेसाठी अशा एकूण ६ ग्रामपंचायतीच्या एकूण १० जागांसाठी पोट निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. दि. २५ एप्रिल ते २ मे या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करणे, दि.३ मे रोजी उमेदवारी अर्जांची छाननी, दि. ८ मे पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्यात येणार असून दि. १८ मे रोजी मतदान व १९ मे रोजी मत मोजणी होवून निकाल जाहीर करण्यात येणार आहे. तालुक्यात सुरु असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या रणधुमाळी बरोबरच तालुक्यातील ६ ग्रामपंचायतीच्या १० जागांसाठी पोट निवडणूक होणार असल्याने वरील ६ गावातील राजकारण ढवळून निघण्यास सुरुवात झाली आहे. यातील अमरापूर ग्रामपंचायत वगळता अन्य ५ ग्राम पंचायतीची मुदत दोन महिन्याने संपणार आहे. त...

खरिप कर्ज प्रकरणे त्वरित मार्गी लावून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा - कॉ. लबडे

शेवगाव प्रतिनिधी, दि. २४ : तालुक्यातील संवेदनाशील आणि राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या अशा खरडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेमधील अनपेक्षित घडामोडीतून निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्यांची खरिप हंगामाची कर्ज प्रकरणे ठप्प झाली आहेत. सहाय्यक निबंधक व जिल्हा सहकारी बँकेच्या तालुका विकास अधिकार्‍यानी त्यातून मार्ग काढावा. खरिप कर्ज प्रकरणे त्वरित मार्गी लावून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी आग्रही मागणी ज्येष्ठ कम्युनिस्ट कार्यकर्ते कॉ. बबनराव लबडे यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.       निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील खरडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या तेरा सदस्यापैकी संस्थेचे व्हाईस चेअरमन छगन साबळे यांचे दोन महिन्यापूर्वी निधन झाले . तर दीड महिन्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या, घुले गटाच्या सहा सदस्यांनी  राजीनामे दिले. उत्वरित सहा सचालक जनशक्ती मंडळाचे असून ते अल्पमतात आले आहेत.      त्यामुळे चालू खरीप हंगामाची  शेतकऱ्यांची सर्व कर्ज प्रकरणे ठप्प झाली आहेत. मागील वर्षाचे अनुदान अद्याप अनेकांना मिळाले नाही. त्यातच नुकत्याच झालेल्या वादळ वारा व गारपीटीने पीका...

संजीवनीच्या विध्यार्थ्यांना रेनाटा प्रिसिझनने दिले ५.५ लाखांचे वार्षिक पॅकेज - अमित कोल्हे

    कोपरगांव प्रतिनिधी, दि. २४ : संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नाने शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मधिल मेकॅनिकल इंजिनिअरींगच्या अंतिम सत्रातील तीन विध्यार्थ्यांची रेनाटा प्रिसिझन काम्पोनंटस् प्रा. लि. पुणे या नामांकित कंपनीने मुलाखती घेतल्या होत्या. या मुलाखतींचा निकाल कंपनीने जाहिर केला असुन यात मेकॅनिकल इंजिनिअरींगच्या विध्यार्थ्यांना  वार्षिक पॅकेज रू ५. ५ लाख देवु करून नोकरीसाठी निवड केल्याचे जाहिर केले. संस्थेच्या ट्रेनिंग अँड  प्लेसमेंटच्या विभागामार्फत या विध्यार्थ्यांना  नेमणुकीचे पत्र बहाल करण्यात आलेे, अशी  माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे. रेनाटा प्रिसिझन काम्पोनंटस् प्रा. लि. या कंपनीने श्रेयश  संभाजी लोहकणेे, शिवकुमार  गुलशन पंजाबी व सत्यम राजेंद्र लासुरे या विद्यार्थ्यांची  निवड केली आहे. हे सर्व विद्यार्थी ग्रामिण भागातील असुन त्यांच्या हातात नोकरीचे नेमणुक पत्र दिले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर  अत्यांनद  दिसत होता.  संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील वि...

