Posts

Showing posts from February, 2023

लक्ष्मीनगरच्या नागरिकांना उतारे मिळण्यासाठी पुढील कार्यवाही तातडीने सुरू करा - आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २८ : कोपरगाव नगरपरिषद हद्दीत असलेल्या लक्ष्मीनगर भागतील सर्वे नंबर ११३ व ११४ मधील शासकीय जागेवरील वास्तव्यास असलेल्या कुटुंबांचे अतिक्रमण नियमानुकुल होवून ती जागा त्या कुटुंबांच्या नावावर होण्यासाठी पुढील कार्यवाही तातडीने सुरू करावी अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे दिलेल्या लेखी निवेदनात केली आहे. दिलेल्या निवेदनात आ.आशुतोष काळे यांनी पुढे असे म्हटले आहे की, मागील अनेक वर्षापासून कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगरच्या शासकीय जागेवरील अतिक्रमण नियमानुकुल करण्याचा प्रश्न प्रलंबित होता.त्याबाबत सातत्याने केलेल्या पाठपुराव्यातून  सर्वे नंबर ११३ व ११४ मधील लक्ष्मीनगर भागात अतिक्रमण नियमानुकुल करण्याबाबतचा प्रस्ताव कोपरगाव नगरपरिषदेकडून जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल करण्यात आला होता. यामध्ये लक्ष्मीनगर भागातील शासकीय जागेवरील अतिक्रमणे नियमानुकूल करून करणेबाबत सुधारित प्रस्ताव तयार करून त्यामधील रस्ता, रुंदी, खोली जागा, सुविधा क्षेत्र व भूखंड क्षेत्र या बाबीसाठी शिथिलता मिळण्याबाबत देखील विहीत मार्गाने सहाय्यक संचालक, नगर रचना अहमदनगर शाख...

गंगामाईने केले २४ तासात गाळप सुरु

शेवगाव प्रतिनिधी, दि.२८ : गंगामाई साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाला लागलेल्या आगीत सुदैवाने जिवीत हानी झाली नाही. मात्र प्रकल्पाचे कोटयावधीचे आर्थिक नुकसान झाले. तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज मंगळवारी प्रकल्पाच्या नुकसानीची माहिती घेऊन अशा संकट प्रसंगी शेतकरी संघटना, गंगामाई कारखाना प्रशासना बरोबर असल्याची ग्वाही दिली.        इथेनॉल प्रकल्पाला लागलेल्या आगीमुळे साखर कारखान्याची गव्हाण बंद पडली. ऊस घेऊन आलेल्या बैलगाडया, ट्रॅक्टर, ट्रका आदि वाहने अडकून पडल्याने सर्व यंत्रणा ठप्प झाली. मात्र या परीस्थितही कारखाना प्रशासनाने उस उत्पादक   शेतक-यांचे आर्थिक भवितव्य लक्षात घेवून बंद पडलेले गाळप तातडीने पुन्हा सुरु करून शेतक-यांना मोठा आधार दिला.      यावेळी स्वभिमानीचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब लवांडे म्हणाले, घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे, कारखान्याचे चेअरमन मधुकर अण्णा मुळे व कार्यकारी संचालक रणजीत मुळे यांनी अतिशय संयमाने व धैर्याने ह्या बिकट परिस्थितीला हाताळले असून कारखाना २४ तासाच्या आत पुन्हा सुरू करून शेतकरी व कामगार हिताचा निर्णय घेतला.  कारखाना प्रशा...

मराठी भाषा व संस्कृतीचे संवर्धन व्हायला हवे - न्या. जागूष्टे

शेवगाव प्रतिनिधी, दि. २७ :   मराठी भाषेचा गोडवा काही न्याराच, अद्वितीय असा आहे. मराठी भाषेसारखी समृद्ध भाषा अन्य दुसरी नाही. म्हणून मराठी भाषेचे आणि मराठी संस्कृतीचे संवर्धन करणे आपणा सर्वांचे कर्तव्य असल्याचे प्रतिपादन शेवगावच्या  दिवाणी न्यायाधीश श्रीमती संजना जागुष्टे यांनी केले आहे.        तालुका विधी सेवा समिती आणि तालुका वकील संघ शेवगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आज सोमवारी न्यायालयाच्या प्रांगणात आयोजित ‘मराठी राजभाषा ‘ दिनाच्या कार्यक्रमात त्या अध्यक्ष पदावरून बोलत होत्या.      न्यायाधीश जागुष्टे म्हणाल्या ,राष्ट्रपतींना राजभाषेचा दर्जा देण्याचा घटना प्राप्त अधिकार आहे. २१ जानेवारी २०२३ ला महाराष्ट्र सरकारच्या निर्देशानुसार ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ मराठी साहित्यिक, कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून ,त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून २७ फेब्रुवारी ‘मराठी राजभाषा दिन ‘ म्हणून सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात  येत आहे. असे सांगून शेवटी त्यांनी, ‘ फक्त लढ म्हणा ‘ ही कवी कुसुमग्रजाची कविता गाऊन त्यांना विनम्र अभिवादन केले.    ...

ग्रंथ वाचनाने विचार प्रगल्भ होतात - मच्छिंद्र महाराज भोसले

शेवगाव प्रतिनिधी, दि. २८: वाचनाने माणसाच्या ज्ञानात भर पडते. विचार प्रगल्भ होतात. म्हणून रोज काही ना काही वाचत राहिले पाहिजे. वाचनाने आपली सारासार विचार करण्याची शक्ति वाढते. म्हणूनच ‘वाचाल तर वाचाल ‘ असे म्हटले जाते. त्यात निश्चीत तथ्य आहे. असे प्रतिपादन मच्छिंद्र महाराज भोसले यांनी केले.       शिवजयंतीचे औचित्य साधून श्री संत नागेबाबा परिवार  रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत येथील नागेबाबा मल्टिस्टेट पतसंस्थेच्या  शाखेत आयोजित पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन  ह.भ. प.मच्छिंद्र महाराज भोसले यांच्या शुभहस्ते आज मंगळवारी ( दि२८ ) करण्यात आले. यावेळी भोसले महाराज बोलत होते.      यावेळी नागेबाबाचे शाखाधिकारी शांताराम सुसे यांनी सर्वाचे स्वागत करुन प्रास्ताविक केले. सुसे म्हणाले, संस्थेचे संस्थापक कडू भाऊ काळे यांच्या संकल्पनेतून आपल्या परिवारातील प्रत्येक व्यक्ती वैचारिक शारीरिक, मानसिक, आर्थिक , सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या सक्षम व्हावा यासाठी नागेबाबा परिवार  सातत्याने कार्यरत आहे. ग्रंथप्रदर्शन हा त्याचाच एक भाग आहे. या व्यतिरीक्त रक्तदान शिबिर, मोफत ...

बालमटाकळी ते शिर्डी साईबाबा पालखीचे प्रस्थान

शेवगाव प्रतिनिधी, दि. २८ : तालुक्यातील बालमटाकळीच्या ओमसाई सामाजिक प्रतिष्ठान आयोजित बालमटाकळी ते शिर्डी साई बाबा पायी पालखीचे आज मंगळवारी ( दि २८ )मोठ्या उत्साहात प्रस्थान झाले.      सकाळी १० वाजता श्रीराम मंदिरापासून  ग्रामपंचायत सदस्य धनंजय देशमुख व स्मिताताई देशमुख, प्रतिष्ठानचे प्रमुख नारायणराव आंदूरे ,उपाध्यक्ष सोपान कडूळे यांच्या हस्ते पालखी पुजन होऊन जेष्ठ नेते सुदामराव शिंदे यांच्या हस्ते पालखीचे प्रस्थान करण्यात आले . यावेळी  फटाक्याची आतषबाजी करत व सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात आली.  पालखी मार्ग सडा, रांगोळीने सजला होता. ठिकठिकाणी पालखी पुजा, महंत पुजा करण्यात आली. पालखी विसाव्यासाठी बोधेगाव येथील साईधाम मंदिरात  आल्यानंतर तेथे  शिवरंग उद्योग समूहाचे संस्थापक, अध्यक्ष तथा सावता परिषदेचे प्रदेशाध्यक्ष मयुरराजे वैद्य तसेच जयशाली वैद्य यांच्या हस्ते मध्यान आरती करण्यात आली. उपस्थित मान्यवरांचा साईशाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच महाप्रसाद घेऊन पालखी सोहळा मार्गस्थ झाला.        यावेळी बालमटाकळी सेवा संस्थेचे चेअरमन हरीश्चद्रराजे घाडगे,  बळीराम दरेकर, विष्णू घाडगे, ज्ञ...

