देशाच्या दरडोई उत्पन्नात किराणा व्यापारी महत्वाचा घटक - तनसुख झांबड
कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३१ : किराणा व्यापारी त्यांच्या व्यवसायात सकारात्मक दृष्टीकोन, व्यवहारात पारदर्शकता आणि प्रगतीसह भारतीय अर्थव्यवस्थेला गती व दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण काम करत आहे. किराणा व्यापारी हा शहराच्या नावलौकिकाबरोबरच स्वतःच्या व्यवसायाची देखील ओळख करून देत असतो. स्वतःची ओळख करून देण्याची सकारात्मक मानसिकता किराणा व्यापाऱ्यांकडे आहे. आजचा युवा किराणा व्यापारी कोपरगाव शहराची कॅलिफोर्निया अशी असलेली ओळख पुन्हा मिळवून देतील. आपल्या जिद्द व कल्पनाशक्तीने मॉल संस्कृती कडून सकारात्मक गोष्टी स्वीकारून, डिजिटल तंत्रज्ञानाद्वारा बदलत्या काळानुसार व्यवसायातही बदल करावेत. असे प्रतिपादन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे व्हा.चेअरमन तनसुख झांबड यांनी केले. समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या स्व.यशवंतराव चव्हाण समता सहकार सभागृहात कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशनच्यावतीने युवा किराणा व्यापारी प्रोत्साहन सोहळा आणि दिवाळी फराळाचे आयोजन करण्यात आले होते. प्रसंगी तनसुख झांबड बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राम बंधू मसालेचे चेअरमन हेमंत राठी, कार्यक्रमाचे अध्यक्ष किराणा मर्चंट असोसिएशनचे संस्थ...