Posts

Showing posts from March, 2023

श्री साईगाव पालखीचे आ.आशुतोष काळेंच्या हस्ते विधिवत पूजन

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३० : दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी कोपरगाव शहरात मोठ्या उत्साहात श्रीराम नवमी उत्सव साजरा करून दरवर्षी प्रमाणे श्री साईगाव पालखी व मुंबादेवी तरुण मंडळ यांच्या वतीने श्रीराम नवमी निमित्त कोपरगाव शहरातून शिर्डीला जाणाऱ्या श्री साईगाव पालखीची विधिवत पूजा आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आली.यावेळी आ. आशुतोष काळे हे देखील श्री साईगाव पालखी सोहळ्यात सहभागी झाले यावेळी त्यांनी श्री साई पालखीतील सहभागी हजारो साई भक्तांना श्रीरामनवमीच्या शुभेच्छा दिल्या. कोपरगाव शहरासह कोपरगाव तालुक्यात श्रीराम नवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी अनेक ठिकाणी श्रीराम जन्मोत्सव साजरा करून धार्मिक कार्यक्रमात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते त्याचा असंख्य भक्तांनी लाभ घेतला. श्रीराम नवमी निमित्त दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी कोपरगाव शहरातून शिर्डी येथे श्री साईगाव पालखी काढण्यात आली. या पालखी सोहळ्यात आ.आशुतोष काळे यांनी सहभाग घेवून भक्तांचा उत्साह वाढविला.यावेळी मोठ्या संख्येने साई भक्त श्री साईगाव पालखी सोहळ्यात सहभागी झाले यावेळी श्रीराम व श्री साईंच्या गजरात श्री साईगाव प...

प्रभू श्री रामचंद्र यांचे जीवनचरित्र स्फूर्ती व प्रेरणा देणारे - अवचिते महाराज

शेवगाव प्रतिनिधी, दि . ३० : मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्र यांचे जीवन चरित्र सर्वांना स्फूर्ती व प्रेरणा देणारे आहे. आजच्या युवकांनी प्रभू रामचंद्रांच्या जीवनापासून प्रेरणा घेवून मर्यादेत जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर आपले जीवन सार्थकी लागणार असल्याचे प्रतिपादन ह भ प विक्रम महाराज अवचिते यांनी केले.      श्रीराम नवमी उत्सवाच्या निमित्ताने येथील सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने शेवगावातील आखेगाव रस्त्यावरील स्वराज्य मंगल कार्यालयापासून भव्य शोभा यात्रा काढण्यात आली. यावेळी जय श्रीरामाच्या उदघोषाने परिसर दणाणून गेला. भव्य रथात प्रभू श्री रामचंद्र, सीतामाई, लक्ष्मण, हनुमान यांच्या मूर्तीसह मिरवणुकीत सहभागी झालेल्या शहीद भगतसिंग सार्वजनिक मंडळाच्या ढोल ताशा पथकाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. बाल टाळकरी, विविध सार्वजनिक मंडळाच्या  लेझीम पथकासह  रामभक्तांची  मोठी उपस्थिती होती. मिरवणुकीवर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली. शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, क्रांती चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गाने शोभा यात्रा बाजार पेठेतील श्रीराम मंदिराच्या परिसरात आल्यानंतर त्याठिकाणी राम...

शाश्वत विकासासाठी बायोटेक्नॉलॉजी उत्तम पर्याय - मोम्ना हेजमदी

संजीवनी वरिष्ठ महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय परीषद कोपरगांव प्रतिनिधी, दि. ३० : बायोटेक्नॉलॉजी हे तंत्रज्ञान आरोग्य, शेती, औषध निर्माण, वैद्यकिय, अन्न सुरक्षा, अशा अनेक क्षेत्रात उपयोगी आहे. आधुनिक बायोटेक्नॉलॉजी मानवी आयुर्मान वाढविण्यासाठी अत्यत उपयोगी आहे. या तंत्रज्ञानाने अनेक क्षेत्र व्यापले असुन आपल्या जीवनमानाशी या तंत्रज्ञानाचा अगदी जवळचा संबंध आहे, म्हणुन शाश्वत विकासासाठी बायेटेक्नॉलॉजी हा उत्तम पर्याय आहे, असे प्रतिपादन युनिर्व्हसिटी ऑफ बाथ, युनायटेड किंग्डमच्या प्रो व्हाईस चांसलर प्रा. मोम्ना हेजमदी यांनी केले. संजीवनी आर्टस, कॉमर्स व सायन्स कॉलेजने मायक्रोबायोलॉजी सोसायटी, इंडियाच्या सहकार्याने आयोजीत केलेल्या ‘इनोव्हेशनस् इन बायोटेक्नॉलाजी रिसर्च फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंटःचॅलेंजेस अँड  प्रक्टिसेस’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय  परीषदेच्या उद्घाटन प्रसंगी प्रा. मोम्ना हेजमदी बोलत होत्या. संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे यांनी सोहळ्याचे अध्यक्षस्थान भुषविले. सदर प्रसंगी अहमदनगर लोकमत आवृत्तीचे संपादक सुधिर लंके, संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  मॅने...

साईगाव पालखी सारखे सामाजिक व धार्मिक सोहळे समाज घडवण्याचे केंद्रस्थान - स्नेहलताताई कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २९ : कोपरगाव येथील मुंबादेवी तरुण मंडळाच्या वतीने श्रीराम नवमीनिमित्त गेल्या २९ वर्षांपासून श्री साई गाव पालखी सोहळा व कथा सोहळ्याचे आयोजन केले जाते. हा खरोखरच स्तुत्य आणि अभिनंदनीय उपक्रम आहे. अशा सार्वजनिक सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांना संजीवनी उद्योग समूह आणि कोल्हे परिवाराच्या वतीने नेहमीच सहकार्य केले जाते. मुंबादेवी तरुण मंडळाच्या वतीने आयोजित श्री साई गाव पालखी सोहळ्यामध्ये आमचा नेहमीच हातभार असतो. यापुढेही अशा उपक्रमांना संजीवनी उद्योग समूह व कोल्हे परिवाराचे कायम सहकार्य राहील, अशी ग्वाही भाजपच्या प्रदेश सचिव तथा माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी दिली. श्रीराम नवमीनिमित्त कोपरगाव येथील मुंबादेवी तरुण मंडळाच्या वतीने श्री साई गाव पालखी सोहळ्यांतर्गत यावर्षी नाशिक येथील श्री मातृमंदिर सेवा संस्थानचे प्रमुख प. पू. महंत श्री कालिकानंदजी महाराज यांच्या  आदिशक्ती महात्म्य कथा सोहळ्याचे आयोजन केले आहे. स्नेहलताताई कोल्हे यांनी मंगळवारी (२८ मार्च) या सोहळ्यात सहभाग घेऊन प. पू. महंत श्री कालिकानंदजी महाराज यांच्या सुमधुर वाणीतून आदिशक्ती महात्म्य कथा श्रव...

शेवगाव बाजार समिती निवडणुकीसाठी २२० उमेदवारी अर्जांची विक्री, २६ अर्ज दाखल

शेवगाव प्रतिनिधी, दि २९ : शेवगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याच्या आज तिस-या दिवशी बुधवारी २६ अर्ज दाखल झाले असून त्यात सोसायटी, मतदार संघातून २०, ग्रामपंचायत व व्यापारी मतदार संघातून प्रत्येकी तीन उमेदवारी अर्जांचा समावेश असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक विजय कुमार लकवाल यांनी दिली.         बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी सोमवार दि.२७ मार्च पासुन उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. मात्र सोमवारी व मंगळवारी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. दोन्ही दिवस निरंक राहिले. बुधवारी सोसायटी मतदार संघाच्या सर्व साधारण विभागातून १३, महिला व इतर मागास विभागातून प्रत्येकी दोन, तसेच विमुक्त जाती, भटक्या जमाजी विभागातून तीन, तसेच ग्रामपंचायत सर्वसाधारण विभागातून तसेच व्यापारी मतदार संघातून प्रत्येकी तीन असे एकूण २६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. आज अखेर २२० उमेदवारी अर्जांची विक्री झाली.       बुधवारी सोसायटी सहकारी संस्था मतदार संघातील सर्व साधारण प्रवर्गातून बाजार समितीचे माजी सभापती अनिलराव मडके, ...