भाषा टिकली तर संस्कृती टिकेल - जाधव

शेवगाव प्रतिनिधी, दि. २८ : ज्ञानेश्वर माऊलीनी मराठी रूजविली, छत्रपती शिवरायांनी परकीय आक्रमणात तिचं संरक्षण करून वाचवली, तर संतांनी आपल्या भजन, कीर्तन प्रवचन,भारूड,ओव्या यातून मायमराठीला समृध्द केले. मराठी लेखक, कवी, नाटककार यांनी तिला मोठे केले अशा भाषेचा वारसा व संस्कृती टिकली पाहिजे. भाषा टिकली तर संस्कृती टिकेल असे प्रतिपादन कैलास जाधव यांनी केले.         तालुक्यातील श्री.गजानन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आव्हाने येथे मराठी राजभाषा दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य रमेश लांडे  होते.  यावेळी प्रांजली खैरे, सिध्दी आरेकर, संस्कृती मुटकुळे, प्रतिक्षा वाणी, आहेर श्रावणी, सिध्दी कळमकर, पानसरे सायली, वैष्णवी औटी या विद्यार्थ्यांनी भाषणे झाली. निशा तळेकरने महाराष्ट गीत गर्जा महाराष्ट्र माझा, समृध्दी दिवटे हीने माय मराठी कविता, बल सागर भारत होवो हे गीत सुप्रिया थोरात व गंगुबाई दिंडे यांनी तर आई मायेचा सागर भारती खर्डे हिने गायले. तसेच म्हणी, उखाणे, सुविचार, अभंग असा भरगच्च कार्यक्रम यावेळी घेण्यात आला.

दोघां मोटरसायकलस्वारांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू

शेवगाव प्रतिनिधी, दि. २८ : येथील नेवासे रस्त्यावरील गुंफा गावाच्या दत्तपाटी जवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जणाचा जागेवर तर एक जणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मनोज शामराव खरड (वय २६) व विशाल मच्छिंद्र फाटके ( वय२१) रा. देवटाकळी असे मृतांची नांवे आहेत.         मोटरसायकल क्रमांक एम एच १६ डी डी ४५९६ या गाडीवरून शेवगाव कडे जात असताना, रात्री दहाच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये मनोज खरड याचा जागेवर मुत्यु झाला. तर बक्तरपुर येथील विशाल फाटके या जखमीला नागरिकांनी उपचारासाठी अहमदनगर येथे दाखल केले होते. मात्र, उपचार दरम्यान त्याचाही रविवारी मृत्यू झाला. त्यामुळे देवटाकळी व बक्तरपुर गावावर शोककळा पसरली. पोलीसात अकस्मात गुन्हाची नोंद करण्यात आली. गंगामाई साखर कारखान्याला लागलेली आग बघण्यासाठी ते चालले होते असे त्यांच्या गावातून सांगण्यात आले आहे. 

शेवगाव नगर परिषदेला उच्च न्यायालयाचा कौल

शेवगाव प्रतिनिधी, दि. २८ : येथील प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या वतीने शेवगाव नगरपरिषदे विरुद्ध उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेली याचिका फेटाळत बत्तीस लाख रुपये नगरपरिषदेला काढून घेण्याचे आदेश औरंगाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मंगेश पाटील व न्यायमूर्ती एस.जी चपळगावकर यांनी दिले.       शेवगाव नगर परिषदेच्यावतीने नगरपरिषद हद्दीत असलेल्या प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या एकनाथ आयुर्वेदिक कॉलेज व एकनाथ आयुर्वेदिक रुग्णालयात यांच्या कडे सन २०१८ मध्ये जागेची मोजणी करून मालमत्ता कराची  ३२लाख रुपयांची मागणी केली असता प्रवरा मेडिकल ट्रस्टने मालमत्ता कर माफ असल्याचे शेवगाव नगरपरिषदेला कळविले होते. परंतु कोणत्या कायद्याने ट्रस्टला हा मालमत्ता कर माफ आहे याचा खुलासा केला नाही म्हणून नगरपरिषदेने ट्रस्टला मालमत्ता जप्तीची नोटीस बजावली. त्या विरुद्ध ट्रस्टने जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्याकडे अपिल दाखल केले परंतु हे अपिल मेंटनेबल नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी डिसमिस केले. त्या विरूद्ध प्रवरा मेडिकल ट्रस्टने उच्य न्यायालय औरंगाबाद खंडपीठात दि. १९ डिसेंबर २०१९ रोजी स्टे मिळवला. त्यानंतर नगरपरिषदेच्या व...

संजीवनी पाॅलीटेक्निकचा क्रिश पोरवाल ९६ टक्के गुण मिळवुन सर्व प्रथम

कोपरगांव प्रतिनिधी, दि. २८ : महाराष्ट्र  राज्य तंत्र शिक्षण परीक्षा मंडळाने जानेवारी 2023 मध्ये प्रथम वर्ष ते तृतिय वर्षांच्या विषम सत्राच्या घेतलेल्या हिवाळी परीक्षांचे निकाल जाहिर केले असुन यात संजीवनी के.बी.पी. पाॅलीटेक्निकने उत्कृष्ट  निकालाची परंपरा कायम राखली आहे. या परीक्षेत काॅम्प्युटर टेक्नाॅलाॅजी विभागातील पाचव्या सत्रातील क्रिश  भरत पोरवालने ९६ टक्के असे विक्रमी गुण मिळवुन पाॅलीटेक्निक मध्ये सर्व प्रथम गुणानुक्रमाने उत्तिर्ण होण्याचा बहुमान मिळवुन संजीवनीचा सर्वोत्कृष्ट शैक्षणिक  दर्जा अधोरखित केला आहे, अशी  माहिती प्राचार्य ए. आर. मिरीकर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे. पत्रकात प्रा. मिरीकर यांनी पुढे म्हटले आहे की व्यवस्थापनाच्या मार्गदर्शनाखाली सर्वगुण संपन्न नागरीक घडविण्याचा प्रयत्न केला जातो. विद्यार्थ्यांमध्ये प्रत्येक चांगल्या पैलुची रूजवण व्हावी, यासाठी जाणिवपुर्वक प्रयत्क केले जातात, मात्र यातही शैक्षणिक दर्जाकडे विशेष  लक्ष पुरविल्या जाते, यामुळे तांत्रिक शैक्षणिक  जगतात संजीवनी पाॅलीटेक्निकने विविध क्षेत्रात आपले नाव उंचावले आहे. अलिकडेच झालेल्या हिवाळी पर...

आमदार काळे यांच्या हस्ते मयताच्या वारसास ४ लाखाचा धनादेश

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २८ :  कोपरगाव तालुक्यातील गौतमनगर येथील पद्मविभुषण डॉ. शरदचंद्रजी पवार साहेब  नागरी सहकारी पतसंस्थेचे कोपरगाव तालुक्यातील जवळके येथील कर्जदार गोविंद काशिनाथ पन्हाळे यांचे अपघाती निधन झाले होते. त्यांच्या वारसास ४ लाख रुपयांचा धनादेश नुकताच आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते त्यांच्या वारसांना देण्यात आला. संस्थेचे मार्गदर्शक मा.आ.अशोकराव काळे व आमदार आशुतोष काळे यांच्या सूचनेनुसार पद्मविभुषण डॉ. शरदचंद्रजी पवार नागरी सहकारी पतसंस्थेने संस्थेच्या कर्जदारांचा ओरीएंटल इंशुरन्स कंपनीकडून विमा उतरविला आहे. संस्थेचे कोपरगाव तालुक्यातील जवळके येथील मयत कर्जदार गोविंद काशिनाथ पन्हाळे यांचा देखील संस्थेने रु.५,००,०००/- रुपयांचा विमा उतरविलेला होता. कर्जदार गोविंद काशिनाथ पन्हाळे यांचे अपघाती निधनानंतर संस्थेने ओरीएंटल इंशुरन्स कंपनीकडे विमा पॉलिसीची भरपाई मिळावी यासाठी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता केली होती. ओरीएंटल इंशुरन्स कंपनीने त्या...

मैदानात खिलाडूवृत्ती जोपासा – चैतालीताई काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि २८ : कोणत्याही स्पर्धेत हार-जीत हा त्या स्पर्धेचा एक भाग असून स्पर्धेत हार जीत ठरलेली असते. त्यामुळे मिळालेल्या यशाने हुरळून जावू नका व अपयशाने खचून जावू नका. स्पर्धेत यश-अपयश येणारच मात्र त्याचा विचार न करता मैदानात नेहमी खिलाडूवृत्ती जोपासा असा मौलिक सल्ला जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका सौ. चैतालीताई काळे यांनी दिला. कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथे वाल्मिकआप्पा कोळपे युवा प्रतिष्ठाण आयोजित आमदार चषक २०२३, सुरेगाव प्रीमिअर लीग भव्य प्लॅस्टिक बॉल क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन नुकतेच जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका सौ. चैतालीताई काळे यांच्या शुभहस्ते पार पडले.याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी सुरेगाव येथील कु. आकांक्षा वायकर हिने मुंबई येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील कराटे स्पर्धेत सुवर्णपदक मिळविल्याबद्दल सौ.चैतालीताई काळे यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष वाल्मिकराव कोळपे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सूर्यभान कोळपे, माजी संचालक राजेंद्र मेहेरखांब, सुरेगावचे सरपंच शशिकांत वाबळे, माजी सरपंच सौ. स...

