Posts

रस्त्यालगतच्या अतिक्रमणांवर बांधकाम विभागाने फिरवला जेसीबी

Image
एकच दिवशी १२५ घरे, टपऱ्या, हाॅटेल, दुकाने भुईसपाट कोपरगाव प्रतिनिधी, दि. १७: कोपरगाव शहरातील साईबाबा तपोभूमी ते रेल्वे स्टेशन दरम्यानच्या स्टेशन रोडवरील अतिक्रमणांवर सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने जेसीबी फिरवून अतिक्रमणात असलेले दुकानं, पञ्यांसह कच्ची पक्की घरे, दुकाने, टपऱ्या तसेच दारुच्या अड्ड्यांवर जेसीबी फिरवून १२५ अतिक्रमणे भूईसपाट केल्याने स्टेशन रोडच्या शेजारचा परिसर मोकळा झाला आहे.   याबाबत कोपरगाव सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालयाचे अभियंता वृषभ शिंदे यांनी अधिक माहिती देताना म्हणाले की, स्टेशन रोड परिसरातील नागरिकांनी रस्त्याला अगदी खेटून घरे, दुकाने व टपऱ्या थाटल्याने रहदारीला अडथळा निर्माण होत होता. नियमाप्रमाणे रस्त्याच्या मध्यभागापासुन १५ मिटर अंतरा पर्यंत कोणालाही बांधकाम किंवा अतिक्रमण करता येत नाही माञ साईबाबा तपोभूमी ते कोपरगाव रेल्वेस्टेशन या दरम्यान १२५ अतिक्रमण धारकांनी रस्त्याला अडथळा होईल असे अतिक्रमण केले होते. अतिक्रमण काढण्यासाठी आपण गेल्या अनेक महिन्यांपासून नोटीसा वर नोटीसा देवूनही कोणीच अतिक्रमण न काढल्याने अखेर बुधवारी सकाळी दहा वाजता कोपरगाव शहर ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं वावड असणाऱ्यांनी या देशातलं पाणीही पिवू नये - डॉ. राजरत्न आंबेडकर

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १७ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कधीच भेदभाव केला नाही. या देशातील प्रत्येकांच्या घरात विद्युत पुरवठा करण्याची व्यवस्था केली, प्रत्येकांच्या घराघरात, पिण्यासाठी पाणीपुरवठा योजनांची व्यवस्था केली इतकंच काय तर शासकीय सेवेत नौकरी आणि हक्काच्या सुट्ट्यांची व्यवस्था करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचं वावड असणाऱ्यांनी या देशाचं पाणी सुध्दा पिवू नये असा टोला. राजरत्न आंबेडकर यांनी लगावला.  बुध्दीस्ट यंग फोर्सच्या वतीने शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळील मुख्य रस्त्यावर विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार उभारण्यात आले असुन त्याचा लोकार्पण सोहळा बौध्द महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजरत्न आंबेडकर यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी राजरत्न आंबेडकर हे बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सेवानिवृत्त सचिव साहेबराव कोपरे होते. तर आमदार आशुतोष काळे, राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे उपाध्यक्ष रमेश घोडेगाव, डॉ. गोवर्धन हुसळे...

श्री मुक्ताई ज्ञानपीठासाठी कोल्हे परिवाराने यापुढेही सहकार्य करावे -स्वामी रामानंदगिरीजी महाराज