आपल्यातील हुन्नर ओळखून मार्गक्रमण करा, यश मिळाल्याशिवाय रहाणार नाही- बाबासाहेब सौदागर

शेवगाव प्रतिनिधी, दि. २९ : आयुष्यात थकून जाऊ नका, मागे फिरू नका. परमेश्वराने आपल्या प्रत्येकाला एकतरी जमेची बाजू दिलेली असते. ती पारखून काय करायचं ती दिशा ठरवून चालत रहा यश आपोआप आपल्या कवेत आल्याशिवाय राहणार नाही. असे प्रतिपादन गदिमा पुरस्कार सन्मानीत प्रसिद्ध सिने गितकार बाबासाहेब सौदागर यांनी केले.        येथील  न्यू आर्ट्स कॉमर्स अॅण्ड सायन्स महाविद्यालयात आज वार्षिक पारितोषिक समारंभ उत्साहात पार पडला. सिने-गीतकार, लेखक, कवी , पटकथाकार विविध साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष अशा ‘ बहुरंगी व्यक्तिमत्व लाभलेल्या  बाबासाहेब सौदागर याचे हस्ते पारितोषिक वितरण झाले, यावेळी ते बोलत होते.     प्रारंभी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.  बाबासाहेब सौदागर यांनी “माझ्या गाण्याची जन्मकथा” या विषयावर आपल्या ओघवत्या शैलीत त्यांचा गीतकार व कवी होण्याचा जीवनपट उलगडून सांगितला. व्याख्याना दरम्यान त्यांचा हा प्रवास अभंगापासून लावणी, प्रेमगीत, गोंधळ, देशभक्ती पर गिते, जी विविध चित्रपटात गायली गेली आणि गाजली ती संबधित चित्रपटातील शॉट प्रक्षेपित ...

हुशारी, कष्टापेक्षा प्रामाणिपणा महत्वाचा - माजी मंत्री राजेश टोपे

 संजीवनी इंटरनॅशनल स्कूल मध्ये वार्षिक स्नेहसम्मेलन उत्साहात कोपरगांव प्रतिनिधी, दि. २९ : मनुष्याला यशस्वी होण्यासाठी त्याच्यातील हुशारी, कष्ट करण्याची तयारी आणि स्वभावात प्रामाणिकपणा असे तीन गुण महत्वाचे असतात. पहिले दोन गुण आहेत आणि तिसरा गुण प्रामाणिपणाच नाही तर पहिल्या दोन गुणांची किंमत शुन्य होते. म्हणुन शालेय जीवनात विध्यार्थ्यांमध्ये प्रामाणिपणाचे रसायन भरले तर भविष्यात  कोणतही वादळ-वारं त्यांना विचलीत करणार नाही. यासाठी संस्कारक्षम पिढी घडविणे, हे शिक्षणाचे मुख्य ध्येय असावे, असे प्रतिपादन महाराष्ट्र  राज्याचे माजी सार्वजनिक आरेग्य व कुटूंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांनी केले. संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स  संचलित शिर्डी  येथिल संजीवनी इंटरनॅशनल स्कूलच्या वार्षिक स्नेहसम्मेलन व वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्यात  प्रमुख पाहुणे म्हणुन टोपे बोलत होते. यावेळी कोपरगांवच्या प्रथम महिला आमदार स्नेहलता कोल्हे, कलावती कोल्हे, संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, स्कूलच्या संचालिका डॉ. मनाली कोल्हे, प्राचार्या सुधा सुब्रमण्यम उपस्थित होते. पालक आणि विध्यार्...

खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे अभ्यासू व सुसंस्कृत नेतृत्व काळाच्या पडद्याआड - स्नेहलताताई कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २९ : भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे आज निधन झाले. ही अतिशय दुख:द बातमी आहे. खा.गिरीश बापट यांच्या निधनामुळे भाजपची खूप मोठी हानी झाली आहे. त्यांच्या निधनामुळे एक मनमिळाऊ स्वभावाचे अभ्यासू व सुसंस्कृत नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले असून, आपण एक आदर्श लोकप्रतिनिधी, प्रामाणिक आणि निष्ठावंत नेता गमावला आहे, अशा शब्दांत भाजपच्या प्रदेश सचिव तथा माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी खा. गिरीश बापट यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. स्नेहलताताई कोल्हे म्हणाल्या, खा.गिरीश बापट साहेब यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. गिरीश बापट आज आपल्यामध्ये राहिले नाहीत यावर विश्वासच बसत नाही. ते अत्यंत झुंजार असे व्यक्तिमत्त्व होते. गेल्या दीड वर्षांपासून ते एखाद्या झुंजार योद्ध्याप्रमाणे आजाराशी झुंज देत होते. पक्षावर त्यांची अजोड निष्ठा होती. दुर्धर आजाराशी झुंजत असतानादेखील गिरीश बापट साहेब हे भारतीय जनता पक्षाला ऊर्जा देण्याचे काम करत होते. शेवटच्या क्षणापर्यंत ते पक्षासाठी कार्य करत होते. आजारातून ते बरे होऊन सार्वजनिक जीवनात पुन...

कोपरगाव नगरपरिषदे मार्फत जागतिक शून्य कचरा दिवस साजरा

  कोपरगाव प्रतिनिधी, दि. २९ : कोपरगाव नगरपरिषद मार्फत जागतिक शून्य कचरा दिवस व स्वच्छता उत्सव २०२३  या निमित्ताने जनजागृतीसाठी कोपरगाव नगरपरिषदे मार्फत स्वच्छता जागृती फेरी आणि स्वच्छता शपथ कार्यक्रमाचे आयोजन कोपरगाव नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी सर्व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी  सकाळी साडे दहा वाजता कोपरगाव नगरपरिषदेचे सर्व अधिकारी, कर्मचारी, आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी यांच्या उपस्थितीत नगरपरिषद कार्यालय आवारात स्वच्छता शपत घेण्यात आली. त्यानंतर सर्व अधिकारी कर्मचारी स्वच्छता कर्मचारी यांच्या समवेत कोपरगाव शहरातून स्वच्छता जागृती फेरी काढण्यात आली. जेणे करून शहरातील नागरिकांमध्ये स्वच्छते विषयी जनजागृती होईल आणि आपले शहर कचरा मुक्त होईल असा प्रामुख्याने उद्देश होता. तसेच दैनदिन कचरा हा घंटा गाडी मध्ये देतांना तो विलगीकरण करून दिल्यास स्थानिक स्वराज्य संस्थेस या संकलित कचऱ्यावर प्रक्रिया करणे सोपे होईल व त्या प्रक्रीये वरचा खर्च कमी होऊ शकतो. तसेच  नागरिकांनी सिंगल युज प्लास्टिक पिशवीचा वापर न करता कापडी पिशवीचा वापर करावा याबाबत देखील  जनजा...