अर्धवट खोदून ठेवलेला खंदकनाला बनला मृत्यूचा सापळा - मंगेश पाटील

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २८ : रोज अंधारात पहाटे ५ वाजता कोपरगावकरांसाठी रोजचा भाजीपाला लिलाव या नाल्या जवळील असलेल्या मार्केटच्या जागेत भरतो. पहाटे आंधारात शेतकरी, व्यापारी याच्या छोट्या मालवाहतूक रिक्षा, टेम्पो, मोटरसायकल या नाल्याला खेटून मोठ्या प्रमाणात जात असतात.  दोन रिक्षा ही बसत नाही या रस्त्याहून त्यांमुळे नाल्यात रिक्षा, टेम्पो, मोटरसायकल वर भाजीपाला आणणारे पलटी होऊन, सरकून, घसरून अपघात, जीवित हानी होऊ शकतो. काही महिन्यांपूर्वी खंदकनाल्या मुळे काही भागात पावसाळ्यात पाणी घरात घुसुन पुरग्रस्त परिस्थिती झाली होती आणि अनेक गोरगरीबांचे कुटुंबांची नुकसान होऊन आर्थिक परिस्थिती बिकट झाली. अशी परिस्थिती परत येऊ नये म्हणुन  नगरपालिका प्रशासनाने खंदकनाला रूंद व खोल करण्यात आला. या खोदकामात आज हि अपुर्णता आहे.    नाल्यातील दोन पाईप काढले गेलेच नाही आणि खोदकाम झाल्यावर त्या खोदकामाची काही माती त्या नाल्या शेजारी आहे जी आता वाळुन परत नाल्यात जात आहे आणि नाल्याची किनार हि भुईसपाट होत आहे. त्यामुळे सदर नाल्या शेजारून जी रहिवासी व उद्योगाची संदर्भातील व्यापारी बांधवांची येथुन मोठ्या वाहनांची वर्...

श्रीक्षेत्र चासनळी ते पैठण पायी दिंडी सोहळा

 कोपरगांव प्रतिनिधी, दि. २७ : तालुक्यातील श्रीक्षेत्र चासनळी ते पैठण पायी दिंडी सोहळा सालाबादप्रमाणे याही वर्षी २ ते १४ मार्च दरम्यान आयोजित केला असुन त्याचे हे तिसावे वर्ष असल्यची माहिती संस्थापक ह. भ. प. बाबुराव महाराज चांदगुडे यांनी दिली.     चांदगुडे म्हणाले की, अध्यात्माची सांगड विज्ञानाबरोबर घालुन त्यातुन वारकरी सांप्रदायाचा प्रसार करून संत एकनाथांचे विचार जनसामान्यांपर्यंत नेण्याचा हा प्रयत्न आहे. या दिंडीत असंख्य अबाल वृध्द वारकरी सहभागी होत असतात. १४ मार्च रोजी पैठण येथे बाजार समिती लहेरसिंग चौहान आडत दुकान येथे दिंडी उतरणार आहे. या दिंडीतुन ग्रामस्वच्छता, व्यसनमुक्ती, जलसाक्षरता, पर्यावरण संरक्षण, बेटी बचाओ बेटी पढाओ, हुंडाबंदी, आत्मनिर्भरता, प्रौढशिक्षण, स्पर्धात्मक परिक्षा जनजागरण, अंधश्रध्दा निर्मुलन, भ्रमणध्वनी अभासी तंत्राचा वाढत्या वापरातुन निर्माण होणा-या समस्याबाबत जनजागृती असे विविध उपक्रम राबविले जातात, या कार्याला असंख्य वारकरी बांधव तसेच समाजातील विविध दानशुर व्यक्तींचे पाठबळ मिळत आहे.

मायगाव देवीच्या पाणी पुरवठा योजनेचा आमदार काळेंनी घेतला आढावा

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २७ : कोपरगाव तालुक्यातील मायगाव देवी येथे ९.१० लक्ष रुपये निधीतुन करण्यात येणाऱ्या श्री मारुती मंदीर ते स्मशानभूमी रस्ता काँक्रीटीकरण कामाचे भूमिपूजन आणि ५ लक्ष रुपये निधीतून करण्यात आलेल्या सामाजिक सभागृह व अंगणवाडी समोरील रस्ता व १६.७५ लक्ष रुपये निधीतून फिजिकल फिटनेस रिक्रिएशन संकल्पनेवर आधारित क्रिडा साहित्याचा लोकार्पण सोहळा नुकताच आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते संपन्न झाला असून यावेळी त्यांनी ७.६५ कोटीच्या पाणी योजनेचा आढावा घेवून नियोजित पाणी योजनेच्या तळ्याची पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. ते म्हणाले की, मागील अनेक वर्षापासून कोपरगाव मतदार संघातील अनेक गावांबरोबरच मायगाव देवीचा देखील पाणी प्रश्न प्रलंबित होता.नागरिकांना विशेषत महिला भगिनींना होणारी अडचण लक्षात घेवून मतदार संघातील इतर गावांबरोबरच मायगाव देवीचा देखील पाणी प्रश्न सोडविण्यात यश आले याचा मनस्वी आनंद वाटतो. ही पाणी योजनेच्या माध्यमातून नागरिकांना नियमित पाणी पुरवठा होण्यासाठी या पाणी योजनेचे तळे ज्या ठिकाणी प्रस्तावित आहे त्या ठिकाणी या तळ्याला भविष्यात कोणताही धोका होणार नाही याची का...

श्री.जनार्दन स्वामी हाॕस्पीटल व ब्राह्यण सभा आयोजित रोगनिदान शिबिरात २८० रुग्णांची तपासणी

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २६ : ब्राह्यण सभा, कोपरगांव आणि श्री.जनार्दन स्वामी हाॕस्पीटल यांच्या संयुक्त विदयमाने शहरातील सर्वासाठी सर्व रोग निदान शिबिर आयोजित केले होते. या शिबिराचे उदघाटन शिर्डी येथिल मानसोपचार तज्ञ डाॕ.ओंकार प्रबोध जोशी यांचे हस्ते झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी एस.जे.एस.हाॕस्पीटलचे संस्थापक चांगदेव कातकडे होते.  या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष संजय सातभाई,सौ.ऐश्वर्यालक्ष्मी सातभाई, माजी उपनगराध्यक्ष सुधाप्पा कुलकर्णी , प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक प्रसाद नाईक, डाॕ.रविंद्र कुलकर्णी,डाॕ.प्रिया जोशी, डाॕ.अनिकेत कुलकर्णी, डाॕ.शंतनु कुलकर्णी, एस.एस.बागडे उपस्थित होते.   ब्राह्यण सभेच्या या उपक्रमाला आम्ही कायमच सहकार्य करु असे स्पष्ट करुन एस.जे.एस.हाॕस्पीटल मध्ये आधुनिक मशिनरी द्वारे रुग्णांची तपासणी होत असुन नुकतेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कर्करोग तपासणी तज्ञ डाॕक्टर्स च्या मदतीने होणार असल्याचे सांगितले. श्री.चांगदेव कातकडे यांनी सांगितले. डाॕ.ओंकार जोशी यांनी ब्राह्यण सभेचा हा उपक्रम स्तुत्त यापुढे मनः शांतीसाठी मानसोपचार शिबिर...

आदिवासी विद्यार्थ्यांच्या तक्रारीचे ८ दिवसात निराकरण व्हावे - चव्हाण

शेवगाव प्रतिनिधी, दि. २६ : प्रवरा मेडीकल ट्रस्ट संचलित येथील शेवगाव इंग्लिश मेडीयम स्कुल अँण्ड जुनिअर काँलजमध्ये इयत्ता ११ वीच्या १०५ आदिवासी विदयार्थ्यांनी रात्री उशीरा वस्तीगृह सोडून पायी नाशिक येथील आदिवासी आयुक्त कार्यालयास जाण्याची वाट धरली. एकच खळबळ उडाली. महाविदयालयात या विद्यार्थ्यांची गैरसोय होत असून शासनाच्या निकषाप्रमाणे सोयी सुविधा दिल्या जात नसल्याच्या तक्रारीवरून या विदयार्थ्यांचा उद्रेक झाल्याची या विद्यार्थ्याची भूमिका होती. रात्री उशीरा पोलीस, आदिवासी प्रकल्प विभागाचे अधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी या विदयार्थ्यांची समजूत काढली व पहाटे विदयार्थी पुन्हा महाविदयालयात परतले.      आदिवासी विदयार्थ्यांना इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मिळावे म्हणून राज्यातून अडीच हजार आदिवासी विदयार्थी निवडून त्यांना वेगवेगळ्या शाळेत पाठवले जाते. शेवगाव येथे नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव या भागातील सुमारे १२५ विदयार्थी व २५ विदयार्थीनी अशी १५० विदयार्थी येथे आहेत. या विदयार्थ्यांना राहण्या जेवणासह सर्व सुविधा पुरविल्या जाव्यात असे असताना विद्यार्थ्यांनी पिण्याच्या पाण्याची योग्य सुविधा नसल्यान...