डॉ. होमी भाभा वैज्ञानिक स्पर्धेत आत्मा मालीकच्या विवेक निकमची गगणभरारी

 कोपरगाव प्रतिनिधी, दि. २४ : डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेत आत्मा मालिक शैक्षणिक संकुलाचा विद्यार्थी विवेक निरंकार निकम हा  देशात द्वितीय क्रमांक पटकावून रौप्यपदकाचा मानकरी ठरला आहे.  शैक्षणिक वर्षे सन २०२२-२३ या वर्षात करीता डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेचे चे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेसाठी देनभरातून तब्बल ९५ हजार मुलांनी सहभाग घेतला होता. ९५ हजार विद्यार्थ्यांपैकी केवळ २०८ मुलांची निवड झाली त्यात आत्मा मालिक शैक्षणिक संकुलातील आत्मा मालिक सुपर फौंडेशनमधून इयत्ता ९ वीत शिक्षण घेणारा विवेक निरंकार निकम हा या स्पर्धेत रौप्यपदकाचा मानकरी ठरला आहे. विवेक निकम याला आत्मा मालिक शैक्षणिक संकुलाचे प्रमुख व आत्मा मालिक ध्यानपिठ तथा विश्वात्मक जिंकली महाराज आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी,  प्राचार्य निरंजन डांगे, अथर्व फौंडेशन अकॅडमीचे शिवम तिवारी तसेच सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.  विवेक निकम यांच्या यशाबद्दल सद्गुरू ओमगुरुदेव माऊलींच्या आशीर्वादासह संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी, सरचिटणीस हनुमंत भोंगळे, सर्व विश्वस्त, शैक्षणिक संकुलाचे प्रमुख सुधाकर मलीक...

आता राज्यात खडी, वाळु मिळणार किलोवर..!

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २४ : महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यातील वाळुमाफिया व वाळू माफियांना राजाश्रय देणाऱ्यांची कंबरडेच मोडले आहे. वाळू-खडी मुळे राज्यात वाढणारी गुन्हेगारी आणि याच गुन्हेगारीतुन होणारी सर्वसामान्य जनतेची लुट कायमस्वरूपी थांबवण्यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यातील वाळुची संपूर्ण वाहतुक व उपसा पुर्ण बंद केला आहे. येत्या १ में पासुन नवीन शासकीय धोरणानुसार राज्यात वाळु व खाडी विक्रीचा नवा नियम अमलात आणला आहे. येत्या काळात वाळु व खडी हि ब्रास वर विक्री न करता किलोवर अर्थात पानांमध्ये वजन करुन विक्री केली जाणार आहे, अशी माहिती स्वतः महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एका कार्यक्रमाच्या मुलाखतीत दिल्याने भविष्यत खडी व वाळुचे मोजमाप बदलण्याची तयारी सुरु झाली आहे.  राहता तालुका प्रेस क्लबच्यावतीने राहता येथील साध्वी प्रीतिसुधाजी इंटरनॅशनल स्कुलच्या सभागृहात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याहस्ते राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, दिपक निकम, मोहोसिन शेख यांचा गौरव समारंभ व मिट द प्रेस अर्थात प्रकट मुलाखतीचे आयोजन...

भाजपा प्रणित मंडळाचा मंगळवारी प्रचार शुभारंभ - ताराचंद लोढे

शेवगाव प्रतिनिधी, दि . २३ :   शेवगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या होणाऱ्या निवडणूकी करिता  भाजपा प्रणित आदिनाथ शेतकरी विकास मंडळाचा प्रचार शुभारंभ  मंगळवारी (दि. २५ )  सकाळी साडेआठ ला आव्हाणेच्या श्री गणपती मंदिरा जवळ आयोजित करण्यात आल्याची माहिती भाजपा तालुकाध्यक्ष ताराचंद लोढे यांनी दिली.         यावेळी लोढे म्हणाले, शेवगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीकरिता भाजपा, शिवसेना, मनसे व मित्र पक्षाच्या वतीने आदिनाथ शेतकरी मंडळ या आघाडीच्या माध्यमातून बाजार समितीच्या सर्व मतदारसंघातील जागांसाठी प्रामाणिक, विकासाभिमुख व लोकप्रिय उमेदवार देण्यात आले असून या मंडळाच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमासाठी  खासदार डॉ. सुजयदादा विखे पाटील, शेवगाव पाथर्डी मतदारसंघाच्या आमदार मोनिकाताई राजळे, भाजपा जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे, शिवसेना तालुका अध्यक्ष आशुतोष डहाळे, मनसे तालुकाध्यक्ष गणेश रांधवणे तसेच पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.       कृषी उत्पन्न बाजार समिती ही कुणाची मक्तेदारी नसून शेतकऱ्या...