बाजार समितीची निवडणूक ही शेतक-यांच्या प्रपंचाची निवडणूक - माजी आमदार घुले

शेवगाव प्रतिनिधी, दि . २७ :   बाजार समितीची निवडणूक ही शेतक-यांच्या प्रपंचाची निवडणूक असल्याने गावागावातील कार्यकर्त्यांनी राजकारणातील आपले मतभेद बाजूला ठेवून शेतक-यांचे कल्याण व आर्थिक प्रगती महत्वाची समजून शेतक-यांना न्याय देणाऱ्या राष्ट्रवादी प्रणीत ज्ञानेश्वर शेतकरी विकास मंडळामागे आपली शक्ती समर्थपणे उभी करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन लोकनेते मारुतराव घुले पाटील, ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माजी आमदार डॉ.नरेंद्र पाटील घुले  यांनी केले.      शेतकऱ्याची कामधेनु असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या संदर्भात राष्ट्रवादी प्रणित  ज्ञानेश्वर शेतकरी विकास मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या आयोजित मेळाव्यात माजी आमदार डॉ.घुले अध्यक्ष पदावरून बोलत होते. माजी आमदार चंद्रशेखर घुले, पंचायत समितीचे माजी सभापती डॉ.क्षितीज घुले,  काकासाहेब नरवडे, ज्येष्ठ नेते अरुण पाटील लांडे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे आदींची प्रमुख उपस्थिती होती. डॉ.घुले पुढे म्हणाले , लोकनेते मारुतराव घुले पाटील यांनी या परिसरातील शेतक-यांना न्याय मिळावा यासाठी ...

पाकिटासाठी पक्ष बदलणाऱ्यांनी भाजपा पदाधिकाऱ्यांबद्दल बोलु नये - प्रसाद नरोडे

कोपरगाव प्मेरतिनिधी, दि. २७ : मेलेल्या माणसाच्या टाळूवरचे लोणी खाण्यासारखे अंत्यविधीसाठी लागणारे रॉकेल काळ्या बाजाराने विकणारे, गोर गरिबांचे हक्काचे रेशनचा काळा बाजार करून आयुष्य जगणारे पाकिटासाठी दलबदलु आणि सावकारीचा धंदा करून गरिबांची पिळवणूक करणाऱ्या व जुगार आणि वाळू धंद्यात भागीदारी असणाऱ्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांवर बोलू नये असा सल्ला नरोडे यांनी दिला आहे. ‘काळे गटात स्वतःचा एकही निष्ठावंत उरला नाही की, काय म्हणून जे ज्यांचे दात कोरले त्यांतही कोल्हेंचे उपकार दिसतील. अशा कोल्हे गटातून पाकिटासाठी फुटून गेलेले फुटीर आहेत. त्यांचा खांदा वापरून कोल्हेंवर टीका करावी लागणे ही काळेंची नामुष्की आहे. त्यामुळे काळे गटाने स्वतःचे निष्ठावंत खांदे तयार करावे अशी सणसणीत चपराक नरोडे यांनी लगावली आहे. गेले तीन वर्षांपासून विद्यमान आमदार आणि त्यांचे चेलेचपेटे यांनी शहर विकासाबद्दल कायमच जनतेची सतत दिशाभूल केली आहे. तीन वर्षांत डोळ्यांनी दिसेल असे एकही भरीव काम विद्यमान आमदारांना करता आलेले नाही. जी कामे झाली ती माजी आमदार सौ.स्नेहलता कोल्हे यांच्या कार्यकाळात झालेली आहेत. त्याचे लोकार्पण करण्या...

पाकीटवाल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी विकासकामांवर बोलावे - मनोज नरोडे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २७ : कोपरगाव शहर विकासासाठी जिल्हा नियोजन अंतर्गत घेतलेल्या विकास कामांमध्ये वैशाली स्कुटर ते अमरधाम या रस्त्याच्या कामास तांत्रिक मान्यता मिळून या कामाचे नियोजन विभागाकडे प्रस्ताव देखील तयार आहे. परंतु कोपरगाव तालुक्याच्या माजी लोकप्रतिनिधिंनी सदरचा रस्ता होऊ नये व स्पर्धात्मक निविदा न निघता स्वतःच्या मर्जीतील ठेकेदारांना दहा-दहा लाखांचे पंधरा कामे मिळावी यासाठीचे पत्र नगरपालिकेला दिले. यामुळेच कोपरगाव शहरातील विकासात अतिशय महत्त्वाच्या असलेल्या  विकास कामांना कुठेतरी खिळ बसू शकणार आहे. तेव्हा याचे संशोधन करून विकासाचे वावडे कोणाला आहे याचे पाकीटवाल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आत्मपरीक्षण करून विकासावर बोलावे असा टोला राष्ट्रवादीचे मनोज नरोडे यांनी भाजपचे पदाधिकाऱ्यांना लगावला आहे. नरोडे यांनी पुढे असे म्हटले आहे की, आजपर्यंत कोल्हेंनी नेहमीच कोपरगाव शहराच्या नागरिकांची वेळोवेळी अशीच दिशाभूल केली असून २०१९ च्या  विधानसभा निवडणुकीत कोपरगाव शहरातील मतदारांनी आ. आशुतोष काळे यांना दिलेले मताधिक्य अजूनही माजी आमदार स्नेहलता कोल्हे विसरलेल्या नसून ते त्यांच्या चांगलेच...

कोल्हे यांच्या प्रयत्नामुळे खोपडीतील शेतकऱ्यांना १८ वर्षांनंतर मिळाला जमिनीचा मोबदला

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २७ : नांदूर मधमेश्वर जलद कालव्याच्या वितरिकेसाठी जमिनी दिलेल्या कोपरगाव तालुक्यातील खोपडी येथील १७ शेतकऱ्यांना अखेर १८ वर्षांनंतर जमिनीचा मोबदला मिळाला आहे. संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, भाजपच्या प्रदेश सचिव तथा माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे आणि सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांच्या विशेष प्रयत्नामुळे सदर शेतकऱ्यांना जमिनीच्या मोबदल्यापोटी सुमारे १ कोटी १२ लाख रुपये इतकी रक्कम प्राप्त झाली आहे. कोल्हे यांच्यामुळे मागील १८ वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न मार्गी लागल्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांनी कोल्हे यांचे आभार मानले आहेत. कोपरगाव तालुक्यातील खोपडी येथील सुरेश जाधव, दत्तात्रय जाधव, नानासाहेब भवर, संजय जाधव, मोहन जाधव, संजय भवर, विनोद नाईकवाडे, ज्ञानेश्वर पवार, दगू वारकर, किसन वारकर, किसन जाधव, धनंजय जाधव, गोरख पवार, गोरख भवर, गौरव खैरनार, अनिताबाई भवर, मंदाबाई पवार, मंदाबाई वारकर आदी शेतकऱ्यांची जमीन नांदूर मधमेश्वर जलद कालव्याच्या वितरिका क्र....

कृषी यांत्रिकीकरण योजनेत कोपरगाव तालुका जिल्ह्यात प्रथम – आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २७ : नवनवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आधुनिक यंत्र सामुग्रीच्या मदतीने शेती करणे काळाची गरज आहे. परंतु सर्वच शेतकरी कृषी औजारे खरेदी करू शकत नाही अशा गरजू शेतकऱ्यांसाठी शासनाकडून कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या माध्यमातून अनुदान तत्वावर कृषी विभागाकडून कृषी औजारे देण्यात येतात. मात्र कृषी औजारांच्या शेतकऱ्यांच्या मागणी अर्जाची संख्या व मिळणारे अनुदान यामध्ये मोठी तफावत होती. त्यामुळे जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या माध्यमातून ट्रॅक्टर व कृषी औजारांचा लाभ मिळवून द्या अशा सूचना कृषी विभागाला केल्या होत्या. त्यानुसार कृषी विभागाने केलेल्या प्रामाणिक प्रयत्नातून कृषी यांत्रिकीकरण योजनेचा शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यात कोपरगाव तालुका जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर असल्याची माहिती देवून आ. आशुतोष काळे यांनी कृषी विभागाचे कौतूक केले आहे. कृषी विभागाच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या माध्यमातून लाभार्थी शेतकऱ्यांना आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते ६ कोटी ५० लाखाचे ट्रॅक्टर व कृषी औजारांचे वाटप करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते.  काळे पुढे म्हणाले की, दि...