आईवडिलांचा सांभळ करणे ही भारतीय संस्कृती - राम शिंदे

शेवगाव प्रतिनिधी, दि. २५ : कुटूंबासाठी व मुलांसाठी झटणाऱ्या वयोवृद्ध आईवडिलांचा सांभाळ करणे ही भारतीय संस्कृती आहे. त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी त्यांचा सन्मान होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री, आमदार राम शिंदे यांनी केले. तालुक्यातील आव्हाणे बुद्रुक येथे आयोजित बलभीम कोळगे व अवंतिका कोळगे यांच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्यात ते बोलत होते.       खासदार डॉ. सुजय विखे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. आमदार मोनिकाताई राजळे, सोमेश्वर महाराज गवळी, भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे,सुवेंद्र गांधी,जेष्ठ नेते दिलीपराव लांडे,राष्ट्रवादी युवकचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे,सरपंच संगिता कोळगे,बाळासाहेब सोनवणे,बबन भुसारी,अंबादास कळमकर,कचरू चोथे,उमेश भालसिंग, बापुसाहेब पाटेकर, बापुसाहेब भोसले,सुभाष भागवत,सागर फडके,अमोल सागडे,बाळासाहेब आव्हाड, सोमनाथ कळमकर,तुषार पुरनाळे , संदिप वाणी, अनिल खैरे आदी प्रमुख उपस्थित होते.      यावेळी खा.विखे म्हणाले, जुन्या पिढीतील जाणत्या व्यक्तींमुळे कुटुंब, गाव व समाजात एकोपा टिकून आहे. हे त्या पिढीचे मोठे योगदान आहे. कोळगे यांच्यामुळे भाजपमधील चार गट ए...

मतभेद विसरून लोकशाही टिकविण्यासाठी कार्य करावे - माजी मंत्री हंडोरे

शेवगाव प्रतिनिधी, दि. २६ : आपापसातील गटतट व मतभेद विसरून कार्यकर्त्यांनी एकजुटीने लोकशाही टिकविण्यासाठी कार्य करावे असे आवाहान भीमशक्ती संघटनेचे संस्थापक तथा माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी केले.       येथील अजिंक्य लॉन्स येथे पार पडलेल्या ‘कार्यकर्ता जागृती ‘  मेळाव्यात ते बोलत होते.   हंडोरे म्हणाले, चळवळीतील कार्यकर्ता तयार होण्याला मोठा कालावधी लागतो. कार्यकर्त्यांना आलेली मरगळ झटकून टाकून परिसरातील गोरगरिबांच्या समस्या व प्रश्नांच्या पाठपुराव्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रसंगी जनआंदोलनाची भूमिका घेवून कार्यकर्त्यांनी समाजाच्या प्रती जागरूक रहावे.       यावेळी माजी जिप सदस्य, पँन्थर नेते पवनकुमार साळवे, यांचा कालकथित सामाजिक कार्यकर्ते आनंद बाबा मगर सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार देवून प्रमुख अतिथींच्या हस्ते सन्मान करण्यात आला. धम्मपाल कांडेकर, भाऊसाहेब साठे, देवराम सरोदे, ओंकार दिनकर, संदीप मगर, शोभा पाताळे, प्रमोद मिसाळ, अनिल गायकवाड, अश्रुबा गायकवाड, बन्सी घंगाळे, बाप्पू मगरे, अरुण साबळे, प्रल्हाद शिंदे, कुणाल इंगळे, भगवान मिसाळ, संतोष बानाइत, अनिल स...

विद्युत रोहित्रे बंद करण्याची मोहीम स्थगित करावी - परजणे

कोपरगांव प्रतिनिधी, दि. २६ : शेतीची वीज बिले वसुलीच्या नांवाखाली महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर शेतीचा विजपुरवठा खंडित करण्यासाठी थेट विद्युत रोहित्रे (डी. पी.) बंद करण्याची मोहीम सुरु केल्याने हातातोंडाशी आलेली रब्बी हंगामातील पिके उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. कंपनीच्या या कारवाईमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होणार असून ही मोहीम तातडीने थांबवून वीज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील यांनी उपमुख्यमंत्री तथा उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली. वीज वितरण कंपनीने किमान दोन – तीन आठवडे पूर्वसूचना देऊन डी. पी. वरील विजपुरवठा खंडित करण्याची मोहीम हाती घेणे आवश्यक होते. वीज नियामक आयोगाचे तसे आदेश आहेत. याशिवाय शेतकऱ्यांच्या शेतीपंपांची वीज तोडू नये असा न्यायालयाचाही आदेश असताना महावितरण कंपनीकडून विजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरु असल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. एकतर अतिवृष्टीने खरीप पिकांना फटका बसून शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटांचा सामना...

चित्रकार रवी भागवत यांचे कोल्हेनी केले अभिनंदन

 कोपरगाव प्रतिनिधी, दि. २६ : कला मनुष्याचे दुःख हलके करते, नॅशनल आर्टिस्ट असोसिएशनच्या प्रदेशाध्यक्षपदी श्रीरामपुर येथील चित्रकार रवी भागवत यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे संजीवनी उद्योग समूहाच्यावतीने जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी अभिनंदन केले आहे. राष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या यंत्रणांना ग्रामीण भागातील कलाकारांचे महत्व पटले त्यातून रवी भागवतांची निवड सार्थ ठरली आहे.            सुप्रसिद्ध चित्रकार भरतकुमार उदावंत यांच्याकडून चित्रकलेचे धडे घेत रवी भागवत यांनी मनापासून काम केले आणि आज ते उत्तम चित्रकार बनले आहेत. गुरु शिष्याच्या या जोड गोळीने कोरोना महामारीत कलेच्या माध्यमांतून मोठी जनजागृती केली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९८ व्या ‘मन की बात’ कार्यक्रमातूनही कलेची प्रशंसा करून त्यास प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे.              चित्रकार रवी भागवत हे ऑनलाइन पद्धतीने पद्धतीने अमेरिका, कॅनडा, दुबई, जॉर्जिया, ऑस्ट्रीया, व ऑस्ट्रेलिया सह भारत देशातील ६ हजार कला प्रेमींना चित्रकलेचे प्रशिक्षण देतात ही उपलब्धी मोठी आहे. चित्रकार...

गंगामाई साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाला आग

शेवगाव प्रतिनिधी, दि. २६ : तालुक्यातील गंगामाई साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाला काल रात्री लागलेली भीषण आग विविध ठिकाणच्या १४ आग्निशामक बंबाच्या  ८ तासाच्या अथक प्रयत्नानंतर रविवारी पहाटे ३ च्या सुमारास आटोक्यात आली. या आगीत कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पातील चार मोठया टाक्याआगीच्या भक्षस्थानी पडल्या याशिवाय उर्वरित अन्य लहान मोठ्या २५ टाक्यांना आगीची मोठी झळ पोहचली. या दुर्घटनेत सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र  वित्त हानी मोठया प्रमाणात झाली असल्याने काळ आला होता पण वेळ आली नव्हती. असे म्हणावे लागेल.  पाच लाख लिटर क्षमतेचा हा इथेनॉल प्रकल्प संगणीकृत स्वयंचलित असल्याने येथे मोजके कर्मचारी होते. आगीचे निश्रीत कारण समजू शकले नाही. बहूधा शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. या दुर्घटनेत कारखान्याचे तीन कर्मचारी किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर शेवगावच्या साई पुष्प रूग्णालयात उपचार करुन घरी सोडण्यात आले.      ज्ञानेश्वर, वृद्धेश्वर, मुळा, केदारेश्वर, संजीवनी या सहकारी साखर कारखान्याचे अग्निशामक बंब, पैठण, जालना व अहमदनगर एमआयडीसी विभागाचे...