शेवगावमध्ये धार्मिक झेंड्वयारून वाद, शासनाची वेळीच कारवाई

शेवगाव प्रतिनिधी, दि. २३ :  साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेला अक्षय्य तृतीया व रमजान ईद हे दोन्ही उत्सव  शनिवारी ( दि२२ ) तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरे झाले. तर शेवगावात सायंकाळी उशिरा गेल्या काही दिवसात विविध जयंती, धार्मिक उत्सवा निमित्त लावण्यात आलेल्या झेंड्यामुळे निर्माण झालेला काहीसा तणाव पोलिस प्रशासनाने वेळीच केलेल्या कारवाईमुळे निवळला.पोलीस निरीक्षक विलास पुजारी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनी राज्य राखीव दलाच्या तुकड्या व पोलिस बंदोबस्तात चौकातील सर्वच झेंडे काढून टाकले. शेवगावातील सर्वच चौकात व नेवासे, नगर , पैठण  आणि बाजारपेठेतील रस्त्याच्या कडेला वेळोवेळी लावण्यात आलेले विविध रंगाचे झेंडे तसेच होते. त्याबद्दल अनेकांची नाराजी होती. दरम्यान तालुक्यातील दहिफळ येथे झालेल्या किरकोळ वादातून तेथे जातीय तणाव निर्माण झाला होता. त्या संदर्भातील तक्रार देण्यासाठी तेथील लोक पोलीस ठाण्यात आले असता शहरातील दुसरा जमाव अनधिकृत झेंडे काढून टाकण्यासाठी याचवेळी पोलीस ठाण्यात आला. एकाच वेळी दोन समाजाचा जमाव समोरासमोर आल्याने एकमेकात गैरसमजुकीतून तणाव निर्माण झाला. थोडी घोषणाब...

महात्मा बसवेश्वरांच्या विचारांची आजही जगाला गरज - आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २३ : लिंगायत धर्माचे संस्थापक महात्मा बसवेश्वरांनी जातीपातींच्या भिंती गाडून तत्कालीन समाजव्यवस्थेला एक वेगळीच ओळख दिली होती. शोषणविरोधी, भेदभाव विरोधी, जातीभेदा विरोधी, श्रेष्ठ-कनिष्ठ विरोधी समतेची लढाई त्यांनी नुसती लढली नाही तर ती यशस्वी देखील करून दाखवली. अशा धार्मिक, सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक, राजकीय व सामाजिक महान तत्वज्ञानी असणाऱ्या महात्मा बसवेश्वरांच्या विचारांची आजही जगाला गरज असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी केले. कोपरगाव तहसील कार्यालयात जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्त आ. आशुतोष काळे यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवदन केले याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी बोलतांना ते पुढे म्हणाले की,महात्मा बसवेश्वरांनी माणसाला माणसाप्रमाणे वागवा. पशुहत्या करू नका, दया हाच धर्म आहे अशी शिकवण देवून स्त्रीला शुद्र, बहिष्कृत समजले जात असताना स्त्रीयांवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी त्यांनी स्त्रियांसाठी मोठे भरीव कार्य करून स्त्रियांना मत स्वातंत्र्याचा अधिकार दिला व धार्मिक आणि आध्यात्मिक हक्क मिळवून...