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १५ : माजी मंत्री सहकारमहर्षी स्व. शंकरराव कोल्हे व माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी श्रीक्षेत्र पुणतांबा येथील श्री मुक्ताई ज्ञानपीठासाठी आजपर्यंत भरीव सहकार्य केलेले आहे. त्यांच्या सहकार्यातून या ठिकाणी अनेक विकासाची कामे झाली आहेत. यापुढील काळातही श्री मुक्ताई ज्ञानपीठासाठी कोल्हे परिवाराने असेच सहकार्य करावे, अशी अपेक्षा श्रीक्षेत्र पुणतांबा येथील श्री मुक्ताई ज्ञानपीठाचे प्रमुख प.पू. स्वामी रामानंदगिरीजी महाराज यांनी व्यक्त केली. श्रीक्षेत्र पुणतांबा येथील श्री मुक्ताई ज्ञानपीठाच्या वतीने कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांना संत श्री मुक्ताई यांच्या पुण्यतिथीनिमित्त रविवारी (१४ मे २०२३) आयोजित सोहळ्यात कै. सौ. चंद्रभागाबाई राघोजी बुधवंत यांच्या नावाने देण्यात येणारा ‘मातोश्री’ पुरस्कार श्रीक्षेत्र देवगड येथील श्री गुरुदेव दत्तपीठ संस्थानचे प्रमुख प.पू. भास्करगिरीजी महाराज व श्री मुक्ताई ज्ञानपीठाचे प्रमुख प.पू. स्वामी रामानंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. स्नेहलताताई कोल्हे यांना सन्मानपत्र, ...

समता इंटरनॅशनल स्कूलची निकालाची उज्वल परंपरा कायम - स्वाती कोयटे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १५ :   सी.बी.एस.ई.चा २०२२-२३ चा इ. १० वी आणि इ.१२ वी चा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यामध्ये समता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अहमदनगर जिल्ह्यात बाजी मारत उज्वल निकालाची परंपरा कायम राखली आहे. इ.१० वीत अथर्व बेरगळ आणि हर्ष कासलीवाल यांनी ९७ टक्के गुण मिळवुन स्कूलमध्ये प्रथम येण्याचा मान मिळविला तर तनिषा जैन हिने ९६.४ टक्के गुण मिळवत द्वितीय तर गणेश गवळी आणि आयुष जोर्वेकर यांनी ९५.४ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळविला. तर इ.१२ वीत श्रुतिका देशमुख हिने ९५ टक्के, ओम जाधव आणि प्रीती परदेशी यांनी ९४.२ तर गार्गी कदम हिने ८८ टक्के गुण मिळवत अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवत दैदीप्यमान यश संपादन केले आहे. समता इंटरनॅशनल स्कूलचे या वर्षी सर्वच विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण होऊन समता पॅटर्न अहमदनगर जिल्ह्यात यशस्वी ठरत इ.१० वी आणि इ.१२ वीचा समता स्कूलचा निकाल १०० टक्के लागला आहे. समता इंटरनॅशनल स्कूल मधील ६ विद्यार्थी ९५ टक्केच्या पुढे गुण मिळवुन उत्तीर्ण झाले आहे.त्यात अथर्व बेरगळ, हर्ष कासलीवाल, तनिषा जैन, गणेश गवळी, आयुष जोर्वेकर, सोनल अहिर...

कोपरगावच्या साई सालकरची उत्तुंग भरारी, जर्मनीच्या स्टुटगार्ट विद्यापीठाची एम.एस. पदवी प्राप्त

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १५ : कोपरगावच्या साईप्रसाद राजेंद्र सालकर याने जर्मनीच्या  स्टुटगार्ट  विद्यापीठातून इन्फोटेक (एम्बेडेड सिस्टम्स) एम एस मास्टर ऑफ सायन्स इन इंजीनियरिंग पदवी प्राप्त केली आहे. स्टुटगार्ट विद्यापीठ, जर्मनी येथे  त्याचे संशोधन प्रबंध (Research Project) सादर केले होते. त्यात स्टुटगार्ट, जर्मनी विद्यापीठाची  (एम.एस.)  मास्टर ऑफ सायन्स इन इंजीनियरिंग ही पदवी मिळून त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.  साई प्रसाद सालकर यांनी शारदा इंग्लिश स्कूल मधून दहावी पास केल्यानंतर संजीवनी येथील केबीपी पॉलिटेक्निक मध्ये इएनटीसी या शाखेतून डिप्लोमा केला. चांगले मार्क मिळवून पुणे येथील पीआयसीटी कॉलेजमध्ये डिग्रीसाठी प्रवेश मिळवला त्या कॉलेजमध्ये पहिल्या पाच मध्ये येण्याचा मान मिळून एनटीसी शाखेची डिग्री प्राप्त केली त्यानंतर अमेरिका किंवा जर्मनीमध्ये जाऊन इएनटीसी मध्ये एमएस करण्याची त्याचे स्वप्न होते. त्यासाठी त्यांनी युनिव्हर्सिटीकडे प्रयत्न केले. परंतु आधी त्याला टीसीएस पुणे या कंपनीत त्याला नोकरी मिळाली पुन्हा येथे एक दीड दोन वर्षे काम केल्यानंतर कंपनीने त्याला जर्मनी येथे पाठवले त...