कोपरगावच्या तहसीलदारांवर गुन्हा दाखल, परीचारीकेशी असभ्य वर्तन

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २६ : ग्रामीण रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या परिचारीकेशी लज्जा उत्पन्न होईल असे असभ्य वर्तन व वैद्यकीय अधिकाऱ्यांना फोनवरून शिवीगाळ केल्या प्रकरणी कोपरगावचे दंडाधिकारी तथा तहसीलदार विजय बोरुडे यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल होऊन गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदरच्या घटनेमुळे शासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दि. २५ फेब्रुवारी रोजी पहाटे साडे पाचच्या सुमारास तहसीलदार बोरुडे यांनी ग्रामीण रुग्णालयात भेट देत प्रश्नांची सरबत्ती करत झाडाझडती घेतली होती. मात्र यावेळी कर्तव्यावर असलेल्या परीचारीकेशी असभ्य वर्तन व वैद्यकीय अधिकारी यांना अवर्च्या भाषेत शिवीगाळ केल्याचे प्रकरण नुकतेच घडले. त्याचा जिल्हा आरोग्य विभागातील संघटनांनी निषेध करत पोलीस निरीक्षकांना पत्र दिले होते. रात्री उशिरा परिचारिकेची  फिर्याद पोलिसांनी दाखल करून घेतली. परिचारिकेने दिलेल्या फिर्यादीत म्हंटले कि, २५ फेब्रुवारी रोजी सकाळी सव्वा पाच वाजता फिर्यादी ह्या ग्रामीण रुग्णालयात ड्युटीवर असताना तहसीलदार विजय बोरुडे हे अवेळी दारू पिऊन येऊन फिर्यादीस तुमचे मेन अधिकारी कोण आहेत असे म्हणून फिर्य...

मतदार संघाचा सर्वांगीण विकास साकारतांना गुणवत्तेला प्राधान्य - आमदर काळे

कोरगाव प्रतिनिधी, दि. २६ : कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या विकासाची मुहूर्तमेढ रोवून मागील साडे तीन वर्षांत ११०० कोटीपेक्षा जास्त निधी मतदार संघाच्या विकासासाठी आणला आहे. या निधीतून मतदार संघाचा सर्वांगीण विकास साकारतांना करण्यात आलेली विकासकामे दीर्घकाळ टिकली पाहिजे यासाठी गुणवत्तेला प्राधान्य दिले आहे असे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी केले आहे. कोपरगाव तालुक्यातील रवंदे येथे २० लक्ष रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या जी.प. शाळा ते महालखेडा काळधोंडी नदी ते तालुका हद्द रस्त्याचे डांबरीकरण करणे कामाचे भूमिपूजन व ९.७५ लक्ष रुपये निधीतून फिजिकल फिटनेस रिक्रिएशन संकल्पनेवर आधारित क्रिडा साहित्याचा लोकार्पण सोहळा नुकताच आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते पार पडला याप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, मतदार संघाच्या विकासाला चालना देवून केलेल्या विकासकामांचा नागरिकांना जास्तीत जास्त फायदा होण्यासाठी ही विकासकामे दर्जेदार होवून दीर्घकाळ टिकणे गरजेचे आहे.त्यामुळे विकासकामांच्या गुणवत्तेला जास्तीत जास्त प्राधान्य दिले असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी सांगितले. यावेळी बाळासाहेब कदम, अशोकराव काळे, कर्...

शालेय स्वयंपाकी व मदतनीस यांना तात्काळ दारिद्र रेषेचे कार्ड द्यावे - महेंद्र विधाते

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २६ : शालेय पोषण आहार योजना हि केंद्र सरकारची ही योजना असून या योजनेत जिल्हा परिषद नगरपालिका व खाजगी अनुदानित शाळेमध्ये विद्यार्थ्यांना मध्यांन्ह भोजन योजनेमध्ये आहार शिजून दिला जातो. हे काम करण्यासाठी प्रत्येक शाळेत स्वयंपाकी व मदतनीस नेमलेले आहेत. या स्वयंपाकी व मदतनीस यांना महिन्याला दीड हजार रुपये वेतन दिले जाते. त्यांच्या या वेतनानुसार वार्षिक उत्पन्न पंधरा हजार होते. म्हणून शासनाने त्यांना दारिद्र्यरेषेचे कार्ड तात्काळ द्यावी अशी मागणी सम्यक फाउंडेशन संचलित श्रमिक मजदूर संघ स्वयंपाकी व मदतनीस विभाग या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेंद्र विधाते यांनी केली आहे. कोपरगाव येथील समता सभागृहामध्ये संघटनेचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. याप्रसंगी शरद लोहोकरे नाशिक जिल्हा अध्यक्ष, संतोष उशीर येवला तालुकाध्यक्ष, प्रकाश पानपाटील, विद्या अभंग, दिपाली भागवत,संदीप देशमुख कोपरगाव निमंत्रक हे हजर होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहमदनगर जिल्ह्याचे अध्यक्ष सविता विधाते ह्या होत्या. शालेय पोषण आहार योजनेत काम करणारे स्वयंपाकी व मदतन...

छत्रपती संभाजीनगर व धाराशिव नामांतराचा निर्णय ऐतिहासिक - माजी आमदार कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २६ : औरंगाबादचे नामांतर ‘छत्रपती संभाजीनगर’ व उस्मानाबादचे नामांतर ‘धाराशिव’ असे करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली असून, नामांतराचा हा निर्णय स्वागतार्ह आहे, अशी प्रतिक्रिया भाजपच्या प्रदेश सचिव व माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी व्यक्त केली आहे. औरंगाबाद व उस्मानाबादच्या नामांतराच्या निर्णयास मंजुरी दिल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांचे आभार मानले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्रातील गतिशील सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराचा गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न अखेर मार्गी लावला आहे, अशा शब्दांत कोल्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले आहे. औरंगाबादचे नामांतर ‘संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचे नामांतर ’धाराशिव’ करण्याची मागणी मागील अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. ही मागणी आता मान्य झाली आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील ...

२५ फेब्रुवारी रोजी कोपरगाव मध्ये सर्व रोगनिदान शिबिराचे आयोजन

कोपरगांव प्रतिनिधी, दि. २४ : ब्राह्यण सभा, कोपरगांव यांच्या ४१वर्धापन दिनाच्या निमित्तानं ब्राह्यण सभा, कोपरगांव आणि श्री. जनार्दन स्वामी हॉस्पीटल यांच्या संयुक्त विदयमाने कोपरगांव शहरातील सर्व नागरीकांसाठी सर्वरोग निदान शिबिर शनिवार दि. २५ फेब्रुवारी रोजी ब्राह्यण सभा मंगल कार्यालय, श्रीराम नगर कोपरगांव येथे सकाळी ९.००वा.पासून  ते दुपारी १वा.पर्यत आयोजित केले आहे अशी माहीती एस.जे.एस. हॉस्पीटलचे कार्यकारी संचालक प्रसाद चांगदेव कातकडे आणि ब्राह्यण सभेचे सचिव सचिन देविदास महाजन यांनी दिली आहे.          या शिबिरांमध्ये बी.पी, शुगर, २ डी ई को, ईसीजी इ. तपासणी करण्यात येणार असुन गरजुना मोफत औषधे वितरीत केली जाणार आहे. या शिबिरात अनुभवी तज्ञ डॉक्टर प्राचार्य यांचे मार्गदर्शन व सल्ला आणि आवश्यकता भासल्यास मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. तरी या शिबिराचा लाभ जास्तीत जास्त नागरीकांनी घ्यावा आसे आवाहन ब्राह्मण सभा, कोपरगांव आणि श्री.जनार्दन स्वामी हॉस्पीटल यांनी केले आहे.

प्राचार्य उगलमुगले भारतीय संविधान जनजागृती रक्षक पुरस्काराने सन्मानित

शेवगाव प्रतिनिधी, दि.२४ : शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र राज्य पर्यटन, कला सांस्कृतिक विभाग, पोलीस बॉईज असोसिएशन व मैत्रीण महिला उद्योजिका ग्रुप जागतिक मानवाधिकार संरक्षण आयोग तसेच एस.पी.नाईन न्यूज चॅनल कोल्हापूर व लाईव्ह महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे यांच्या वतीने देण्यात येणारा ‘भारतीय संविधान जनजागृती रक्षक २०२३’ पुरस्कार येथील नवजीवन विद्यालयाचे प्राचार्य अशोक शंकरराव उगलमुगले यांना नुकताच पुणे येथे पिंपरीच्या आचार्य अत्रे रंगमंदिरात झालेल्या समारंभात प्रदान करुन सन्मानित करण्यात आले.        पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उपमहापौर उषाताई वाडेकर, महाराष्ट्र पर्यटन विभाग पुणे समन्वयक चंदन कुमार जोगे,यशदाचे बबन जोगदंड, यांच्या हस्ते उगलमुगले यांनी हा पुरस्कार स्विकारला. यावेळी मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्रा.भारत वाबळे,विद्यालयाचे उपप्राचार्य सुनिल शिंदे, गोरक्षनाथ म्हस्के उपस्थित होते.       पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी आ. डॉ.नरेंद्र घुले पाटील, सचिव माजी.आ. चंद्रशेखर घुले पाटील, जिल्हा परिषदेच्या मा...