सामाजिक ऐक्य व बंधुत्वाची भावना टिकवून ठेवा - बिपीनदादा कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी, दि, २३ : हिंदू, मुस्लिम व इतर सर्व जाती-धर्मांचे सण, उत्सव शांततेत व आनंदात साजरे करण्याची व सामाजिक एकोपा राखण्याची परंपरा माजी मंत्री सहकारमहर्षी स्व. शंकरराव कोल्हे  यांनी साठ वर्षांपूर्वी कोपरगाव शहर व तालुक्यात सुरू केली. ही परंपरा जपण्याचे काम आजही कोल्हे कुटुंब करत आहे. सर्व समाजबांधवांनी परस्परांविषयी द्वेष न बाळगता सामाजिक ऐक्य व बंधुत्वाची भावना टिकवून ठेवावी, असे आवाहन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी केले. प्रेम आणि बंधुभावाचे प्रतीक असलेला रमजान ईद अर्थात ‘ईद-उल-फित्र’ चा सण शनिवारी कोपरगाव शहर व तालुक्यात मोठ्या हर्षोल्हासात साजरा करण्यात आला.   रमजान ईदनिमित्त कोपरगाव शहरातील ईदगाह मैदानावर  रमजान ईदची विशेष नमाज सामुदायिकरीत्या अदा केली.  नमाजपठण झाल्यानंतर संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी मुस्लिम समाजबांधवांची गळाभेट घेत त्यांना रमजानच्या तसेच आज अक्षय तृतीया, भगवान परशुराम व महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त त्यांनी सर्व हिंदू बांधवांना शुभेच्छा दिल्या. यावेळी बिपीनदादा कोल्हे म्हणाले, इस्लाम धर्मात रमजान मह...

रमजान ईदच्या मुहार्तावर अक्सा मस्जिद सभामंडप व सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २३ : मुस्लिम बांधवांना अतिशय प्रिय असणाऱ्या पवित्र रमजान ईदच्या सणाचे औचित्य साधत आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरातील अक्सा मस्जिदच्या २५ लक्ष रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या सभामंडप बांधकाम व मस्जिद सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन करून मुस्लिम बांधवांना अनोखी भेट देत त्यांचा आनंद द्विगुणित केला.यावेळी आ.आशुतोष काळे यांनी सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी आ.आशुतोष काळे म्हणाले की,उन्हाचा पारा चढलेला असतांना अंगाची होणारी लाहीलाही, घशाला पडणारी कोरड अशा परिस्थितीत पवित्र रमजान महिन्यात रमजानचे रोजे पाळणं हे मोठ दिव्य दरवर्षी मुस्लीम बांधव पार पाडून अल्लाहचे आशीर्वाद घेतात. ईद पवित्र रमजान महिन्याचा शेवटचा दिवस. ‘रमजान ईद’ च्या दिवशी मुस्लीम बांधवांनी शुद्ध आचरण, शुद्ध आचार व विचारातून मनोभावे केलेले सामुदायिक नमाज पठण करून केलेली पार्थना निश्चितपणे अल्लाह पर्यंत पोहणार आहे. अल्लाहने हि प्रार्थना स्वीकारून सर्व मुस्लीम बांधवांना त्यांच्या जीवनात नेहमीच सुख-शांती देवून त्यांना दिर्घायुरोग्य लाभावे अशा शुभेच्छा आ. आशुतोष काळे यांनी मुस्लीम बांधवां...