संजीवनीची अनुश्री बनकर ९८ . २० टक्के गुण मिळवुन तालुक्यात प्रथम - डॉ. मनाली कोल्हे

कोपरगांव प्रतिनिधी, दि. १५ : केंद्रिय माध्यमिक  शिक्षण  मंडळाने (सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एक्झामिनेशन-सीबीएसई) फेब्रुवारी फेब्रंवारी/मार्च २०२३ मध्ये इ.१० वीच्या परीक्षांचे निकाल जाहिर केले असुन त्यात संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स  संचलित संजीवनी अकॅडमीच्या अनुश्री योगेश  बनकर हीने ९८.२० टक्के गुण मिळवुन कोपरगांव तालुक्यातील सर्व सीबाएसई पॅटर्नच्या शाळांमधुन प्रथम क्रमांकाने उत्तिर्ण झाली. या परीक्षेमध्ये संजीवनी अकॅडमीच्या १७ विध्यार्थ्यांनी ९० टक्यांपेक्षा अधिक गुण मिळवुन आपल्या प्रतिभा संपन्नतेचे दर्शन घडविले आहे, तसेच १०० टक्के निकालाची परंपराही कायम राखली आहे, अशी  माहिती स्कूलच्या संचालिका डॉ. मनाली अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.           पत्रकात डॉ. कोल्हे यांनी पुढे म्हटले आहे की, हितेन समीर शाह  याने या परीक्षेत ९७.६० टक्के गुण मिळवुन दुसरा क्रमांक पटकाविला तर मनस्वी विजय नरोडे हीनेे ९७ टक्के गुण मिळवुन तिसऱ्या क्रमांकाची मानकरी ठरली. २९ विध्यार्थ्यानी  विध्यार्थ्यांनी ८० ते ८९ टक्यांपर्यंत गुण मिळविले तर २३ विध्यार्थ्यांनी ७० ते ७९ टक्यांपर्यंत गुण मि...

नगरपरिषदेच्या महिला कर्मचाऱ्यांना साड्या वाटून बाळासाहेब आंबेडकरांचा वाढदिवस साजरा

शेवगाव प्रतिनिधी, दि. ११ : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस  येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी वाढदिवसाच्या निमित्ताने शेवगाव नगरपरिषदे मधील सर्व महिला कर्मचाऱ्यांना साड्या वाटपाचा स्तुत्य उपक्रम राबवून वाढ दिवस साजरा करण्यात आला. वंचितचे राज्य उपाध्यक्ष प्रा.  किसन चव्हाण, नगरपरिषदेचे माजी बाधंकाम सभापती कैलास तिजोरे, मुख्याधिकारी सचिन राऊत, तालुका अध्यक्ष शेख प्यारेलाल यांच्या हस्ते साड्या वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी  नगरपरिषद कामगार संघटना प्रमुख रमेश खरात, उपाध्यक्ष सुरज मोहीते, राजूभाई काझी,राजू नाईक, देवदान कांबळे ,भानुदास गायकवाड,  विष्णु तुजारे, सुरेश खडांगळे, शेख सलीम जिलानी, शामभाऊ शिंदे, संजय लांडे पाटील,शेख राजुभाई, कडु मगर, डॉ. दिलीप वाघमारे, रईस सौदागर उपस्थित होते.     याप्रसंगी  प्रा .चव्हाण म्हणाले, आम्ही प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत वंचित उपेक्षित शोषित कष्टकरी शेतकरी कामगार या पिचलेल्या वर्गासाठी रस्त्यावर उतरून चळवळीत काम करतो याचा आम्हाला अभिमान आहे. आदरणीय बाळासाहेब हे महामानव डॉ. बाबासाहेब आंब...