बिनधोक प्रवासाची शाश्वती द्या अन्यथा आंदोलन

शेवगाव प्रतिनिधी, दि. २३ : मराठवाड्याचे प्रवेशद्वार असलेल्या शेवगाव शहरातून होणारे दळणवळण उच्चांकी आहे. त्यातच पंचक्रोशीत असलेल्या साखर कारखान्याचा हंगाम जोरात सुरू असल्याने येथे वरचेवर वाहतूक कोंडी होत असते.  अरुंद रस्ते आणि रस्त्याच्या दुतर्फा झालेल्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या समस्येतून  शेवगावकरांची सुटका करावी अन्यथा नाईलाजाने उग्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा शिंदे गटाच्या शिवसेनेने तालुका प्रशासनाला दिला आहे.        या संदर्भात तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शेवगाव शहरातून प्रवासी वाहतुकीसह अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते. मुळातच अरुंद असलेल्या रस्त्यावर अतिक्रमणामुळे आणि त्याही पुढे उभ्या केलेल्या वाहनामुळे रस्ता शिल्लकच रहात नाही. त्यातूनच ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीच्या जुगाडाची वर्दळ सुरू असते. शेवगावला बायपास नसल्याने होणारी सर्व वाहतूक ही शहरातून होते, येथे अनेकदा अपघात झाले असून बस स्थानकाजवळील क्रांती चौकात एकदा वाहतूक कोंडी झाली की ती किमान दीड दोन तास सुरळीत होत नाही. यातून प्रशासनाने मार्ग काढावा वाहतूक कोंडी न ह...

लालबहादुर शास्त्री गन्ना किसान संस्था लखनौच्या शेतक-यांची संजीवनी उद्योग समुहास भेट

कोपरगांव प्रतिनिधी, दि. २४ : लालबहादुर शास्त्री गन्ना किसान संस्था लखनौ येथील शेतक-यांच्या शिष्टमंडळाने संजीवनी उद्योग समुहास शुक्रवारी भेट देवुन पाहणी केली त्याबददल त्यांचा सत्कार करण्यांत आला.             संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखाना कार्यक्षेत्रातील उस उत्पादक शेतक-यांचे प्रति हेक्टरी उत्पादन वाढविण्यासाठी केलेल्या उपाययोजनाबाबत तसेच आपला कारखाना राबवित असलेल्या विविध योजनांची माहिती दिली व महाराष्ट्र राज्यात ऊस तोडणी व वाहतुक कारखाना स्वतंत्र यंत्रणेमार्फत करीत असल्याचे निर्दशनास आणुन दिले.            तसेच माजीमंत्री स्व. शंकररावजी कोल्हे यांनी शेतक-यांचा सर्वांगीण विकास हेच त्यांचे जीवनाचे अंतिम ध्येय मानून काम केले व त्याचीची जोपासना त्यांची पावी पिढी सक्षमपणे करीत असल्याचे नमुद केले. तसेच उत्त्तर प्रदेशचे अतिरिक्त सचिव संजय भुस रेड्डी व बिपीनदादा कोल्हे अध्यक्ष संजीवनी उद्योग समुह यांचे नेहमी सहकार व उस उत्पादन...

१९ कोटी निधी देवून सुरेगावचा पाणी प्रश्न कायमचा सोडविला – आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २४ : कर्मवीर शंकररावजी काळे साहेब व माजी आमदार अशोकराव काळे यांनी नेहमीच सुरेगावच्या विकासाचे प्रश्न सोडवून नागरिकांना आवश्यक असणाऱ्या सोयी-सुविधा निर्माण करून दिल्या आहेत. कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून देखील विकासाच्या बाबतीत सर्वोतोपरी सहकार्य केले जात आहे. हि परंपरा पुढे सुरु ठेवून सुरेगावच्या नागरिकांना नियमित पाणी मिळावे यासाठी १९ कोटी रुपये निधी देवून सुरेगावचा पाणी प्रश्न कायमचा सोडविला असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले. सुरेगाव ग्रामपंचायतीच्या ६५ व्या वर्धापन दिनानिमित सुरेगाव व परिसरातील नागरिकांसाठी दिनांक १९ फेब्रुवारी ते २४ फेब्रुवारी या कालावधीत विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. शेवटच्या दिवशी आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते सुरेगावचे आजी-माजी सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात येवून चित्रकला, रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजीराव वाबळे होते. यावेळी हवामान तज्ञ पंजाबराव डख प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते...

अतिवृष्टीच्या प्रलंबित अनुदानासह विविध मागण्यासाठी अमरापूरला रास्ता रोको

शेवगाव प्रतिनिधी, दि. २४ : अतिवृष्टीचे प्रलंबित अनुदान त्वरित मिळावे या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी अमरापुर येथे संतप्त शेतकऱ्यांनी आज शुक्रवारी ( दि.२४ ) रास्तारोको आंदोलन केले. पंधरा दिवसात सकारात्मक अंमलबजावणी न झाल्यास तिव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.       तालुक्यात गेल्या वर्षी अतिवृष्टीने पिकांचे अतोनात नुकसान झाले. या नुकसानग्रस्त पिकांसाठी शासनाने अनुदान मंजुर केले मात्र ते अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले नाहीत. ते अनुदान त्वरित संबंधितांच्या खात्यावर वर्ग व्हावे. तसेच यंदाही हवामानाच्या बदलाने खरीप व रब्बी पिकांना धोका झाला. त्यामुळे खरीपाची अंतिम आणेवारी पन्नास पैशाच्या आत लावण्यात आली. मात्र रब्बीची नजर आणी सुधारीत आणेवारी ७५ पैसे जाहीर करुन प्रशासनाने शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. आता अंतिम आणेवारी पन्नास पैशाच्या आत लावण्याची मागणी या वेळी करण्यात आली.      शेतकरी विकास मंडळाच्या कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी, कपाशीला ११ हजार रुपये प्रति क्विंटल भाव देण्यात यावा, रब्बीची अंतिम आणेवारी पन्नास पैशाच्या आत जाहीर करावी, सन २०२२ -२३ मधील खरीप पिक विमा...

कोपरगाव तालुका सर्दी खोकल्याने झाला बेजार

 उपचारासाठी दररोज शेकडो नागरीक दवाखान्यात कोपरगाव प्रतिनिधी, दि. २४ : ऐन उन्हाळ्याच्या उंबरठ्यावर असताना कोपरगाव तालुक्यातील शेकडो कुटुंबे सर्दी खोकल्याच्या आजाराने व्याकुळ झाले आहेत. बदलत्या ऋतू बरोबर वातावरणातील अचानक झालेल्या बदलामुळे नागरीकांच्या शारिरिक समस्या वाढल्या आहेत. शहरासह तालुक्यात एकाच कुटुंबातील अनेकजण सर्दी, खोकला, अंगात बारीक ताप, घसा खवखव करणे, डोकं जड पडणे, अशक्तपणा जाणवणे आणि विशेषतः घसा बसण्याच्या समस्याने व्याकुळ झाले आहेत. काही रुग्णांचा खोकला, सर्दी, ताप  कित्येक दिवसांपासून बरा होतच नाही. शंभर टक्के आजारी पडूनही नाही, ना सुदृढ स्थितीही नाही अशा अर्धवट अवस्थेत कोपरगावचे नागरीक औषधावर औषधे घेवून अनेक प्रयोग करीत खोकला आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. एकाच कुटुंबातील अनेकजण एकाचवेळी  आजारी पडल्याचे चिञ पहावयास मिळत आहे.   या संदर्भात कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन यादव यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले सध्या तालुक्यात २५ टक्के नागरीक खोकला सर्दीने बेजार झाले आहेत. वातावरणातील बदल व एकमेकांच्या संसर्गाने आजारी पडण्याचे प्रमाण वाढले अस...