श्रीगणेश प्रज्ञाशोधपरीक्षा रविवारी

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २४ :  कोऱ्हाळे येथील श्रीगणेश कनिष्ठ  महाविद्यालयाच्या वतीने ईयत्ता १० वी ची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी  श्रीगणेश टॅलेंट सर्च परीक्षा रविवारी (ता.२६ मार्च ) ऑफलाइन घेण्यात येणार आहे. सकाळी १०.०० ते १२.०० या वेळेत संपन्न होणाऱ्या या परीक्षेसाठी कोणतेही शुल्क घेण्यात येणार नाही.  तसेच या परीक्षेत सहभागी होणाऱ्या परीक्षार्थी विद्यार्थ्यास व पालकास करीअर मार्गदर्शन संबधी विविध पर्याय या विषयावर तज्ञ मंडळींमार्फत मार्फत चर्चा केली जाणार आहे, अशी माहिती श्रीगणेश शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. विजय शेटे यांनी  दिली आहे.             ते म्हणाले कि ,सदर परीक्षेचा अभ्यासक्रम पूर्णतः १० वीचा असून ५० प्रश्न बहुपर्यायी १०० गुणांसाठी विचारले जाणार आहे. त्यामध्ये सायन्स २५ प्रश्न ,गणित १५ प्रश्न ,गणित बुध्दीमत्ता १० प्रश्न अशी विभागणी केलेली आहे. परीक्षेचा कालावधी १ तास राहील. या परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यासाठी सात हजार, व्दितीय क्रमांकासाठी पाच हजार, तृतीय  क्रमांकासाठी तीन हजार व उत्तेजनार्थ एक हजाराची (५ बक्षिसे), सातशेची (२० बक्षिसे), पाचशेची...

स्व. कोल्हे साहेब यांना जलजीवन मिशन पाणीयोजनेचे भूमीपूजन करून अभिवादन

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २४ : माजी मंत्री स्व.शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या ९४ व्या जयंतीनिमित्त शिंगणापूर येथे ३० कोटी ३० लाख रुपयांचे जलजीवन पाणी योजनेचे भूमिपूजन मा.आ.सौ.स्नेहलताताई कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले. विविध आंदोलन, मोर्चे सत्याग्रह करून पाण्यासाठी लढा उभारणारे नेते म्हणून स्व.शंकररावजी कोल्हे साहेब यांची ओळख आहे. राजकीय फायदा तोटा विचारात न घेता शेतकरी कष्टकरी यांना पाणी मिळाले पाहिजे यासाठी त्यांचा अट्टाहास कायम होता. स्व.कोल्हे साहेब यांची जयंती पाणी योजनेचे भूमीपूजन होऊन साजरी होणे ही त्यांना खरी आदरांजली आहे. शेती, पाणी, वीज, सहकार, रोजगार, उद्योग, शिक्षण हे कोल्हे साहेबांचे जिव्हाळ्याचे विषय होते. सातत्याने नाविन्यपूर्ण बदल व प्रगत विचार अमलात आणून सर्वसामान्यांचे आयुष्य सुखकर करण्याचे काम साहेबांनी केले. शिंगणापूर ही कोल्हे साहेबांची कर्मभूमी आहे. कोल्हे साहेब यांनी संजीवनी उद्योग समूह, शिक्षण संस्था, कॉल सेंटर आदी उभारून कायापालट करून रोजगार निर्मितीवर भर दिला. ज्यामुळे मोठा विकास घडून आला आहे. भविष्यकाळात भेडसावणाऱ्या समस्या निर्माण होण्याआधीच उपाययोजना करून का...

कर्मवीर काळे साहेबांच्या जयंतीनिमित्त ‘महाराष्ट्राचा हास्य कल्लोळ’ कार्यक्रमाचे आयोजन

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २४ :  मराठी प्रेक्षकांच्या अव्वल पसंतीचा ‘सोनी मराठी’ वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ हा कार्यक्रम प्रेक्षकांना पोट धरून हसवत आहे. माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त आ. आशुतोष काळे यांच्या संकल्पनेतून यावर्षी ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमातील कलाकारांचा ‘महाराष्ट्राचा हास्यकल्लोळ” हा आगळा वेगळा आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाचे कलाकार रसिकांना पोट धरून हसवण्यासाठी कोपरगावच्या दौ-यावर येत असून या कार्यक्रमाचा कोपरगाव तालुक्यातील तमाम रसिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. सालाबाद प्रमाणे याहीवर्षी कोसाका उद्योग समुहाचे संस्थापक माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. त्यानिमित विविध धार्मिक, सामाजिक व मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार दिनांक ०३ एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी ७.०० वाजता कोपरगाव तहसील कार्यालयाच्या भव्य मैदानावर कोपरगाव तालुक्या...

संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्समध्ये स्व. शंकरराव कोल्हे यांची जयंती साजरी

कोपरगांव प्रतिनिधी, दि. २४ : संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित कोपरगांव, वैजापुर, शिर्डी, येवला, नवी मुंबई येथिल विविध संस्थांमध्ये संस्थेचे संस्थापक स्व. शंकरराव  कोल्हे यांची जयंती भावपुर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. प्रत्येक संस्थेत स्व. कोल्हे यांच्या प्रतिमेचे पुजन करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. कोपरगांव येथिल मुख्यालयात भव्य रक्तदान शिबीर घेण्यात आले. या शिबिरात  संजीवनी इंजिनिअरींग काॅलेज, संजीवनी के.बी.पी. पाॅलीटेक्निक, फार्मसी, ज्युनिअर व सिनिअर काॅलेज, आदी संस्थांमधिल विद्यार्थ्यांनी  मोठा सहभाग नोंदविला. या शिबिरा दरम्यान संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष श्री नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, विश्वस्त सुमित कोल्हे, संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स  संचलित विविध संस्थांचे प्राचार्य यांनी भेटी देवुन रक्तदात्यांची चौकशी  केली. संजीवनी ब्लड बॅकेने रक्त संकलित केले. स्व. कोल्हे यांच्या जयंती निमित्ताने संजीवनी ग्रुप इन्स्टिट्यूट्स  मधिल ‘स्टार्ट अप’ उद्योगाने तयार केलेली सौर उर्जेवर चालणारी तीन चाकी सायकल श्रीरामपुर तालुक्यातील खानापुर येथिल ८७...

माजी आमदार कोल्हेंचा शहर विकासाला अडथळा – संदीप वर्पे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २४ : यापूर्वीही माजी आमदारांनी २८ विकासकामांना विरोध करून कोपरगाव शहरातील नागरिकांना दोन वर्ष विकासापासून वंचित ठेवले आहे. त्यामुळे त्या काळात कोपरगावच्या जनतेने काय भोगलंय हे जनता अजून विसरलेली नाही. व आता पुन्हा एकदा विकास कामांना आडवे जाण्यासाठी तुम्ही करीत असलेल्या खटाटोपामुळे पुन्हा कोपरगावची जनता विकासापासून दूर जाणार आहे. त्यामुळे आपल्या मर्जीतल्या ठेकेदाराचा आर्थिक स्वार्ध साधण्यासाठी माजी आमदार शहर विकासाला अडथळा निर्माण करीत असल्याची टीका राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे यांनी माजी आमदार सौ. स्नेहलता कोल्हे यांच्यावर केली आहे. कोपरगाव नगरपरिषदेणे शहर विकासाच्या दृष्टीने आ. आशुतोष काळे यांच्या सूचनेनुसार हाती घेतलेल्या कोपरगाव शहरातील नियोजित कामात माजी आमदार कोल्हे यांच्या दबावाला न जुमानता  या कामात बदल करून करू नये यासाठी आ. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने उपमुख्याधिकारी ज्ञानेश्वर चाकणे यांना निवेदन देण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते.  संदीप वर्पे पुढे असे म्हणाले  की, जिल्हा नियोजन विभाग अ...