कोपरगाव तालुका शेतकरी कृती समितीच्या पाठपुरवठ्यास यश

महाराष्ट्र राज्यातील सध्याचे असणारे सरकार यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांद्याचे बाजारभाव कमी झाल्यामुळे व त्याचा फटका राज्यातील शेतकऱ्यांना बसला आहे हे ओळखून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी राज्याच्या अर्थ-संकल्पीय अधिवेशन, मुंबई इथे महारष्ट्र राज्यातील सर्व कांदा उत्पादकांना प्रती क्विटल ३५० रुपये प्रमाणे प्रती शेतकरी २०० क्विंटलपर्यंत व दिनांक १ फेब्रुवारी २०२३ ते ३१ मार्च २०२३ दरम्यान विक्री केलेल्या सर्व कांद्यास अनुदान जाहीर करून त्याचा तातडीने शासन निर्णय क्रमांक:सपस-२०२३/प्र.क्र६७/२४स प्रमाणे प्रसिद्ध केला होता. परंतु दिनांक १३-४-२०२३ रोजी मा.पणन संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी काढलेल्या परिपत्रकात नमूद करण्यात आलेल्या अट न. २ प्रमाणे “७-१२ उताऱ्यावर सन २०२२-२०२३ या वर्षातील लेट खरीप हंगामातील कांद्याची ई-पिक पेरा ची नोंद असणे आवश्यक आहे. तलाठ्याने हाताने लिहिलेल्या ई-पिक पेरा ची नोंद विचारात घेण्यात येवू नये.”           सदरची गंभीर बाब कोपरगाव तालुका शेतकरी कृती समितीच्या लक्ष्यात आल्यावर तातडीने दिनांक १४-४-२०२३ रोजी महाराष्ट्र राज्याचे ...

प्रत्येक व्यक्तीने रक्तदान केले पाहिजे - प्रा.लक्ष्मण बिटाळ

शेवगाव प्रतिनिधी, दि. २२ :   विज्ञानाने कितीही प्रगती केली तरी आजपर्यंत रक्त तयार करता आले नाही. त्या वरून रक्तदानाचे  श्रेष्ठत्व अधोरखित होते. म्हणून प्रत्येकाने ते केले पाहिजे. असे आवाहन आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे प्रशासकीय अधिकारी प्रा.लक्ष्मण बिटाळ यांनी  केले. शुक्रवारी दि(२१)  कर्मयोगी आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे प्रमुख अॅड. डॉ.विद्याधर उर्फ शिवाजीराव काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त निर्मलाताई काकडे आर्ट्स कॉमर्स & सायन्स कॉलेज शेवगाव येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.        कार्यक्रमासाठी प्रशासकीय अधिकारी दीपक पाटील, शैक्षणिक समूहाचे विश्वस्त पृथ्वीसिंह काकडे,  जगन्नाथ गावडे, योगेश घोरपडे, डॉ.संजय लड्डा, डॉ.मनोज पूरनाळे,  अंजली चिंतामण, वंदना पुजारी,  प्राचार्य डॉ.प्रशांत दुकळे  अर्पण ब्लड बँकचे अध्यक्ष डॉ.नरेंद्र पाटील, भाग्यश्री पवार. सुषमा वैद्य, सुधीर माले उपस्थितीत होते.        प्रा.बिटाळ म्हणाले, आयुष्यात अनेकदा अचानक संकटे येतात. अनेकदा .रुग्णांना वेळेवर रक्त न मिळाल्याने रुग्ण दगावतात.  त्यामुळे ...

ऊस उत्पादन वाढीसाठी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याची जागरूकता - बिपीनदादा कोल्हे

 कोपरगाव प्रतिनिधी, दि. २२ : सध्याचा काळ स्पर्धेचा आहे. दिवसेंदिवस उसाचे प्रतिएकरी उत्पादन आणि साखर उतारा घटतो आहे त्यासाठी शेतक-यांनी नेमकेपणाने काय केल्याने उसाचे प्रति एकरी उत्पादन वाढेल यासाठी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने सतत जागरूकता ठेवुन त्यानुरूप कार्यक्षेत्रातील सभासद शेतक-यांना उस विकासात्मक कालबध्द कार्यक्रम आखून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी शेतक-यांच्या बांधावर केली जात असल्याचे प्रतिपादन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी केले. कारखान्याच्या उस विकास विभागाअंतर्गत प्रत्येक गटात प्रयोगशिल शेतकरी निवडुन त्यांचे उस उत्पादन वाढीचे नियोजन हाती घेतल्याचेही ते म्हणाले.             सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना व डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कारखाना कार्यस्थळावर शुक्रवारी शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी ते बोलत होते.              या मेळाव्यात उस शास्त्रज्ञ डॉ. सुरेश पवार, डॉ. बाळकृष्ण जमदग्नी, डॉ. निळकं...