अनुशेष भरून काढण्याचा सातत्याने प्रयत्न केलाय - आमदार राजळे

शेवगाव प्रतिनिधी, दि. २३ :  सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावणे हाच ध्यास ठेवून गेले सात वर्ष आपण काम केले असून  मतदारसंघातील विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी सातत्याने प्रयत्न केलाआहे. विकास कामांना चालना देऊन जास्तीत जास्त निधी आणण्याचा आपला नेहमीच प्रयत्न असल्याचे आ.मोनिकाताई राजळे यांनी येथे सांगितले. तालुक्यातील  लाडजळगाव येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोरील सभामंडपाचे भूमिपूजन आज त्यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी त्या बोलत होत्या.       राजळे म्हणाल्या, मध्यंतरीच्याअडीच वर्षात शासनाकडून निधी देताना दुजाभाव करण्यात आला, त्यामुळे रस्ते, पाणी आदींबाबत विकास खुंटला होता परंतु आत्ताच्या भाजप समविचारी सरकारच्या काळात मतदारसंघातील कामांसाठी मोठा निधी उपलब्ध झाला असून रस्ते, पाणी योजना आदी कामांना सुरुवात झाली आहे. तालुक्यातील रुपये ७ कोटी ५० लक्ष  किमतीच्या विविध कामाचा शुभारंभ त्यांनी आज केला.            यावेळी तालुकाध्यक्ष ताराचंद लोढे, बापू पाटेकर, बाबागिरी महाराज, सूर्यभान महारा...

कोपरगाव शहरात एकाच रात्री तीन चारचाकी गाड्या चोरीला

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २३ : एकाच रात्री शहरातील विविध भागातून लाखो रुपयांच्या तब्बल तीन चारचाकी गाड्या चोरून गुन्हेगारांनी पोलीसापुढे आव्हान उभे केले आहे. शहरातून एवढ्या मोठ्या प्रमाणवर गाड्या चोरीला जाण्याची हि पहिलीच घटना असून गेल्या काही महिन्यापासून चारचाकी गाड्या चोरीला जाण्याचे प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. शहर पोलिसांनी आरोपींचा तात्काळ शोध घ्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. शहरातील साईनगर भागात राहणारे व्यवसायाने वकील असणारे मनोज बाळासाहेब कडू यांच्या घरासमोर कुलूप लावलेली पाच लाख रुपये किमतीची मारुती सुझुकी कंपनीची इरटीका गाडी क्र. एम. एच. १७ बी. व्ही. ०४३६ हिचे काच फोडून कुलूप तोडून अज्ञात आरोपींनी चोरून नेली. सह्याद्री कॉलनी येथील रहिवासी चार्टर्ड अकौंटंट असलेले दत्तात्रेय बाळाजी खेमनर यांची दीड लाख रुपये किमतीची मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट डिझायर गाडी क्र. एम एच १७ ए जे ७७२५ हि कोणी तरी अज्ञात चोरट्याने काच फोडून सेंटर कुलूप तोडून चोरून नेली. दरम्यान सुभद्रानगर भागातील रहिवासी असलेले जगदीश लक्ष्मीनारायण झंवर यांची सात लाख रुपये किमतीची मारुती सुझुकी कंपनीची इरटीका गाडी क्...

मतदार संघाच्या विकासात रस्त्यांची भूमिका महत्वाची - आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २३ : गाव, तालुका व शहराचा विकास साधायचा असेल तर दर्जेदार रस्ते असणे अत्यंत आवश्यक असून त्याशिवाय विकास साधने शक्य नाही. रस्त्यांची सुविधा असल्यास दळणवळणाच्या अडचणी येत नाही. शेतकरी, दुध व्यवसायिक यांचे साधने वाडी वस्तीपासून गाव व शहरापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. त्यामुळे वाडी वस्तीपासून गावा पर्यंत व गावापासून शहरापर्यंत रस्ते असल्यास बाजारपेठेला चालना मिळण्यास मदत होते व गावचा व शहराचा विकास होवू शकतो. विस्तीर्ण परिसर असलेल्या कोकमठाणमध्ये देखील रस्त्यांचे जाळे निर्माण होणे हि काळाची गरज असून परिसरातील वाड्या वस्त्यांसह सर्वच रस्त्यांचा विकास होण्यासाठी रस्त्यांची भूमिका अतिशय महत्वाची आहे. त्यामुळे कोकमठाणसह मतदार संघात रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यावर भर देत असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी सांगितले. कोकमठाण येथे विविध योजनांच्या माध्यमातून ग्रामपंचायत मालकीच्या जागेवर १० लक्ष निधीतून बहुउद्देशीय सभागृह बांधणे (गो-शाळा) व मंजूर घरकुलांचा भूमिपूजन समारंभ तसेच ४० लक्ष निधीतून कोकमठाण-माळवाडी ते प्रजिमा ०८ डांबरीकरण करणे कामाचे भूमिपूजन व जिकल फिटनेस रिक्रिएशन संकल्पन...

जलयुक्त शिवार, घरकुल व मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 'मिशन मोड' वर राबवाव्यात - उपमुख्यमंत्री फडणवीस

  शिर्डी प्रतिनिधी, दि.23 : नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत महसूली कामकाज जलद व पारदर्शी करण्यात यावे. जलयुक्त शिवार, घरकुल  व मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनांच्या अंमलबजावणींना प्राधान्य देत त्या ‘मिशन मोड’ वर राबवाव्यात. अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज लोणी येथे व्यक्त केली.             राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाच्या वतीने लोणी येथे आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय महसूल परिषदेचा समारोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. त्यावेळी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतांना उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.  यावेळी व्यासपीठावर महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार बबनराव पाचपुते, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ.राजेंद्र विखे-पाटील उपस्थित होते.             उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सध्या राज्याच्या शेतीला ८ हजार मेगावॅट वीज लागते. सौर कृषी वाहिनी योजनेमुळे ४ हजार मेगावॅट वीज निर्माण होणार आहे‌. यामुळे शेतकऱ्यांना सलग १२...

शेवगावातील १९ गावात उभारला ऑक्सिजन पार्क

बिहार पॅटर्न अंतर्गत तब्बल १६,६०० वृक्ष लागवड वृक्षारोपण करणे सोपे, अनेकदा वृक्षारोपणाची कोटीच्या कोटी उड्डाणे आपण ऐकतो. म्हणूनच वृक्ष लागवडीपेक्षा  वृक्ष संगोपनाला  प्राधान्य देण्याच्या निश्चयातून  रोपे लवकर रुजावीत, एखादेही रोप जळू नये. म्हणून वृक्ष लागवड करतांना  मुळातच दीड दोन वर्षाच्या मोठ्या रोपांची निवड करतांना गटविकास अधिकारी डोके यांनी जातीने लक्ष घातल्यTने ही सर्व गावे आज  वृक्षराईने नटली असून परिसर हिरवाईने फुलला आहे. शेवगाव प्रतिनिधी, दि. २२ : मध्यंतरी कोविड महामारीने सर्वत्र थैमान घातले. या काळाने ऑक्सीजनचे महत्व अधोरेखित केले. त्यातूनच प्रेरित होऊन महात्मा गांधी शासकीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील बिहार पॅटर्न अंतर्गत शेवगाव तालुक्यातील १९ ग्रामपंचायतीमध्ये  सन २०२०-२१ व २०२१-२२ मध्ये तब्बल १६ हजार ६००  वृक्षांची लागवड करून त्याचे संगोपन करण्यात आले. टीम लीडर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश डोके यांनी ऑक्सिजन पार्कची संकल्पना राबवित तांत्रिक अडचणीवर मात करीत विविध विभागाशी समन्वय साधून ही किमया साध्य केली. या माध्यमातून या गावांत आज वनराई  नटली असून ८३ मजुरांना रोजगार...

शेवगावला एमआयडीसी होणे आवश्यक - हर्षदा काकडे

  शेवगाव प्रतिनिधी, दि. २२ : शेवगाव तालुक्यात औद्योगिक वसाहतीसाठी (MIDC) जागा आरक्षित करण्याची मागणी करणारे निवेदन जनशक्ती विकास आघाडीच्या वतीने जिल्हा नियोजन समिती प्रारूप विकास योजना यांच्याकडे माजी जिप सदस्या.हर्षदा काकडे यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्ते, शेतक-यांच्या वतीने देण्यात आले.         निवेदनात म्हंटले आहे की, शेवगाव नगरपरिषदेने त्यांच्या हद्दीत महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधीनियम १९६६ चे कलम २६ अन्वये प्रारूप विकास आरखडा योजना जाहीर केला आहे. मात्र या आराखड्यात एमआयडीसी साठी कुठल्याही प्रकारचे आरक्षण ठेवण्यात आलेले नाही.  शेवगाव शहर व तालुक्यातील औद्योगिक वसाहतीचा प्रश्न जिल्ह्याच्या दक्षिण भागात दुर्लक्षित ठरला आहे. मात्र तालुक्यात वीज, पाणी, रस्ते, उद्योग आदी सर्व प्रकारच्या सोयी सुविधांसाठी हा परिसर अतिशय सर्वोत्तम प्रकारचा ठरणार आहे. शहरातील पैठण, आखेगाव हमरस्त्याचा विचार केला तर असे लक्षात येईल की, शेवगाव शहरात व्यापारी क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. शेवगाव शहरापासूनच ८ ते १० कि.मी. अंतरावर जायकवाडी धरणाचे...