गुरुजी शाळा भरवा, नाहीतर आम्ही भरवतो पढेगाव ग्रामस्थांचा एल्गार

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १८ : सरकारी कर्मचाऱ्यांचा जुन्या पेन्शन योजनेसाठी बेमुदत संप सुरु आहे. त्या संपात शिक्षकही सहभागी असल्यामुळे आता शाळाही बंद आहे. मात्र त्यासाठी विद्यार्थी शिक्षणापासुन वंचित रहात असल्यामुळे तालुक्यातील पढेगावच्या ग्रामस्थांनी शुक्रवारी सोशल मिडीयावर शनिवारी सकाळी शाळा पदवीधरांनी पुढे यावे शाळा भरवायची आहे आशा आशयाचा मजकूर व्हायरल केला. त्याप्रमाणे शनिवारी सकाळी आठ वाजता पालक, विद्यार्थी, ग्रामस्थांनी शाळेच्या गेटवर गर्दी करुन तातडीची ग्रामसभा घेऊन त्यात गुरुजी शाळा भरवा नाहीतर आम्ही भरवतोचा नारा पुकारण्यात आला.        जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक रामभाऊ सोळसे यांना फोन करुन बोलवण्यात आले. परंतु त्यांना उशिर होत असल्यामुळे ग्रामस्थांनी तातडीने ग्रामसेवक, तलाठी, कोतवाल, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीत उपसरपंचांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभेला सुरुवात केली. तदनंतर मुख्याध्यापक रामभाऊ सोळसे, उपशिक्षक महानुभाव, बाराते, हांडे उपस्थित झाले. चर्चेअंती सोळसेंनी सहशिक्षकांशी चर्चा करुन धरणे आंदोलनानंतर जो वेळ मिळेल त्या काळात शाळा भरविण्याचा शब्द ग्रामस्थांना दिल...

न केलेल्या कामाचे श्रेय घेता, मग आपल्या कार्यकाळात काय केले - माधवी वाघचौरे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १८ : ज्यांचे भूमिगत गटारीसाठी कवडीचे योगदान नाही. त्यांनी आमच्यामुळे या गटारीचे काम सुरु झाल्याची टिमकी वाजवायला सुरुवात केली असून ज्यांना त्यांच्या कार्यकाळात काही करता आले नाही ते आता न केलेल्या कामाचे श्रेय घेत आहे मग त्यांनी आपल्या कार्यकाळात काय केल? असा तिरकस सवाल राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका माधवी वाकचौरे यांनी भाजपच्या माजी नगरसेविका वैशाली आढाव यांना विचारला आहे. बुब हॉस्पिटल ते श्री छत्रपती संभाजी महाराज सर्कल पर्यंत दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यावर पावसाचे पाणी साचल्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते.त्यामुळे त्या ठिकाणी भूमिगत गटार व्हावी अशी नागरिकांची मागील अनेक वर्षापासुनची मागणी होती. त्याबाबत आ. आशुतोष काळे यांच्याकडे हि मागणी मांडण्यात आली. त्यावेळी नागरिकांना होत असलेल्या त्रासाची दखल घेवून आ. आशुतोष काळे यांनीच मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना सूचना करून बुब हॉस्पिटल ते श्री छत्रपती संभाजी महाराज सर्कल पर्यंत भूमिगत गटार बांधण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या सूचनेनुसार भूमिगत गटारीचे काम सुरु झाले आहे. मात्...

ढम्पर चालकाची वनरक्षकला मारहाण

शेवगाव प्रतिनिधी , दि. १८ : येथील गट नं- ७६९ मध्ये टाटा कंपनीचा विना नंबरचा खडीचा टीपर वनरक्षकांनी आडवला असता चालक व त्याच्या साथीदारानी त्यांना शिवीगाळ करून एका हंगामी कर्मचाऱ्यास  पळवून लकी हॉटेलच्या मागे नेऊन  लाथा बुक्याने जबर मारहाण केल्याच्या कारणावरून सरकारी कामात अडथळा आणल्याची फिर्याद शेवगाव पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.      या संदर्भात अधिक माहिती अशी की,  वनरक्षक आप्पा माणिक घनवट ( वय ४०) रा .पाथर्डी यांनी  या  टीपर वरील चालक परवेज बालम शेख रा. कऱ्हेटाकळी ता.शेवगाव याचे विरुद्ध ही फिर्याद दाखल केली आहे.     शेख टिपरमधुन डबर खाली  करत असताना  फिर्यादी घनवट यांनी  येथे डबर खाली करु नको असे सागितले असता तो डबर खाली करुन टीपर घेवुन पळुन जात असताना त्यास फिर्यादी व त्यांचे सह कर्मचारी यांनी पकडले. तेव्हा चालकाने ४ अनोळखी ईसमांना बोलावुन फिर्यादीस व वनपाल शिरसाठ यांना शिविगाळ दमदाटी करून  त्यांचेकडील हंगामी कर्मचारी शिवनाथ जिवडे हा त्याचे टिपरमध्ये बसलेला असताना त्यास लकी हॉटेलच्या पाठीमागे नेवुन लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन टिपर घेवुन पळुन गेले आहेत. असे म्हटले आहे. सपोनि...

बिजनेस एक्सपोमध्ये श्रीमान गोकुळचंदजी विदयालयाचे स्पृहणीय यश

कोपरगांव प्रतिनिधी, दि. १८ : येथिल महात्मा गांधी चॕरिटेबल ट्रस्ट  या ठीकाणी दिनांक ९ मार्च ते १४ मार्च दरम्यान ‘शिवबा माझा मानाचा, एक्सपो आपल्या गावाचा’ या विचारावर लायन्स, लिनेस व लिओ क्लब आॕफ कोपरगांव आयोजित बिजनेस एक्सपो व सांस्कृतिक महोत्सवा मध्ये श्रीमान गोकुळचंदजी विदयालयाने विविध स्पर्धामध्ये सहभागी होत स्पृहणीय कामगिरी केली. शालेय चित्रकला स्पर्धेत कु. जारा शेख ८अ या विद्यार्थिनीचा  तृतीय क्रमांक आला. शालेय निबंध स्पर्धा मध्ये कु. साक्षी खोतकर हीला व्दीतीय क्रमांक ७००/- रोख तर कु.जोया पठाण हीला  तृतीय क्रमांक५००/- रोख रुपये मिळाले. या विदयार्थींना अनिल अमृतकर, अतुल कोताडे, सौ.एस.आर.अजमेरे, अनिल काले, सुरेश गोरे यांनी मार्गदर्शन केले. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनात विदयालतील विदयार्थींनी छत्रपती शिवजी महाराजांचे जीवन चरीत्रावरील  सामुदायिक नृत्य सादर केले. या नृत्याला तृतीय क्रमांक मिळाला. ७०००/-रोख व प्रशस्तीपत्र, स्मृतीचिन्ह असे बक्षिसांचे स्वरुप आहे. या नृत्यामध्ये ध्रुव हेमंत लोहकणे, प्रथमेश किशोर जाधव, योगीराज रवींद्र निकुंभ,विराट गोविंद शिंदे,ललित आप्पासाहे...