आमदार काळेंच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांसाठी जातीचा दाखला सहाय्यता शिबीर

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २२ : कोपरगाव मतदार संघातील इयत्ता ८ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आ. आशुतोष काळे यांच्या पुढाकारातून जातीचा दाखला सहाय्यता शिबीर राबविण्यात येणार असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून देण्यात आली आहे.             नुकत्याच १२ वी च्या परीक्षा सुरु झाल्या असून येत्या काही दिवसात १० वीच्या देखील परीक्षा सुरु होणार आहेत. या परीक्षा पार पडल्यानंतर १० वी १२ वीच्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतांना अनेक शैक्षणिक व शासकीय दाखल्या बरोबरच जातीच्या दाखल्याची देखील गरज भासते. जातीचा दाखला मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना व पालकांना सातत्याने सेतू कार्यालयाच्या चकरा माराव्या लागतात. त्यामुळे विदयार्थ्यांना व त्यांच्या पालकांना मोठा मानसिक त्रास होतो. या त्रासातून विद्यार्थ्यांची व त्यांच्या पालकांची मुक्तता करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने इयत्ता ८ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी आ.आशुतोष काळे यांच्या पुढाकारातून मतदार संघात जातीचा दाखला सहाय्यता शिबीर राबविण्यात येणार आहे.  विद्यार्थ्यांना जाती...

लक्ष्मीनगरच्या रहिवाशांनी केला आमदार काळेंचा सत्कार

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २२ : कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर भागातील शासकीय जागेवर वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांना त्या जागेचे त्यांच्या नावाचे उतारे मिळावे अशी या नागरिकांची मागील अनेक वर्षापासूनची मागणी होती. याबाबत मागील तीन वर्षापासून करीत असलेल्या पाठपुराव्याला यश मिळून या नागरिकांना त्यांच्या हक्काच्या जागेचे उतारे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला याचे मोठे समाधान वाटत असल्याची प्रतिक्रिया आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे. लक्ष्मीनगर भागातील शासकीय जागेवर वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांनी आ.आशुतोष काळे यांचा सत्कार करून त्यांचे आभार मानले. यावेळी सत्काराला उत्तर देतांना ते बोलत होते. यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले कि, कोपरगाव शहराचा दिवसेंदिवस विस्तार होत असल्यामुळे शहराच्या लक्ष्मीनगर परिसरात मागील अनेक वर्षापासून असंख्य नागरिकांचे शासकीय जागेवर वास्तव्य होते. यापैकी बहुतांश नागरिकांनी या शासकीय जागेवर पक्की घरे बांधलेली होती त्यामुळे त्यांच्या जागा नियमाकुल करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीत होतो. त्या पाठपुराव्याला नुकतेच पुणे नगररचना संचालक, अविनाश पाटील यांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसाद दिला ...

निर्भय कन्या अभियान एक दिवसीय कार्यशाळा संपन्न

शेवगाव प्रतिनिधी, दि. २१ : येथील न्यू आर्टस् कॉमर्स अॅण्ड सायन्स महाविद्यालय, विद्यार्थी विकास मंडळ व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ निर्भय ‘  कन्या अभियान एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.  औरंगाबादच्या अॅड. ऋतिका पटेल यांनी कार्यशाळेचे उद्घाटन करून ‘कायदा आणि महिला सबलीकरण ‘ या विषयावर विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.    अॅड पटेल म्हणाल्या, महिलाविषयक वाढते गुन्हे आणि  त्यांच्या होणाऱ्या फसवणूकीच्या  प्रकारामुळे  महिलांना कायद्याची माहिती असणे  ही काळाची गरज आहे. असे सांगून माहिला संदर्भातील विविध कायद्याची सविस्तर माहिती दिली. येणाऱ्या संकटाना हार न मानता संकटांना सामोरे जातांना स्त्री अबला नसून सबला आहे. हे प्रतित होऊ द्या. असे आवाहन करुन स्वतःचे काही अनुभव देखील त्यांनी यावेळी शेअर केले. प्रथम सत्रात शेवगाव येथील आयुर्वेद महाविद्यालयातील पूजा खोले यांनी, ‘महिलांचे आरोग्य व समस्या ‘ या विषयावर बोलतांना महिलांचा आहार, व्यायाम, दिनक्रम कसा असावा याबद्दल  मार्गदर्शन केले.  द्वितिय सत्रात मुस्ताक शहा यांनी, ...

शासकीय जागेवरील रहीवाशांना उतारे मिळण्याचा मार्ग मोकळा – आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि, २१ : कोपरगाव शहरात शासकीय जागेवर वास्तव्यास असणाऱ्या लक्ष्मीनगर परिसरातील नागरिकांना नगररचना विभागाच्या नियोजित आराखड्यानुसार जागेचे उतारे देण्याची प्रक्रिया सुरु होणार होती. मात्र त्यामध्ये काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे त्यामध्ये सूट मिळावी यासाठी करीत असलेल्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून शासकीय जागेवर वास्तव्यास असणाऱ्या लक्ष्मीनगरच्या रहीवाशांना त्यांच्या जागेचे उतारे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे. कोपरगाव शहरात लक्ष्मीनगर परिसरात मागील अनेक वर्षापासून शासकीय जागेवर अनेक कुटुंब वास्तव्यास आहेत. ज्या शासकीय जागेवर हे कुटुंब राहत आहेत त्यांना त्यांच्या जागा शासन नियमानुसार नियमाकुल करून त्यांना त्यांच्या नावचे उतारे मिळावे हा प्रश्न मागील अनेक वर्षापासून प्रलंबित होता. त्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी कमिटीची बैठक घेऊन लक्ष्मीनगर मधील शासकीय जागेवर राहणाऱ्या नागरीकांना त्यांच्या जागा शासकीय नियमाप्रमाणे नियमित करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करून हे प्रस्ताव तातडीने शा...

छत्रपती शिवाजी महाराज हे सकारात्मक विचारांचे विद्यापीठ - स्वाती कोयटे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २१ : छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य हे भारत देशालाच नाही, तर जगाला अवगत आहे. त्यांची ओळख त्यांनी त्यांच्या कार्यातून करून दिली आहे. लोककल्याणकारी राजे, मॅनेजमेंट गुरू अशा वेग – वेगळ्या पदव्या त्यांच्या कार्यामुळेच मिळाल्या आहेत. त्यांच्या प्रत्येक कार्यातून एक विचार दिसून येतो. प्रत्येक विद्यार्थ्याने त्यांच्या कार्याची माहिती घेताना त्यांचे विचार ही अंगीकारले पाहिजे. त्यामुळे शिवराय हे एक नाव नाही तर सकारात्मक विचारांचे विद्यापीठ आहे. असे मत समता इंटरनॅशनल स्कूलच्या मॅनेजिंग ट्रस्टी सौ.स्वाती संदीप कोयटे यांनी व्यक्त केले. समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात शिवजयंती उत्साहात संपन्न झाली. त्या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. या वेळी समता इंटरनॅशनल स्कूलच्या मॅनेजिंग ट्रस्टी सौ.स्वाती कोयटे आणि शालेय पोषण आहार समितीच्या अध्यक्षा सौ.सुहासिनी कोयटे यांच्या हस्ते शिव प्रतिमेचे पूजन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभागाच्या प्रमुख सौ.सीमा सोमासे यांनी केले. कोयटे म्हणाल्या की, प्रत्येक विद्यार्थ...

राज्य मार्ग ०७ ची साडेसाती दूर, इतरही रस्त्यांना निधी देणार – आ. आशुतोष काळे

प्रलंबित शहाजापूर-चास नळी ते जिल्हा हद्द (सात मोऱ्या) रस्ता कामास प्रारंभ कोपरगाव प्रतिनिधी, दि.२१ : मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या राज्य मार्ग-७ वरील शहाजापूर सुरेगाव-वेळापूर-कारवाडी-चासनळी ते जिल्हा हद्द (सात मोऱ्या) रस्त्याला १० कोटी निधी देवून या रस्त्याचे काम सुरु होणार आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षापासूनची या राज्य मार्ग ०७ ला लागलेली साडे साती दूर झाली असून नागरिकांना दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या इतरही रस्त्यांना जास्तीत जास्त निधी देऊ अशी ग्वाही आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे. कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथे आ. आशुतोष काळे यांनी दिलेल्या १० कोटी रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या राज्य मार्ग-७ वरील शहाजापूर-सुरेगाव-वेळापूर-कारवाडी-चासनळी ते जिल्हा हद्द (सात मोऱ्या) या रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचे भूमिपूजन नुकतेच आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते संपन्न झाले याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महानंदाचे माजी संचालक राजेंद्र जाधव होते. यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की, मागील अनेक वर्षापासून देर्डे फाटा ते सात मोऱ्या तालुका हद्द रस्त्याचा...