शेवगाव-पाथर्डीची जनता "सोंगाड्याना " त्यांची जागा दाखवेल - प्रा. चव्हाण

शेवगाव प्रतिनिधी, दि. १८ : राज्यांतील दोन वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकासह लोकसभा आणि विधानसभाही कधीही जाहीर होऊ शकतात . त्यामुळे या पुढचा काळ हा निवडणूकांचा आहे. त्यामुळे गेले चार वर्षे बिळात जाऊन बसलेले कारखानदार आता बिळातून बाहेर येतांना दिसत आहेत. शेवगाव पाथर्डी तालुक्यातील प्रस्थापित कारखानदार आता निवडणुकांची चाहूल लागताच बिळातून बाहेर येऊन “सोंगाडया”सारखी वेगवेगळे सोंग करत आहेत. पण त्यांच्या सोंगांना शेवगाव पाथर्डीतील जनता आता भीक घालणार नाही तर त्यांना त्यांची जागा दाखवतील व पुन्हा बिळात पाठवतील असा विश्वास वंचित बहुजन आगडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांनी व्यक्त केला.         वंचित बहुजन आघाडीचे तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी तसेच गांव प्रमुख आणि बुथ प्रमुख यांच्या आयोजित बैठकीत प्रा. चव्हाण बोलत होते. यावेळी चव्हाण यांनी प्रस्थापित कारखानदारावर सडकून टीका करत आगामी काळातील सर्व निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी सज्ज व्हा असे आवाहन केले.       यावेळी मराठा समाजाचे ज्येष्ठ व्यावसायिक अरूण झांबरे पाटील व एरंडगावचे कल्याणराव...

विवेक कोल्हे यांची को-जनरेशन असोसिएशन ऑफ इंडियाच्या संचालकपदी निवड

कोपरगांव प्रतिनिधी, दि. १८ :  महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाचे संचालक, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक बिपीनदादा कोल्हे यांची को जनरेशन असोसिएशन ऑफ इंडियाच्या संचालकपदी नुकतीच निवड झाली आहे त्याबददल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.  सुरवातीस राज्यात वीजेचा तुटवडा मोठया प्रमाणात जाणवत असतांना सहकारी साखर कारखान्यांनी उसाच्या चिपाडापासून वीज निर्मीतीचे प्रकल्प हाती घ्यावे व राज्याला वीजेचा पुरवठा करावा यासाठी केंद्र व राज्य शासनाने सहकार्य केले होते त्यातून माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांत १२ मे वॅट सहवीज निर्मीतीचा प्रकल्प साकारला होता.    हा प्रकल्प साकारत असतांना व पुर्ण झाल्यानंतर त्यात येणा-या अडी अडचणी सोडविण्यासाठी माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे व संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी केंद्र व राज्य शासनाकडे पाठपुरावा करून विविध सुधारणा घडवून आणल्या होत्या. को जनरेशन असोसिएशन ऑफ इंडियाच्या संचालकपदासाठी राज्यस्तरावर नुकतीच निवडणुकीची प्र...

संजीवनीच्या ४४ विद्यार्थ्यांची ब्रेम्बो ब्रेक्समध्ये निवड - अमित कोल्हे

कोपरगांव प्रतिनिधी, दि, १८ : संजीवनी के.बी.पी. पाॅलीटेक्निकच्या ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नाने ब्रेम्बो ब्रेक्स या बहुराष्ट्रीय  कंपनीने कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत घेतलेल्या परीसर मुलाखतींमध्ये तब्बल ४४ विद्यार्थ्यांची  नोकरीसाठी निवड केली असुन ब्रेम्बो ब्रेक्स कंपनीने ही जम्बो निवड करून संजीवनी पाॅलीटेक्निकचे विध्यार्थी तीन वर्षात  ‘जाॅब रेडी’ होतात, या रूढलेल्या परंपरेला पुष्टी  दिली, अशी  माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.   कोल्हे यांनी पुढे म्हटले आहे की, ब्रेम्बो ब्रेक्स ही मुळची इटालियन कंपनी असुन जगात तीन खंडात १५ देशात  कार्यरत आहे. उच्च कार्यक्षमता कार आणि मोटर सायकलच्या ब्रेकिग सिस्टिमच्या डिझाइन, विकास आणि उत्पादनात ही आघाडीची कंपनी आहे. या कंपनीने नोकरीसाठी निवड केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये  केतकी राजेंद्र गरूड, प्रिती विलास कोते, पुजा रघुनाथ सरोदे, अक्षदा बाळासाहेब सांगळे, नम्रता विश्वास  कोळगे, ऋतुजा नंदकुमार गोळे, मयुर...

महिलांनी दडपण न ठेवता पुढे यावे - राऊळ

शिक्षक बँकेतील महिला मेळाव्यास केले संबोधीत शेवगाव प्रतिनिधी, दि. १७ :  महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत. त्यांच्यात पुरेपुर क्षमता आहे. तेव्हा कोणतेही दडपण न ठेवता त्यांनी  निर्भीड होवून विविध क्षेत्रात हिरीरीने पुढे यायला हवे. असे आवाहन शिक्षण विस्तार अधिकारी शैलजा राऊळ यांनी केले.        गुरुमाऊली मंडळ २०१५, ऐक्य मंडळ, एकल शिक्षक मंच, शिक्षक भारती व परिवर्तन मंडळाच्या वतीने शेवगाव येथील शिक्षक बँकेच्या  फलके गुरुजी सभागृहांत  महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.  यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या.        यावेळी प्राथमिक शिक्षक बँकेचे संचालक रमेश गोरे यांनी शिक्षक बँकेतल्या विविध योजनांची माहिती देवून शिक्षक नेते  बापूसाहेब तांबे, गुरुमाली मंडळाचे अध्यक्ष राजकुमार साळवे, ऐक्य मंडळाचे बाबासाहेब कदम शिक्षक भारतीचे दिनेश खोसे, परिवर्तन मंडळाचे राजेंद्र विधाते व एकल मंचचे एस.पी. नरसाळे यांच्या  मार्गदर्शनाखाली बॅंकेचे कामकाज उत्तम प्रकारे चालू  असल्याचे सांगितले.       यावेळी राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षिका  श्रीकांता शिंदे, जिल्हा पुरस्कार शिक्षिका कृष्णाताई उंदरे, रोहि...

कोपरगाव तालुका माध्यमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी जाधव तर सचिव पदी बोढरे

 कोपरगाव प्रतिनिधी, दि. १७ : तालुक्यातील अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ संलग्नित कोपरगाव तालुका माध्यमिक शिक्षक संघाची नूतन कार्यकारिणी नुकतीचजाहीर झाली असून यात सुरेगाव येथील चांगदेव बारकू कोळपे विद्यालयाचे सचिन जाधव यांची अध्यक्षपदी तर येसगाव येथील न्यू इंग्लिश स्कूलचे उमेश बोढरे यांची सचिव पदी निवड करण्यात आली आहे. कोपरगाव तालुका माध्यमिक शिक्षक संघाचे माजी तालुका अध्यक्ष विलास वाकचौरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेस अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब शिंदे, माजी अध्यक्ष शंकरराव जोर्वेकर, महाराष्ट्र राज्य शिक्षक फेडरेशनचे उपाध्यक्ष चांगदेव कडू, राजेंद्र कोहकडे उपाध्यक्ष अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ प्रशांत होन उपाध्यक्ष अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ, संभाजी गाडे उपाध्यक्ष अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या व कोपरगाव तालुक्यातील बहुसंख्य माध्यमिक शिक्षकांच्या उपस्थितीत कोपरगाव तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या कार्यकारिणीत उपाध्यक्ष पदी  रामचंद्र चावरे (शिवशंकर विद्यामंदिर,रवंदे)  अशो...

हर्षदा काकडे यांना अहिल्यादेवी होळकर पुरस्कार

शेवगाव प्रतिनिधी, दि. १७ : लाडजळगाव गटातील कामांचा मोठा बॅकलॉग भरून काढण्याचा प्रयत्न केला. या भागातील गुंडगिरी, खोटे गुन्हे यावर आळा घालण्याचे काम केले. गोरगरीब जनतेच्या कामा मुळेच पुरस्कार मिळाला. तो पुरस्कार मी आपल्या चरणी अर्पण करते. हा सन्मान माझा नसून आपल्या सर्वांचा असल्याचे प्रतिक्रीया जि.प.सदस्या हर्षदा काकडे यांनी व्यक्त केली आहे.       महिला व बालकल्याण क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल महाराष्ट्र राज्य शासनाचा “राज्यस्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार” मिळाल्याबद्दल बोधेगाव व पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने काकडे यांचा बोधेगावी नागरी सत्कार करण्यात आला, यावेळी त्या बोलत होत्या.      कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अस्मानराव घोरतळे  होते. यावेळी डॉ.प्रकाश घनवट, प्रकाश भोसले, भाऊसाहेब घोरतळे, राजू पातकळ, विकास घोरतळे, माणिक गर्जे, ज्ञानदेव घोरतळे, पिनू कापसे, लक्ष्मण पातकळ, भाऊसाहेब मासाळ, भागवत भोसले, ज्ञानेश्वर शेटे, वंचितच्या सौ.संगीताताई  ढवळे, बन्नूभाई शेख, अॅड. कार्तिक कमाने, परमेश्वर झांबरे उपस्थित होते.     काकडे म्हणाल्या, या भागातील मुले शिकावित म्हणून काही ...

छत्रपती संभाजी महाराज सर्कल ते लक्ष्मीनगरपर्यंत भूमिगत गटारीचे काम सुरू

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १७ : शहरातील धारणगाव रोडवरील छत्रपती संभाजी महाराज सर्कल ते लक्ष्मीनगरपर्यंत भूमिगत गटारीचे काम नगरपालिका प्रशासनाने हाती घेतले असून, भाजपच्या माजी नगरसेविका वैशाली विजय आढाव यांनी केलेल्या मागणीवरून या भूमिगत गटारीचा आकार वाढविण्यात आला आहे. या भूमिगत गटारीची साईज ३६ इंच प्रस्तावित होती. आता भाजपच्या मागणीवरून या भागात आवश्यक त्या ठिकाणी  ४८ इंच या आकाराची भूमिगत गटार बांधण्यात येत आहे. या कामास सुरुवातही झाली आहे. अतिरिक्त पावसाचे पाणी विनासायास वाहून जावे, यासाठी शहरातील धारणगाव रोडवरील छत्रपती संभाजी महाराज सर्कल ते लक्ष्मीनगरपर्यंत ३६ इंचाऐवजी आवश्यक त्या ठिकाणी ४८ इंच भूमिगत गटारीचे बांधकाम करावे, अशी मागणी भाजपच्या प्रदेश सचिव तथा माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपच्या माजी नगरसेविका वैशाली आढाव यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांच्याकडे मागील महिन्यात म्हणजे फेब्रुवारी २०२३ मध्ये एका निवेदनाद्वारे केली होती. त्या निवेदनाची नगरपालिका प्रशासनाने दखल घेऊन छत्रपती संभाजी महाराज सर्कल ते लक्ष्मीनगरपर्यंत प्रस्तावित ३६ इं...

आमदार काळेंनी अधिवेशनात मांडले मतदार संघाचे विविध प्रश्न

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १७ : कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या जिव्हाळ्याच्या पाट पाण्याच्या प्रश्नाबरोबरच कोपरगाव शहर, ग्रामीण पोलीस स्टेशनची रिक्त पदे तातडीने भरावीत, कोपरगाव शहरात सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसवावेत, वीज रोहित्रांची संख्या वाढवून मिळावी, शहा येथील १३२ के.व्ही.चे सब स्टेशनला मतदार संघातील वीज उपकेंद्र तातडीने जोडण्यात यावे अशा विविध प्रश्नाकडे आ.आशुतोष काळे यांनी २०२३-२४ अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रश्नोत्तराच्या तासात सभागृहाचे लक्ष वेधले. आमदार काळे म्हणाले की, माजी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार हे २०२२ रोजी कोपरगाव येथे विविध विकास कामांच्या लोकार्पण प्रसंगी तसेच कर्मवीर शंकरराव काळे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी कोपरगाव मतदार संघात आले असता त्यांनी कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशन व पोलीस कर्मचारी वसाहतीसाठी निधी देण्याची जाहीर घोषणा केली होती. त्या निधीतून त्या कामांच्या निविदा प्रसिद्ध झाल्या आहेत त्या कामांना तातडीने प्रारंभ करून लवकरात लवकर काम पूर्ण करून पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांचे निवासस्थान मिळावे. त्याचबरोबर कोपरगाव शहर व ग्रामीण पोलीस स्टेशनमध्...

राहाता तालुक्यात साकारणार जिल्ह्यातील पहिला सौर कृषी वाहिनी प्रकल्प

कोपरगाव प्रतिनिधी दि, १६ : राज्यशासनाकडून मिशन मोडवर राबविण्यात येणाऱ्या योजनांमध्ये ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी’ ही प्रमुख योजना आहे. या योजनेत राहाता तालुक्यातील केलवड बुद्रुक व खुर्द येथे ५.४५ हेक्टर शासकीय जागा उपलब्ध झाली आहे. महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नातून या योजनेत अहमदनगर जिल्ह्यातील पहिला शासकीय ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्प’ साकार होणार आहे. शेतकरी आणि शेती केंद्रबिंदू मानून राज्य शासनाने १४ जून २०१७ पासून ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना’ सुरू केली आहे. लोणी येथे २३ फेब्रुवारी २०२३ रोजी झालेल्या राज्यस्तरीय महसूल परिषदेच्या समारोप कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही योजना मिशन मोडवर राबविण्यात यावी. यासाठी शासकीय किंवा खासगी जागेचा प्रशासनाने शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनीही शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी जागेचा शोध घ्यावा. अशा सूचना जिल्हा व तालुका प्रशासनास दिल्या होत्या. यासाठी पालकमंत्र्यांनी स्वत: या जागेसाठी पाठपुरावा केला होता. मुख्यमंत्री सौर...

इन्फ्लूएंझा विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य विभागाने सतर्क राहावे - आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १६ :  मागील काही दिवसांपासून देशात व राज्यात ( H3N2)   अर्थात इन्फ्लूएंझा या विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढताना दिसत असून त्याचे लोन नगर जिल्ह्यात देखील पसरले असून २३ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे.त्यामुळे या विषाणूचा कोपरगाव तालुक्यात प्रसार होणार नाही यासाठी आरोग्य विभागाने सतर्क राहावे अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी आरोग्य विभागाला दिल्या आहेत. इन्फ्लूएंझा या विषाणूचा संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर आ.आशुतोष काळे यांनी आरोग्य विभागाला नागरिकाच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. नव्या इन्फ्लूएंझा या विषाणूच्या वाढत्या संसर्गाने आरोग्य विभागासह सर्वांचीच काहीशी चिंता वाढवली आहे मात्र घाबरून जावू नये. नागरिकांनी सर्दी, खोकला, ताप आदी आजार झाल्यास आजार अंगावर काढू नये व घरगुती उपचार न करता तातडीने डॉक्टरांशी संपर्क करावा. मागील काही महिन्यांपासून जीवघेण्या कोरोनाची डोकेदुखी कमी झाल्यामुळे प्रत्येक व्यक्ती निर्धास्त होवून  मोकळा श्वास घेवू लागले होते. मात्र नव्या इन्फ्लूएंझा या विषाणूच्या स...

माजीमंत्री कोल्हेंचा लढवय्या बाणा सदैव सर्वांच्या स्मरणांत - विवेक कोल्हे

कोपरगांव प्रतिनिधी, दि. १६ : संजीवनी उद्योग समुहाचे संस्थापक, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांची सामाजिक, राजकीय, सहकार, कृषि, शिक्षण, सिंचन, सांस्कृतिक आदि क्षेत्रातील झुंजार कारकिर्द सर्वांनाच प्रेरणादायी असून त्यांचा लढवय्या बाणा सदैव सर्वांच्या स्मरणांत राहणारा असल्याचे प्रतिपादन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी केले. शहरातील अष्टविनायक मित्र मंडळ व त्यांच्या सहका-यांनी प्रथम पुण्यस्मरणानिमीत्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृहातील मुलांना महिनाभर मिष्टान्न देवुन शासकीय, निमशासकीय, गरीब, दीन दलित, उपेक्षीत, अल्पसंख्यांकांसह सर्व क्षेत्रातील सहयोगी प्रतिष्ठीतांसह सदस्यांना स्व. शंकरराव कोल्हें यांच्या आठवणींना उजाळा देण्याची संधी निर्माण करून दिली, खरोखरच हा उपक्रम प्रेरणादायी आहे असेही ते म्हणाले.               प्रारंभी माजी नगरसेवक बबलू वाणी, संदीप देवकर, विनोद राक्षे यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शरद थोरात, माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे, राजेंद्र शिंदे, दिलीप दारुणकर, राजेंद्र सोनवणे, कोल्हे कारखान्या...

पश्चिमेचे पाणी पूर्वेकडे वळवा आमदार काळेंची विधानसभेत मागणी

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १६ : दारणा-गंगापूर धरणावर बिगर सिंचनाचे आरक्षण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. जायकवाडी धरण जोपर्यंत ६५ टक्के भरत नाही तोपर्यंत वरच्या दारणा-गंगापूर धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडण्यात येते. त्यामुळे गोदावरी कालव्यांना सातत्याने सिंचनाचे आवर्तन कमी प्रमाणात मिळत आहे. त्यामुळे पर्जन्यछायेखालील व कायमस्वरूपी अवर्षणग्रस्त असलेल्या कोपरगाव विधानसभा मतदार संघातील शेतकऱ्यांचा शेती व्यवसाय संकटात सापडला आहे. बारमाही ब्लॉकच्या नावाखाली लँड सिलींग कायद्यान्वये जास्तीच्या जमिनी गेल्या व ५० टक्के ब्लॉक्स देखील रद्द करून गोदावरी कालव्यांच्या लाभधारक शेतकऱ्यांवर दुहेरी अन्याय झाला आहे. हा अन्याय दूर करण्यासाठी पावसाळ्यात पश्चिमेला अरबी समुद्राला वाहून जाणारे पाणी पूर्वेकडील अतीतुटीच्या गोदावरी खोऱ्यात वळवून नगर, नासिकसह मराठवाड्याला देखील पाणी द्या अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात आ. आशुतोष काळे यांनी गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाकडे सभागृहाचे लक्ष वेधले. २०१२ ते २०१६ या चार वर्षाची आठवण...

कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या बालकांच्या कुटुंबांना आमदार काळे यांच्याकडून आर्थिक मदत

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १६ : कोपरगाव शहरातील संजयनगर व हनुमान नगरमधील बालकांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून गंभीर जखमी केले आहे. या बालकांच्या कुटुंबांना आ.आशुतोष काळे यांच्याकडून नुकतीच आर्थिक मदत करण्यात आली आहे. कोपरगाव शहरात भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दोन दिवसांपूर्वी या भटक्या कुत्र्यांनी कोपरगाव शहरातील संजयनगरच्या आयेशा कॉलनीतील हमजा जावेद अत्तार (वय वर्ष०३) व हनुमान नगरमधील फैजल मोसीन शेख (वय वर्ष ०४) या बालकांवर हल्ला करून गंभीर जखमी केले होते. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. या घटनेची माहिती मिळताच आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव नगरपरिषदेला तातडीने या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यास सांगितले असून या बालकांच्या तब्बेतीची आस्थेवाईकपणे चौकशी केली व आपल्या कार्यकर्त्यांमार्फत या बालकांच्या कुटुंबांना आर्थिक मदत केली आहे. यावेळी महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, शहराध्यक्ष सुनील गंगुले, माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, रमेश गवळी,...

कोपरगाव तालुक्याचे हक्काचे पाणी घालवणाऱ्या आ. काळेंचा कळवळा खोटा - साहेबराव रोहोम

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १६ : काळे पिता-पुत्रांमुळेच कोपरगाव तालुक्याला गोदावरी कालव्यांद्वारे मिळणारे हक्काचे पाणी कमी झाले आहे. सन २००५ मध्ये तुमच्याच पक्षाचे म्हणजे कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे सरकार सत्तेवर असताना समन्यायी पाणी वाटप कायदा मंजूर झाला. त्यावेळी तुमचे वडील अशोकराव काळे हे आमदार असताना त्यांनी या कायद्याला मूकसंमती दिली होती. मागील अडीच वर्षे तुमच्या पक्षाचे (महाविकास आघाडी) सरकार असताना तुम्ही हा कायदा रद्द व्हावा, यासाठी आवाज उठवला नाही. आता राज्यात शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणारे शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर असताना तुम्ही शेतकऱ्यांच्या हिताचा खोटा कळवळा आणत आहेत, अशी खरमरीत टीका भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम यांनी आ. आशुतोष काळे यांच्यावर केली आहे. रोहोम यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, कोपरगाव तालुक्याला गोदावरी कालव्यांद्वारे पिण्यासाठी व शेती सिंचनासाठी मिळणारे हक्काचे पाणी कमी होण्यास माजी आमदार अशोकराव काळे व विद्यमान आमदार आशुतोष काळे हेच जबाबदार आहेत. आता तेच आ. आशुतोष काळे हे गोदावरी कालव्यांच्या पाण्याचा प्रश्न विधानसभेत मां...

भाजप, शिवसेना व मित्रपक्षांचा नगर परिषद प्रशासनालाआंदोलनाचा इशारा

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १६ : शहरात मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घातला असून, संजयनगर, हनुमाननगर, आयेशा कॉलनी या भागातील तीन लहान मुलांना आज सकाळी मोकाट कुत्र्यांनी चावा घेऊन गंभीर जखमी केले. यापूर्वीही अनेक भागातील नागरिक मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झाले आहेत. नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात व मोकाट फिरणाऱ्या जनावरांचा बंदोबस्त करण्यात नगर परिषद प्रशासन साफ अपयशी ठरले आहे. मात्र, नागरिकांकडून सक्तीने करवसुली केली जात आहे. नगर परिषद प्रशासनाने आधी नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, तोपर्यंत करवसुलीची गाडी शहरात फिरू देऊ नये. प्रशासनाने नागरिकांच्या जीविताशी खेळू नये, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल व याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असा सज्जड इशारा भाजप, शिवसेना व मित्रपक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी व नागरिकांनी दिला आहे. संजयनगर भागातील तीन लहान मुलांवर मोकाट कुत्र्यांनी हल्ला करून गंभीर जखमी केल्याचे समजताच भाजप, शिवसेना व मित्रपक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी नगर परिषद मुख्याधिकारी तथा प्रशासक शांताराम गोसावी यांना भेटून न. प. प्रशासनाच्या अनागोंदी कारभारावरून...